शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापुरातील वसतिगृहे शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाचे प्रतीक; डॉ. शां. ब. मुजुमदार यांचे प्रतिपादन

By समीर देशपांडे | Updated: December 16, 2023 19:14 IST

डॉ. मुजुमदार यांनी कोल्हापूरमधील अनेक आठवणी जागविल्या

कोल्हापूर : सर्व समाजातील मुले शिकावीत यासाठी विविध जाती धर्माची वसतिगृहे उभारण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच हजारो मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. कोल्हापुरातील ही वसतिगृहे छत्रपती शाहू महाराजांच्या दृष्टेपणाचे प्रतिक आहेत असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक पदमभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी केले.‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित अक्षरगप्पांच्या ११० व्या कार्यक्रमातील प्रकट मुलाखतीवेळी ते बोलत होते. समीर देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.गडहिंग्ललज येथील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण, कोल्हापूरमधील राजाराम महाविद्यालयातील अध्ययन, सारस्वत बोर्डिंगमधील वास्तव्य आणि गोखले महाविद्यालयातील अध्यापन अशा अनेक आठवणी यावेळी डॉ. मुजुमदार यांनी जागविल्या. सामाजिक काम करताना अपमान गिळायला शिकण्याची गरज असून त्या काळातही मला असे अनेक अनुभव आले. परंतू जिद्द, स्वच्छ हेतू आणि कष्टाची प्रचंड तयारी यामुळे यश मिळत गेले. नियतीनेही साथ दिली आणि आज सिंबायोसिस हा भारतातील शिक्षण क्षेत्रातील एक दर्जेदार बॅंड बनला आहे. कोणत्याही राष्ट्राचा विकास होण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर अधिक भर देण्याची गरज असून या दोन्ही क्षेत्रात सिंबायोसिस आघाडीवर आहे.रवींद्र जोशी यांनी स्वागत केले. यावेळी संजीवनी मुजुमदार, माजी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. एच. व्ही. देशपांडे, प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, सारस्वत बोर्डिंगचे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका घटनेने बदलले आयुष्यडॉ. मुजुमदार म्हणाले, फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी रेक्टर होतो.  एका माॅरिशसच्या विद्यार्थ्यांला एक मुलगी बाहेरून सलग काही दिवस जेवण आणून देत होती. हा नेमका प्रकार काय आहे याची माहिती घेतल्यानंतर तो मुलगा काविळीने आजारी होता. त्याची बहिण त्याला बाहेरून जेवण आणून देत होती. मला खरा प्रकार समजला आणि मग मी पुण्यात शिकायला आलेल्या विदेशी मुलांच्या अडचणी समजून घेतल्या. तर त्यांचे पुणे आणि भारताबद्दल मत वाईट होत चालले होते. म्हणूनच या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी सिंबायोसिस उभी  करण्याचा निर्णय घेतला. या एका साध्या घटनेतून सिंबायोसिसचा जन्म झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर