शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा वसुलीचे उद्दिष्ट अयशस्वी

By admin | Updated: March 31, 2016 00:32 IST

नागरिकांनी फिरवली पाठ : मनपा आयुक्तांचे थकबाकी भरण्याचे आवाहन; एलबीटीच्या वसुलीने मात्र प्रशासनाला दिलासा

कोल्हापूर : घरफाळा विभागाकडील बिल वाटपातील सावळागोंधळ, चुकीची आकारणी, दंड व्याजाची पुन्हा झालेली आकारणी, आदी कारणांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी घरफाळा भरण्याची इच्छा असूनही पाठ फिरविल्यामुळे यंदा महानगरपालिकेचे शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. विविध करांची कशीबशी ८५ टक्क्यांपर्यंत वसुली करताना प्रशासनाच्या तोंडाला फेस आला आहे. दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी नागरिकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले. महानगरपालिका प्रशासनाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात विविध करांच्या माध्यमातून ३०९ कोटींच्या जमेचे उद्दिष्ट ठरविले होते; परंतु आॅगस्ट २०१५ पासून एलबीटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना सूट दिल्यामुळे जानेवारी महिन्यात उद्दिष्ट १० कोटींनी कमी करून ते २९९ कोटी निश्चित केले, तरीही हे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले. आज, गुरुवारी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत जेमतेम ८५ टक्क्यांपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ गतवर्षात ४० ते ४५ कोटींचा तोटा सोसावा लागला आहे. विशेष म्हणजे एलबीटीमधून बहुसंख्य व्यापाऱ्यांना सूट मिळाली असली तरी मागील थकबाकी वसूल केल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला. आज, गुरुवारी संपणाऱ्या आर्थिक वर्षात एलबीटीपासून १०५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. प्रत्यक्षात हा कर थकबाकीसह १०३ कोटींपर्यंत वसूल झाला. पाणीपट्टी वसुली ४९ कोटी अपेक्षित असता ती ४४ कोटींपर्यंतच वसूल झाली आहे. मुख्य उत्पन्नाचे स्रोत असलेल्या घरफाळा विभागाला ४१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, आज ३१ कोटीच वसूल झाले. नगररचना विभागाने ५७ कोटींपैकी ५१ कोटींचा कर वसूल केला. एलबीटीवगळता सर्व विभागांची वसुली असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले. वादाची रक्कम सोडून घरफाळा भराआयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी महापालिकेच्या वसुलीचा आढावा घेतला, त्यावेळी मोठी थकबाकी राहत असल्याचे निदर्शनास आले. या वर्षाची थकबाकी तसेच चालू देयक भरून घेण्यासाठी दि. २ एप्रिलपर्यंत सर्व कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले. पुढील वर्षाच्या दंड व्याजात सवलत मिळवायची असेल तर सर्व कर नागरिकांनी भरावा, असे आवाहन आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना केले. घरफाळा विभागात सावळागोंधळ झाल्याचे आयुक्तांनी मान्य केले. मात्र, ज्या रकमेबाबत वाद आहे ती सोडून उर्वरित रक्कम देय वेळेत भरावी, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. ज्यांच्या घरफाळ्याची बिले चुकीची आली आहेत, ती सुनावणी घेऊन दुरुस्त केली जातील, परंतु बिले कशी चुकीची आहेत हे पटवून देणारे पुरावे ग्राहकांनी तक्रार अर्जासोबत द्यावेत, असे आयुक्तांनी सांगितले. नवीन वर्षात बिले पोस्टाने देणार घरफाळा विभागाची बिले वेळेत मिळाली नाहीत अशा तक्रारी आहेत, त्याची दखल घेत नवीन वर्षापासून जून ते जुलै महिन्यांत सर्वांना पोस्टाने ती पाठविण्यात येतील, अशी माहिती शिवशंकर यांनी दिली.