शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याची उमेद - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती ...

मानवी स्वभावगुणदोषानुसार संकट जोपर्यंत आपला मार्ग अडवत नाही तोपर्यंत आपण आपल्या सुखांच्या मागे धावत सुटतो. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती झाली होती जेव्हा कोरोनाचा विषाणू दूर कुठेतरी वुहान प्रांतात धुमाकूळ घालत होता. तो जोपर्यंत आपल्या गावाच्या वेशीबाहेर आला नव्हता, तोपर्यंत सगळं आलबेल होतं; आणि मग एक दिवस अचानक लाॅकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, ऑक्सिजन पुरवठा, औषध, वैद्यकीय व्यवस्था, पीपीई किट यांसाठी धावाधाव सुरू झाली; पण यावेळी माणसाच्या लढाऊवृत्तीचा पुन:प्रत्यय आला. संपूर्ण मानवसमाज एक होऊन या जागतिक प्रलयंकारी संकटाशी लढताना दिसला. प्रत्येकजण आपापल्या परीने पर्याय शोधू लागला. जगण्यासाठी धडपडणाऱ्या गोरगरीब, असाहाय्य जनतेच्या मदतीला लोक उभे राहू लागले. स्थलांतरित होणाऱ्यांना कोणी खायला दिले, कोणी पाणी दिलं, कोणी जमेल तेवढी वाहतूक व्यवस्था केली. कोरोनाच्या साथीत हार न मानता कोणी घरात बसून, कोणी रस्त्यावर उतरून सरकारकडून येणाऱ्या आदेशांचे पालन केले. पहिल्यांदा पंधरा दिवसांसाठी सुरू केलेला लाॅकडाऊन वाढत गेला. दिलेल्या सूचना पाळून लोकांनी घरी शांत बसणे पसंत केले; पण कोरोनाचा प्रभाव काही कमी होताना दिसत नव्हता. फैलाव वाढत गेला तसा लाॅकडाऊन वाढत गेला. दूरवर शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांनी गावी जाणे सुरू केले. या स्थलांतरात काही दुर्घटना घडल्या तशी समाजातील मोठ्या मनाच्या लोकांनी आपली झोळी रिकामी करायला सुरुवात केली. काही विक्षिप्त लोकांनी कमरेला अमरत्वाचा पट्टा बांधून जणू आपण अनादिकाळापर्यंत जगणार आहोत, या अविर्भावात लुटालूट सुरू केली. मिळेल त्या मार्गाने कमाई केली तरी लोकांनी जगण्याचा संघर्ष थांबवला नाही.

एखादी अवघड चढण चढून डोंगरमाथ्यावर आल्यावर आपल्याला आपले उद्दिष्ट साध्य होईल, या आशेवर घसा सुकला, हातपाय थकले, अंगातील त्राण संपले तरी डोंगर चढून वर आलो आणि समोर खोल दरी दिसावी. त्याच्या पलीकडे जंगल आणि त्यांच्या पलीकडे पुसटशी कल्पना येईल, अशा पद्धतीने आपले ध्येय दिसले. आता उडी मारून कडेलोट करून जीवनयात्रा संपवायची नाही. कडेकपारीतून सरपटत खाली उतरावे. किती ओरखडले, कितीही दमलो, थकलो, कितीही असह्य झाले तरी हार न मानता मिळेल त्या मार्गाने पुढे जात राहावं. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून मार्गाक्रमण करीत राहावे. थांबावे, विचार करावा, विसावा घेऊन पुन्हा चालत राहावं ही जगण्याची उमेद आपल्याला कोरोनाच्या जंगलातून बाहेर घेऊन येत असताना दिसत आहे. या कठीण काळात काही चुका झाल्या. काही लोक चुकीचे वागले; पण मानवी गुणवैशिष्ट्यांनुसार चांगले ते धरावे. वाईट ते सोडून द्यावे. एकमेकांच्या जखमांवर फुंकर घालत पुढे सरकत राहावं.

कोरोनाच्या काळात अनेक जणांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. सगळ्यात पहिला फटका बसला शेतकरी आणि पोल्ट्रीमालक यांना. अचानक सगळे ठप्प झाले; त्यामुळे शेतमाल तोडणी, वाहतूक आणि वितरण थांबले. भाजीपाला अक्षरशः शेतात सडून गेला. कोणीतरी आवई उठवली की, कोरोना चिकन खाल्ल्याने होतो. क्षणात चिकनचे दर कवडीमोल झाले. त्याचबरोबर रस्त्यावर विक्री व्यवसाय करणारे, रोजंदारी मजूर, रिक्षाचालक यांची कुचंबणा झाली. त्यांना काही प्रमाणात शासकीय मदत रेशन आणि आर्थिक स्वरूपात आली. ज्यांनी उधारीवर माल विकला होता, असे व्यापारी अडचणीत आले; कारण काहीजण व्यवसाय सोडून परराज्यांत निघून गेले. तिथे उधारी बुडाली. अचानक आलेल्या दवाखान्याच्या बिलाची रक्कम बघून भलेभले घायकुतीला आले. उद्योग व्यवसाय बंद. कमाईच्या वाटा थांबलेल्या. भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नाही. दवाखान्याची बिलं डोंगराएवढी. लोकांनी पै पै करून साठवलेली जमापुंजी अवघ्या काही दिवसांत संपली. सुरुवातीला तर सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा पगारकपातीला सामोर जावे लागले; पण नंतर स्थिरस्थावर झाले. काही खासगी क्षेत्रातील लोकांना रोजगार गमवावा लागला. काहीजणांना पगार कपात झाली, तर काही ठिकाणी दिरंगाई होत होती. जितकी झळ शेतकरी आणि व्यावसायिक यांना बसली त्या तुलनेत नोकरदारांना त्रास कमी जाणवला. असंघटित आणि अकुशल कामगारांना चांगलाच फटका बसला.