शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

‘स्वच्छते’वर ठरणार हॉटेलचा दर्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 00:48 IST

गणेश शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केंद्र सरकारचे निकष पूर्ण करणाऱ्या हॉटेलना अन्न व औषध विभागाच्या वतीने दर्जा दिला जाणार आहे. या विभागाने नवीन वर्षात हॉटेलच्या तपासण्या सुरू केल्या जाणार आहेत. दर्जा दिल्यानंतर त्याचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असून, यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना दर्जेदार व शुद्ध अन्नपदार्थ खाण्यास मिळणार आहेत.ग्राहकांना चांगल्या दर्जाचे व शुद्ध अन्नपदार्थ मिळावेत यासाठी केंद्र्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग कामास लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचतारांकित हॉटेलपासून ते सर्व प्रकारच्या २६६२ हॉटेलची नोंद विभागाकडे आहे. हॉटेलमध्ये ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकारने हॉटेलचा दर्जा ठरविण्यासाठी ४७ निकष घालून दिलेले आहेत. हे कामकोल्हापूर विभागाचे आठ अन्न सुरक्षा अधिकारी पाहणार आहेत. त्याचा आढावा हे दर महिन्याला अधिकारी घेणार आहेत. समजा, एखाद्या हॉटेलला दर्जा मिळाला पण; दोन-तीन वर्षांनंतर या हॉटेलमध्ये त्रुटी आढळल्या तर त्यांच्यावर अन्न व सुरक्षा मानद कायदा २००६ नुसार निश्चित कारवाई करून त्यांचे हे मानांकन रद्द करण्यात येईल, असे विभागाने सांगितले.अशी राहणार प्रक्रियाहॉटेल मालकाचे आॅनलाईन रजिस्टर होईल. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यामार्फत हॉटेलची तपासणी करतील. या तपासणीअंती हॉटेलच्या दर्जाचे (उदा.‘अ’, ‘ब’,‘क’, ‘ड’) मानांकन त्यांना मिळेल. त्याची नोंद केंद्र सरकारच्या अन्न व औषध विभागाकडे राहणार आहे. त्याचा फायदा देशभरातील पर्यटकांसह ग्राहकांना होणार आहे. हे मानांकन हॉटेलमधील दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे.परवाना फलक दर्शनीजवळ लावला पाहिजे.मोफत पिण्याचे पाणी द्यावे.कामगारांची वर्षातून दोनवेळा वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे.कामगारांनी हातमोजे व अ‍ॅपरल घालणे.कामगारांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नये, त्यांनी नीटनिटके राहावे.पाणी साठवण्याची टाकी दर महिन्याला स्वच्छ करावी. ती निर्जंतुक केली पाहिजे.किचन पेस्ट करणे (उदा. झुरळ, मुंग्या, उंदीर, पालींचा बंदोबस्त करणे, त्यांचा वावर स्वयंपाकघरात असता कामा नये)मालाची तारीख लिहून ठेवणे गरजेचे आहे.विविध प्रकारचे मसाले, कडधान्ये, तेल आदी एक्सायरी डेट झालेले माल वापरात घेऊ नयेत.प्रत्येक मालाचे बिल असले पाहिजे, तो माल परवानाधारकाकडूनच घेतला पाहिजे.हॉटेलचे मेन्यू कार्ड असणे गरजेचे.