शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

घरफाळ्यातील वाद, गोकुळमधील संघर्ष वाढवणार, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा : मुश्रीफ यांनाही केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) तडजोडीच्या हालचाली सुरू असताना महाडिक समर्थक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घरफाळा व अन्य प्रकरणांवरून गैरव्यवहाराचे आरोप केल्याने गोकूळमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

हॉटेलच्या घरफाळ्याचा विषय यापूर्वीही दोन निवडणुकीवेळी उपस्थित झाला आहे. त्यावेळीही त्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. ऐन विधानसभा निवडणुकीत तोंडावर मतदान असताना त्याबाबत आरोप झाले; परंतु तरीही निवडणुकीचा निकाल अपेक्षित असाच लागला. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. ती वेळेत होते की लांबणीवर पडते हे निश्चित नाही, असे असताना आरोपांचा बार आताच उडवून द्यायची गरज नव्हती. ऐन निवडणुकीच्या काळात पुराव्यानिशी आरोप झाले असते तर त्याचा जनमाणसावर काही प्रमाणात परिणाम झाला असता. कारण निवडणूकही महापालिकेची आणि आरोपही त्याच संस्थेच्या कारभाराबद्दल झाल्याने त्यातील गांभीर्य वाढले असते. आताच हे आरोप होण्यामागे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या चिरंजीवाच्या पुण्यात झालेल्या लग्न समारंभात गर्दी केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे निमित्त घडले असल्याचे दिसते. हा गुन्हा गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांच्यामुळेच दाखल झाला, असे महाडिक गटाला वाटते. त्यामुळे ते लग्न करून कोल्हापुरात आल्यावर तातडीने महाडिक यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन घरफाळ्याचे आरोप केले. यापूर्वीचे आरोप कदम बंधूंनी केले होते; परंतु यावेळेला मैदानात थेट माजी खासदार महाडिकच उतरल्याने त्याचे गांभीर्य वाढले.

मुश्रीफ यांची खपली...

पालकमंत्र्यांसोबत आता ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्यावरही काही आरोप झाले आहेत. एक गंभीर आरोप तर पत्रकार परिषदेत केला व नंतर तो मागे घेण्यात आला; परंतु त्याची जाहीर चर्चा व्हायची ती झालीच. महापालिकेच्या आधी गोकुळ दूध संघाची लढाई होणार आहे. त्यात मुश्रीफ यांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. अशा स्थितीत त्यांची खपली काढण्याची गरज नव्हती. अशा आरोप-प्रत्यारोपातून निष्पण्ण काही होत नाही. कारण त्याचा नंतर पाठपुरावा होत नाही. कदम बंधू यांनीच गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी केलेले आरोप नंतर ते विसरले आता पुन्हा निवडणूक आल्यावरच त्यांना ते आठवले. त्यामुळे त्यातून काही हाती लागण्यापेक्षा राजकीय संघर्ष वाढणार एवढे मात्र नक्की.