शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

घरफाळ्यातील वाद, गोकुळमधील संघर्ष वाढवणार, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा : मुश्रीफ यांनाही केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घरफाळा व अन्य प्रकरणांवरून गैरव्यवहाराचे आरोप केल्याने गोकूळमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

हॉटेलच्या घरफाळ्याचा विषय यापूर्वीही दोन निवडणुकीवेळी उपस्थित झाला आहे. त्यावेळीही त्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. ऐन विधानसभा निवडणुकीत तोंडावर मतदान असताना त्याबाबत आरोप झाले; परंतु तरीही निवडणुकीचा निकाल अपेक्षित असाच लागला. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. ती वेळेत होते की लांबणीवर पडते हे निश्चित नाही, असे असताना आरोपांचा बार आताच उडवून द्यायची गरज नव्हती. ऐन निवडणुकीच्या काळात पुराव्यानिशी आरोप झाले असते तर त्याचा जनमाणसावर काही प्रमाणात परिणाम झाला असता. कारण निवडणूकही महापालिकेची आणि आरोपही त्याच संस्थेच्या कारभाराबद्दल झाल्याने त्यातील गांभीर्य वाढले असते. आताच हे आरोप होण्यामागे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या चिरंजीवाच्या पुण्यात झालेल्या लग्न समारंभात गर्दी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे निमित्त घडले असल्याचे दिसते. हा गुन्हा गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांच्यामुळेच दाखल झाला, असे महाडिक गटाला वाटते. त्यामुळे ते लग्न करून कोल्हापुरात आल्यावर तातडीने महाडिक यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन घरफाळ्याचे आरोप केले. यापूर्वीचे आरोप कदम बंधूंनी केले होते; परंतु यावेळेला मैदानात थेट माजी खासदार महाडिकच उतरल्याने त्याचे गांभीर्य वाढले.

मुश्रीफ यांची खपली...

पालकमंत्र्यांसोबत आता ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावरही काही आरोप झाले आहेत. एक गंभीर आरोप तर पत्रकार परिषदेत केला व नंतर तो मागे घेण्यात आला; परंतु त्याची जाहीर चर्चा व्हायची ती झालीच. महापालिकेच्या आधी गोकुळ दूध संघाची लढाई होणार आहे. त्यात मुश्रीफ यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. अशा स्थितीत त्यांची खपली काढण्याची गरज नव्हती. अशा आरोप-प्रत्यारोपातून निष्पण्ण काही होत नाही. कारण त्याचा नंतर पाठपुरावा होत नाही. कदम बंधू यांनीच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी केलेले आरोप नंतर ते विसरले आता पुन्हा निवडणूक आल्यावरच त्यांना ते आठवले. त्यामुळे त्यातून काही हाती लागण्यापेक्षा राजकीय संघर्ष वाढणार एवढे मात्र नक्की.