शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

जयसिंगपूर पालिका देणार कचºयासाठी घरोघरी कुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:31 IST

जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

ठळक मुद्देगांडूळ खत प्रकल्प उभारणार :३५ लाख रुपयांचा निधी खर्च करणार

संदीप बावचे ।जयसिंगपूर : ‘स्वच्छ महाराष्ट्र’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाºया ओल्या कचºयावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या (डस्टबिन) देण्याचे नियोजन केले आहे. गांडूळ खत प्रकल्प राबविण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा केलाजाणार असून, मिळणाºयास्वतंत्र ओल्या कचºयातून खताची निर्मिती केली जाणार आहे. कचराकुंड्यांसाठी निविदा काढण्यात आली असून, त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.कचराकुंड्यांसाठी निविदा

नगरपालिकेकडे घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरामध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी गांडूळ खत प्रकल्प राबवावा. स्वच्छ महाराष्ट्र अभियान घनकचरा नियमांतर्गत घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करावी, असे शासनाचे परिपत्रक पालिकेला आले आहे. त्यामुळे पालिका सभेत चिपरी येथील कचरा डेपोच्या जागेवर गांडूळ खत तयार करण्याचा प्रकल्प राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. शहरात दररोज १७ टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये अंदाजे १० टन ओल्या कचºयाचा समावेश आहे.

खत प्रकल्पासाठी ओल्या कचºयाची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश आणि खत प्रकल्पाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिका मोहीम राबविणार आहे. स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत मिळालेल्या निधीतून घरोघरी कचराकुंड्या दिल्या जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. उपनगरांमुळे आरोग्य विभागासमोर कचरा उठाव करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता, तुंबलेल्या गटारींच्या स्वच्छतेचे आव्हान पालिकेसमोर आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छतेबाबत पालिकेकडे तक्रारी येतात. शासनाचे उद्दिष्ट आणि स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कचराकुंड्या देण्याबाबत निविदा काढण्यात आली आहे. घंटागाड्याद्वारे ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याच्या दृष्टिकोनातून कचराकुंड्या नागरिकांना दिल्या जाणार असून, घंटागाड्याद्वारे शहरातील कचरा संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे.पालिकेची जबाबदारीस्वच्छ महाराष्ट्रांतर्गत हागणदारीमुक्त पुरस्कार स्वीकारल्यानंतर जयसिंगपूर पालिकेची जबाबदारी वाढली आहे. ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प पालिकेने यापूर्वीच हाती घेतला आहे. मात्र, शहरातील कचºयाच्या प्रश्नाचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मंगळवारी झालेल्या पालिका सभेत कचरा, मोकाट जनावरे यावरून नगरसेवकांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. 

प्रबोधनाची गरजकचराकुंड्यांबरोबर ओला व सुका कचरा नेमका काय ? याची चित्रासह माहिती असणारी पत्रके वितरित करण्याची गरज आहे. शिवाय ओला कचरा गोळा करणाºया घंटागाड्यांचे नियोजनदेखील महत्त्वाचे आहे. तरच हे अभियान यशस्वी होईल.

स्वच्छ महाराष्ट्रांतर्गत पालिकेला मिळालेल्या निधीतून सुमारे ३५ लाख रुपये कचराकुंड्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. गांडूळ खत प्रकल्पासाठी शहरातून ओला कचरा संकलित केला जाणार आहे.- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी जयसिंगपूर