शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छते’वर ठरणार हॉटेलचा दर्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:48 IST

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने दर्जा दिला जाणार आहे. या विभागाने नवीन वर्षात हॉटेलच्या तपासण्या सुरू केल्या जाणार आहेत. दर्जा दिल्यानंतर त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध अन्नपदार्थ खाण्यास मिळणार आहेत.ग्राहकांना चांगल्या दर्जाचे व शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत यासाठी केंद्र्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग कामास लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचतारांकित हॉटेलपासून ते सर्व प्रकारच्या २६६२ हॉटेलची नोंद विभागाकडे आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारने हॉटेलचा दर्जा ठरविण्यासाठी ४७ निकष घालून दिलेले आहेत. हे कामकोल्हापूर विभागाचे आठ अन्न सुरक्षा अधिकारी पाहणार आहेत. त्याचा आढावा हे दर महिन्याला अधिकारी घेणार आहेत. समजा, एखाद्या हॉटेलला दर्जा मिळाला पण; दोन-तीन वर्षांनंतर या हॉटेलमध्ये त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर अन्न व सुरक्षा मानद कायदा २००६ नुसार निश्चित कारवाई करून त्यांचे हे मानांकन रद्द करण्यात येईल, असे विभागाने सांगितले.अशी राहणार प्रक्रियाहॉटेल मालकाचे आॅनलाईन रजिस्टर होईल. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत हॉटेलची तपासणी करतील. या तपासणीअंती हॉटेलच्या दर्जाचे (उदा.‘अ’, ‘ब’,‘क’, ‘ड’) मानांकन त्यांना मिळेल. त्याची नोंद केंद्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडे राहणार आहे. त्याचा फायदा देशभरातील पर्यटकांसह ग्राहकांना होणार आहे. हे मानांकन हॉटेलमधील दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे.परवाना फलक दर्शनीजवळ लावला पाहिजे.मोफत पिण्याचे पाणी द्यावे.कामगारांची वर्षातून दोनवेळा वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे.कामगारांनी हातमोजे व अ‍ॅपरल घालणे.कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नये, त्यांनी नीटनिटके राहावे.पाणी साठवण्याची टाकी दर महिन्याला स्वच्छ करावी. ती निर्जंतुक केली पाहिजे.किचन पेस्ट करणे (उदा. झुरळ, मुंग्या, उंदीर, पालींचा बंदोबस्त करणे, त्यांचा वावर स्वयंपाकघरात असता कामा नये)मालाची तारीख लिहून ठेवणे गरजेचे आहे.विविध प्रकारचे मसाले, कडधान्ये, तेल आदी एक्सायरी डेट झालेले माल वापरात घेऊ नयेत.प्रत्येक मालाचे बिल असले पाहिजे, तो माल परवानाधारकाकडूनच घेतला पाहिजे.हॉटेलचे मेन्यू कार्ड असणे गरजेचे.