शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड पंचायत समितीचे वरातीमागून घोडे

By admin | Updated: October 15, 2015 00:45 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे ‘कागदी घोडे’ : पावसाळा संपल्यावर भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न

शिवाजी सावंत -- गारगोर्टी---पावसाळा संपल्यानंतर भूजल पातळी वाढविण्याकरिता उपाययोजना करणे म्हणजे, ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा कारभार पंचायत समितीचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करीत असून, केवळ कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष काम करण्याऐवजी काम करण्याचा देखावा करीत असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. खेड्या-पाड्यांतील लोकांना पिण्याचे पाणी व्यवस्थित मिळावे म्हणून शासनाने पंचायत समितीकडे स्वतंत्र पाणीपुरवठा विभाग निर्माण केला. या विभागाची जबाबदारी आहे की, लोकांना पुरेसे पाणी उपल्बधीच्या दृष्टीने उपाय योजना करणे. लोकांना आणि शासन दरबारी त्याचा अहवाल पाठवून नियोजन करणे; पण अलीकडच्या काळात या विभागातर्फे अनेक पेयजल योजना करण्यात आल्या. यातील काही ठरावीक योजना वगळता बहुतांशी योजनांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याबाबत अनेक स्थानिकांच्या तक्रारी असतात; पण या शंकांचे निरसन कसे करायचे याबाबतीत हा विभाग कमालीचा तरबेज झाला आहे. भुदरगड तालुक्याला पाटगाव, चिकोत्रा, फये, कोंडुशी, मेघोली या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. यासर्व जलाशयांची क्षमता एकत्रितरीत्या सात टी.एम. सी. होते. पण, चिकोत्रा धरण बांधल्यापासून केवळ एकदाच भरले आहे. आजअखेर हे धरण निम्मेच भरते. यंदातर हे धरण केवळ ४० टक्के भरले आहे. तालुक्यात सरासरी २००० मि. मी. पाऊस पडतो. पूर्व भागात कमी पडतो, तर पश्चिम भागात तीव्र स्वरूपात पडतो. पाटगाव, फये, कोंडुशी, मेघोली ही धरणे भरून साधारणत: ४ ते ५ टी.एम.सी. पाणी नदी, नाल्यांतून वाहून जाते. मात्त, येथे नियोजनाचा अभाव असल्याने या अमूल्य साधनसंपत्तीकडे कोणाचेही लक्ष नाही. म्हणून दुष्काळाची स्थिती निर्माण झाली की ‘माकडाच्या घराच्या’ गोष्टीची आठवण होते. नदीकाठालगतची गावे वगळता इतर सर्व गावे पिढ्यान्पिढ्या या नैसर्गिक जलस्त्रोतावर अवलंबून आहेत. आजअखेर या स्त्रोत्रातून केवळ उपसा केला गेला. जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असताना आणि याची इंत्यभूत तांत्रिक माहिती पाणीपुरवठा विभागाला असताना केवळ यंदा पाऊस कमी पडल्याने आढावा बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चेचे गुऱ्हाळ करीत आहेत. तालुक्यातील देवकेवाडा, बेडीव पैकी धनगरवाडी, फये, धनगरवाडा, पळशिवणे, ढाणेवाडी ही गावे तीव्र टंचाईग्रस्त आहेत. पण, या गावांतील झरे कदाचित अथवा विहिरींचे पावसाळ्यात पुनर्भरण झाले असते, तर कदाचित १५८ वाडी, वस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली नसती. नियोजनशुन्य कारभार आणि बेफिकीरपणा यामुळे ही गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत. यंदा टँकरने काही गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. निसर्गाने पाण्याचा खजिना दिला आहे. त्याची योग्य आणि नियोजनपूर्वक हाताळणी केल्यास एकही गाव टंचाईग्रस्त राहणार नाही. ७२ गावांना नदीतून पाणीपुरवठा तालुक्यात दोनशे तीस वाड्या-वस्त्या आहेत. या वाड्या-वस्त्यांमध्ये एक लाख पन्नास हजार तिनशे लोक राहतात. या सर्वांना पाणीपुरवठा ७२ जॅकवेल, २९ पाणीपुरवठा विहिरी, ११० झरे, ८६ हातपंप, ०२ दुहेरी पंप, २८ विद्युत पंप, 0४ खासगी विहिरी, अशा ३३१ साधनांद्वारे केला जातो. यातील ७२ गावांना जवळपास नदीतून पाणीपुरवठा होतो. उर्वरित १५८ वाडी-वस्त्यांना झरे, विहिरी, आणि हातपंपावर अवलंबून राहावे लागते.