शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जगण्याची उमेद - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती ...

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती झाली होती जेव्हा कोरोनाचा विषाणू दूर कुठेतरी वुहान प्रांतात धुमाकूळ घालत होता. तो जोपर्यंत आपल्या गावाच्या वेशीबाहेर आला नव्हता, तोपर्यंत सगळं आलबेल होतं; आणि मग एक दिवस अचानक लाॅकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषध, वैद्यकीय व्यवस्था, पीपीई किट यांसाठी धावाधाव सुरू झाली; पण यावेळी माणसाच्या लढाऊवृत्तीचा पुन:प्रत्यय आला. संपूर्ण मानवसमाज एक होऊन या जागतिक प्रलयंकारी संकटाशी लढताना दिसला. प्रत्येकजण आपापल्या परीने पर्याय शोधू लागला. जगण्यासाठी धडपडणाऱ्या गोरगरीब, असाहाय्य जनतेच्या मदतीला लोक उभे राहू लागले. स्थलांतरित होणाऱ्यांना कोणी खायला दिले, कोणी पाणी दिलं, कोणी जमेल तेवढी वाहतूक व्यवस्था केली. कोरोनाच्या साथीत हार न मानता कोणी घरात बसून, कोणी रस्त्यावर उतरून सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन केले. पहिल्यांदा पंधरा दिवसांसाठी सुरू केलेला लाॅकडाऊन वाढत गेला. दिलेल्या सूचना पाळून लोकांनी घरी शांत बसणे पसंत केले; पण कोरोनाचा प्रभाव काही कमी होताना दिसत नव्हता. फैलाव वाढत गेला तसा लाॅकडाऊन वाढत गेला. दूरवर शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांनी गावी जाणे सुरू केले. या स्थलांतरात काही दुर्घटना घडल्या तशी समाजातील मोठ्या मनाच्या लोकांनी आपली झोळी रिकामी करायला सुरुवात केली. काही विक्षिप्त लोकांनी कमरेला अमरत्वाचा पट्टा बांधून जणू आपण अनादिकाळापर्यंत जगणार आहोत, या अविर्भावात लुटालूट सुरू केली. मिळेल त्या मार्गाने कमाई केली तरी लोकांनी जगण्याचा संघर्ष थांबवला नाही.

एखादी अवघड चढण चढून डोंगरमाथ्यावर आल्यावर आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य होईल, या आशेवर घसा सुकला, हातपाय थकले, अंगातील त्राण संपले तरी डोंगर चढून वर आलो आणि समोर खोल दरी दिसावी. त्याच्या पलीकडे जंगल आणि त्यांच्या पलीकडे पुसटशी कल्पना येईल, अशा पद्धतीने आपले ध्येय दिसले. आता उडी मारून कडेलोट करून जीवनयात्रा संपवायची नाही. कडेकपारीतून सरपटत खाली उतरावे. किती ओरखडले, कितीही दमलो, थकलो, कितीही असह्य झाले तरी हार न मानता मिळेल त्या मार्गाने पुढे जात राहावं. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून मार्गाक्रमण करीत राहावे. थांबावे, विचार करावा, विसावा घेऊन पुन्हा चालत राहावं ही जगण्याची उमेद आपल्याला कोरोनाच्या जंगलातून बाहेर घेऊन येत असताना दिसत आहे. या कठीण काळात काही चुका झाल्या. काही लोक चुकीचे वागले; पण मानवी गुणवैशिष्ट्यांनुसार चांगले ते धरावे. वाईट ते सोडून द्यावे. एकमेकांच्या जखमांवर फुंकर घालत पुढे सरकत राहावं.

कोरोनाच्या काळात अनेक जणांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. सगळ्यात पहिला फटका बसला शेतकरी आणि पोल्ट्रीमालक यांना. अचानक सगळे ठप्प झाले; त्यामुळे शेतमाल तोडणी, वाहतूक आणि वितरण थांबले. भाजीपाला अक्षरशः शेतात सडून गेला. कोणीतरी आवई उठवली की, कोरोना चिकन खाल्ल्याने होतो. क्षणात चिकनचे दर कवडीमोल झाले. त्याचबरोबर रस्त्यावर विक्री व्यवसाय करणारे, रोजंदारी मजूर, रिक्षाचालक यांची कुचंबणा झाली. त्यांना काही प्रमाणात शासकीय मदत रेशन आणि आर्थिक स्वरूपात आली. ज्यांनी उधारीवर माल विकला होता, असे व्यापारी अडचणीत आले; कारण काहीजण व्यवसाय सोडून परराज्यांत निघून गेले. तिथे उधारी बुडाली. अचानक आलेल्या दवाखान्याच्या बिलाची रक्कम बघून भलेभले घायकुतीला आले. उद्योग व्यवसाय बंद. कमाईच्या वाटा थांबलेल्या. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नाही. दवाखान्याची बिलं डोंगराएवढी. लोकांनी पै पै करून साठवलेली जमापुंजी अवघ्या काही दिवसांत संपली. सुरुवातीला तर सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा पगारकपातीला सामोर जावे लागले; पण नंतर स्थिरस्थावर झाले. काही खासगी क्षेत्रातील लोकांना रोजगार गमवावा लागला. काहीजणांना पगार कपात झाली, तर काही ठिकाणी दिरंगाई होत होती. जितकी झळ शेतकरी आणि व्यावसायिक यांना बसली त्या तुलनेत नोकरदारांना त्रास कमी जाणवला. असंघटित आणि अकुशल कामगारांना चांगलाच फटका बसला.