शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शिंदेवाडीच्या ‘बिनघंटे’च्या शाळेची घंटा बंदच

By admin | Updated: September 6, 2015 23:29 IST

वाद न्यायालयात : मुले शाळेत पाठविणे बंद; मुलांचे दाखले द्या : पालकांची भूमिका

गारगोटी : राज्यात ‘बिनघंटे’ची शाळा म्हणून नावारूपास आलेली भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडी येथील प्राथमिक शाळा सध्या मुख्याध्यापिका विरुद्ध प्रशासन, ग्रामस्थ आणि सहायक शिक्षक अशा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर ग्रामस्थांनी २४ आॅगस्टपासून आपले पाल्य या शाळेत पाठविणे बंद करून एक वेगळाच ‘एल्गार’ केला आहे.सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवून त्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अहोरात्र काम करून ही शाळा येथील देवेकर व गुरव या दोन शिक्षकांनी नावारूपाला आणली. नवनवीन उपक्रमांसह शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवित येथील विद्यार्थ्यांनीही चांगलीच प्रगती केली. याची दखल जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतली. तर राज्यातील अनेक शाळा, अधिकारी यांनी वेळोवेळी या शाळेस भेटी देऊन बिनघंटेची संकल्पना समजून घेतली. शाळेचा नावलौकिक आणि शिक्षकांचे प्रामाणिक कष्ट पाहून गारगोटी येथील पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत घालण्यास प्राधान्य दिले. शिंदेवाडी व्यतिरिक्त गारगोटी व परिसरातील विद्यार्थी या शाळेत येऊ लागले. त्याचा परिणाम पट संख्येवर झाला. पटसंख्या वाढल्याने ९ जानेवारी २0१५ ला समायोजन पद्धतीने सुनीता कालेकर यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली; पण त्यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थ नाराज होते. त्यांनी त्यांच्या बदलीची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांची कार्यपद्धती तपासण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले गेले.या तपासणीत कालेकर दोषी आढळल्या की नाही, हे गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांच्यावर सहकारी शिक्षकांशी वाद घालणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यात कुचराई करणे, जाणीवपूर्वक शाळेतील उपक्रम बंद पाडणे, असे आरोप होते. त्यांच्यावर शिक्षण विभागाने कारवाई केल्यानंतर त्या न्यायालयात गेल्या. त्यांनी सरकारी शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती यांच्यासह आणखी चार अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचले.सध्या ग्रामस्थ व मुख्याध्यापिका सुनीता कालेकर यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला आहे की, ग्रामस्थांनी न्यायालयाचा मान राखत कालेकर यांची बदली करा म्हणण्या ऐवजी आपल्या पाल्यांचे दाखले द्या, असा सूर लावून सोमवारपासून एकाही विद्यार्थ्यांला शाळेत पाठविले नाही. शिवाय या मुख्याध्यापिकेची बदली झाल्याखेरीज मुले शाळेत पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली आहे.नावाजलेल्या शाळेची वाताहत होत असलेली पाहून पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी एम. एस. मांडे यांच्याशी संपर्क साभला असता ते म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तपास अहवाल पाठविला असून, ते योग्य तो निर्णय घेतील. याबाबत थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून लवकर निर्णय होईल. गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर यांनी ग्रामस्थांना मुले शाळेत पाठविण्याची विनंती केली आहे; पण ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम आहेत. (वार्ताहर)