शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जगण्याची उमेद - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती ...

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती झाली होती जेव्हा कोरोनाचा विषाणू दूर कुठेतरी वुहान प्रांतात धुमाकूळ घालत होता. तो जोपर्यंत आपल्या गावाच्या वेशीबाहेर आला नव्हता, तोपर्यंत सगळं आलबेल होतं; आणि मग एक दिवस अचानक लाॅकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषध, वैद्यकीय व्यवस्था, पीपीई किट यांसाठी धावाधाव सुरू झाली; पण यावेळी माणसाच्या लढाऊवृत्तीचा पुन:प्रत्यय आला. संपूर्ण मानवसमाज एक होऊन या जागतिक प्रलयंकारी संकटाशी लढताना दिसला. प्रत्येकजण आपापल्या परीने पर्याय शोधू लागला. जगण्यासाठी धडपडणाऱ्या गोरगरीब, असाहाय्य जनतेच्या मदतीला लोक उभे राहू लागले. स्थलांतरित होणाऱ्यांना कोणी खायला दिले, कोणी पाणी दिलं, कोणी जमेल तेवढी वाहतूक व्यवस्था केली. कोरोनाच्या साथीत हार न मानता कोणी घरात बसून, कोणी रस्त्यावर उतरून सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन केले. पहिल्यांदा पंधरा दिवसांसाठी सुरू केलेला लाॅकडाऊन वाढत गेला. दिलेल्या सूचना पाळून लोकांनी घरी शांत बसणे पसंत केले; पण कोरोनाचा प्रभाव काही कमी होताना दिसत नव्हता. फैलाव वाढत गेला तसा लाॅकडाऊन वाढत गेला. दूरवर शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांनी गावी जाणे सुरू केले. या स्थलांतरात काही दुर्घटना घडल्या तशी समाजातील मोठ्या मनाच्या लोकांनी आपली झोळी रिकामी करायला सुरुवात केली. काही विक्षिप्त लोकांनी कमरेला अमरत्वाचा पट्टा बांधून जणू आपण अनादिकाळापर्यंत जगणार आहोत, या अविर्भावात लुटालूट सुरू केली. मिळेल त्या मार्गाने कमाई केली तरी लोकांनी जगण्याचा संघर्ष थांबवला नाही.

एखादी अवघड चढण चढून डोंगरमाथ्यावर आल्यावर आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य होईल, या आशेवर घसा सुकला, हातपाय थकले, अंगातील त्राण संपले तरी डोंगर चढून वर आलो आणि समोर खोल दरी दिसावी. त्याच्या पलीकडे जंगल आणि त्यांच्या पलीकडे पुसटशी कल्पना येईल, अशा पद्धतीने आपले ध्येय दिसले. आता उडी मारून कडेलोट करून जीवनयात्रा संपवायची नाही. कडेकपारीतून सरपटत खाली उतरावे. किती ओरखडले, कितीही दमलो, थकलो, कितीही असह्य झाले तरी हार न मानता मिळेल त्या मार्गाने पुढे जात राहावं. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून मार्गाक्रमण करीत राहावे. थांबावे, विचार करावा, विसावा घेऊन पुन्हा चालत राहावं ही जगण्याची उमेद आपल्याला कोरोनाच्या जंगलातून बाहेर घेऊन येत असताना दिसत आहे. या कठीण काळात काही चुका झाल्या. काही लोक चुकीचे वागले; पण मानवी गुणवैशिष्ट्यांनुसार चांगले ते धरावे. वाईट ते सोडून द्यावे. एकमेकांच्या जखमांवर फुंकर घालत पुढे सरकत राहावं.

कोरोनाच्या काळात अनेक जणांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. सगळ्यात पहिला फटका बसला शेतकरी आणि पोल्ट्रीमालक यांना. अचानक सगळे ठप्प झाले; त्यामुळे शेतमाल तोडणी, वाहतूक आणि वितरण थांबले. भाजीपाला अक्षरशः शेतात सडून गेला. कोणीतरी आवई उठवली की, कोरोना चिकन खाल्ल्याने होतो. क्षणात चिकनचे दर कवडीमोल झाले. त्याचबरोबर रस्त्यावर विक्री व्यवसाय करणारे, रोजंदारी मजूर, रिक्षाचालक यांची कुचंबणा झाली. त्यांना काही प्रमाणात शासकीय मदत रेशन आणि आर्थिक स्वरूपात आली. ज्यांनी उधारीवर माल विकला होता, असे व्यापारी अडचणीत आले; कारण काहीजण व्यवसाय सोडून परराज्यांत निघून गेले. तिथे उधारी बुडाली. अचानक आलेल्या दवाखान्याच्या बिलाची रक्कम बघून भलेभले घायकुतीला आले. उद्योग व्यवसाय बंद. कमाईच्या वाटा थांबलेल्या. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नाही. दवाखान्याची बिलं डोंगराएवढी. लोकांनी पै पै करून साठवलेली जमापुंजी अवघ्या काही दिवसांत संपली. सुरुवातीला तर सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा पगारकपातीला सामोर जावे लागले; पण नंतर स्थिरस्थावर झाले. काही खासगी क्षेत्रातील लोकांना रोजगार गमवावा लागला. काहीजणांना पगार कपात झाली, तर काही ठिकाणी दिरंगाई होत होती. जितकी झळ शेतकरी आणि व्यावसायिक यांना बसली त्या तुलनेत नोकरदारांना त्रास कमी जाणवला. असंघटित आणि अकुशल कामगारांना चांगलाच फटका बसला.