शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: October 15, 2015 00:45 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ‘कागदी घोडे’ : पावसाळा संपल्यावर भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न

शिवाजी सावंत -- गारगोर्टी---पावसाळा संपल्यानंतर भूजल पातळी वाढविण्याकरिता उपाययोजना करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा कारभार पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत असून, केवळ कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष काम करण्याऐवजी काम करण्याचा देखावा करीत असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. खेड्या-पाड्यांतील लोकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून शासनाने पंचायत समितीकडे स्वतंत्र पाणीपुरवठा विभाग निर्माण केला. या विभागाची जबाबदारी आहे की, लोकांना पुरेसे पाणी उपल्बधीच्या दृष्टीने उपाय योजना करणे. लोकांना आणि शासन दरबारी त्याचा अहवाल पाठवून नियोजन करणे; पण अलीकडच्या काळात या विभागातर्फे अनेक पेयजल योजना करण्यात आल्या. यातील काही ठरावीक योजना वगळता बहुतांशी योजनांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत अनेक स्थानिकांच्या तक्रारी असतात; पण या शंकांचे निरसन कसे करायचे याबाबतीत हा विभाग कमालीचा तरबेज झाला आहे. भुदरगड तालुक्याला पाटगाव, चिकोत्रा, फये, कोंडुशी, मेघोली या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यासर्व जलाशयांची क्षमता एकत्रितरीत्या सात टी.एम. सी. होते. पण, चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकदाच भरले आहे. आजअखेर हे धरण निम्मेच भरते. यंदातर हे धरण केवळ ४० टक्के भरले आहे. तालुक्यात सरासरी २००० मि. मी. पाऊस पडतो. पूर्व भागात कमी पडतो, तर पश्चिम भागात तीव्र स्वरूपात पडतो. पाटगाव, फये, कोंडुशी, मेघोली ही धरणे भरून साधारणत: ४ ते ५ टी.एम.सी. पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते. मात्त, येथे नियोजनाचा अभाव असल्याने या अमूल्य साधनसंपत्तीकडे कोणाचेही लक्ष नाही. म्हणून दुष्काळाची स्थिती निर्माण झाली की ‘माकडाच्या घराच्या’ गोष्टीची आठवण होते. नदीकाठालगतची गावे वगळता इतर सर्व गावे पिढ्यान्पिढ्या या नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून आहेत. आजअखेर या स्त्रोत्रातून केवळ उपसा केला गेला. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आणि याची इंत्यभूत तांत्रिक माहिती पाणीपुरवठा विभागाला असताना केवळ यंदा पाऊस कमी पडल्याने आढावा बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चेचे गुऱ्हाळ करीत आहेत. तालुक्यातील देवकेवाडा, बेडीव पैकी धनगरवाडी, फये, धनगरवाडा, पळशिवणे, ढाणेवाडी ही गावे तीव्र टंचाईग्रस्त आहेत. पण, या गावांतील झरे कदाचित अथवा विहिरींचे पावसाळ्यात पुनर्भरण झाले असते, तर कदाचित १५८ वाडी, वस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. नियोजनशुन्य कारभार आणि बेफिकीरपणा यामुळे ही गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. यंदा टँकरने काही गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. निसर्गाने पाण्याचा खजिना दिला आहे. त्याची योग्य आणि नियोजनपूर्वक हाताळणी केल्यास एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही. ७२ गावांना नदीतून पाणीपुरवठा तालुक्यात दोनशे तीस वाड्या-वस्त्या आहेत. या वाड्या-वस्त्यांमध्ये एक लाख पन्नास हजार तिनशे लोक राहतात. या सर्वांना पाणीपुरवठा ७२ जॅकवेल, २९ पाणीपुरवठा विहिरी, ११० झरे, ८६ हातपंप, ०२ दुहेरी पंप, २८ विद्युत पंप, 0४ खासगी विहिरी, अशा ३३१ साधनांद्वारे केला जातो. यातील ७२ गावांना जवळपास नदीतून पाणीपुरवठा होतो. उर्वरित १५८ वाडी-वस्त्यांना झरे, विहिरी, आणि हातपंपावर अवलंबून राहावे लागते.