शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: October 15, 2015 00:45 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ‘कागदी घोडे’ : पावसाळा संपल्यावर भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न

शिवाजी सावंत -- गारगोर्टी---पावसाळा संपल्यानंतर भूजल पातळी वाढविण्याकरिता उपाययोजना करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा कारभार पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत असून, केवळ कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष काम करण्याऐवजी काम करण्याचा देखावा करीत असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. खेड्या-पाड्यांतील लोकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून शासनाने पंचायत समितीकडे स्वतंत्र पाणीपुरवठा विभाग निर्माण केला. या विभागाची जबाबदारी आहे की, लोकांना पुरेसे पाणी उपल्बधीच्या दृष्टीने उपाय योजना करणे. लोकांना आणि शासन दरबारी त्याचा अहवाल पाठवून नियोजन करणे; पण अलीकडच्या काळात या विभागातर्फे अनेक पेयजल योजना करण्यात आल्या. यातील काही ठरावीक योजना वगळता बहुतांशी योजनांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत अनेक स्थानिकांच्या तक्रारी असतात; पण या शंकांचे निरसन कसे करायचे याबाबतीत हा विभाग कमालीचा तरबेज झाला आहे. भुदरगड तालुक्याला पाटगाव, चिकोत्रा, फये, कोंडुशी, मेघोली या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यासर्व जलाशयांची क्षमता एकत्रितरीत्या सात टी.एम. सी. होते. पण, चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकदाच भरले आहे. आजअखेर हे धरण निम्मेच भरते. यंदातर हे धरण केवळ ४० टक्के भरले आहे. तालुक्यात सरासरी २००० मि. मी. पाऊस पडतो. पूर्व भागात कमी पडतो, तर पश्चिम भागात तीव्र स्वरूपात पडतो. पाटगाव, फये, कोंडुशी, मेघोली ही धरणे भरून साधारणत: ४ ते ५ टी.एम.सी. पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते. मात्त, येथे नियोजनाचा अभाव असल्याने या अमूल्य साधनसंपत्तीकडे कोणाचेही लक्ष नाही. म्हणून दुष्काळाची स्थिती निर्माण झाली की ‘माकडाच्या घराच्या’ गोष्टीची आठवण होते. नदीकाठालगतची गावे वगळता इतर सर्व गावे पिढ्यान्पिढ्या या नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून आहेत. आजअखेर या स्त्रोत्रातून केवळ उपसा केला गेला. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आणि याची इंत्यभूत तांत्रिक माहिती पाणीपुरवठा विभागाला असताना केवळ यंदा पाऊस कमी पडल्याने आढावा बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चेचे गुऱ्हाळ करीत आहेत. तालुक्यातील देवकेवाडा, बेडीव पैकी धनगरवाडी, फये, धनगरवाडा, पळशिवणे, ढाणेवाडी ही गावे तीव्र टंचाईग्रस्त आहेत. पण, या गावांतील झरे कदाचित अथवा विहिरींचे पावसाळ्यात पुनर्भरण झाले असते, तर कदाचित १५८ वाडी, वस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. नियोजनशुन्य कारभार आणि बेफिकीरपणा यामुळे ही गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. यंदा टँकरने काही गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. निसर्गाने पाण्याचा खजिना दिला आहे. त्याची योग्य आणि नियोजनपूर्वक हाताळणी केल्यास एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही. ७२ गावांना नदीतून पाणीपुरवठा तालुक्यात दोनशे तीस वाड्या-वस्त्या आहेत. या वाड्या-वस्त्यांमध्ये एक लाख पन्नास हजार तिनशे लोक राहतात. या सर्वांना पाणीपुरवठा ७२ जॅकवेल, २९ पाणीपुरवठा विहिरी, ११० झरे, ८६ हातपंप, ०२ दुहेरी पंप, २८ विद्युत पंप, 0४ खासगी विहिरी, अशा ३३१ साधनांद्वारे केला जातो. यातील ७२ गावांना जवळपास नदीतून पाणीपुरवठा होतो. उर्वरित १५८ वाडी-वस्त्यांना झरे, विहिरी, आणि हातपंपावर अवलंबून राहावे लागते.