शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

‘आवास’ अ‍ॅपद्वारे घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:53 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली दोन वर्षे रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची निश्चिती करण्यासाठी आता ‘आवास’ अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. डेटा एंट्री आॅपरेटर आणि प्रगणकांच्या साहाय्याने सर्वेक्षण करून ३0 सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ६00 डेटा ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली दोन वर्षे रखडलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची निश्चिती करण्यासाठी आता ‘आवास’ अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. डेटा एंट्री आॅपरेटर आणि प्रगणकांच्या साहाय्याने सर्वेक्षण करून ३0 सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने सर्व विभागीय आयुक्तांना दिले आहेत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ६00 डेटा एंट्री आॅपरेटर आणि ६00 प्रगणकांची नेमणूक करण्यात येणार आहे.सुरुवातीस अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या घरकुलांसाठी ‘अ’ यादी तयार करण्यात आली. या सर्वांमध्ये अल्पसंख्याकांचा वेगळा समावेश करून ‘ब’ यादी तयार करण्यात आली. या दोन्ही याद्यांमधून अपात्र ठरलेल्यांची ‘क’ यादी तयार करण्यात आली; तर आता नव्या घरकुलासाठी इच्छुक असणाऱ्यांची ‘ड’ यादी निश्चित करण्यात येत आहे. राज्यातील या सर्व अर्जांची संख्या लाखांच्या घरात आहे. अजूनही शासनाने मुभा दिल्याने आॅगस्टमध्ये झालेल्या गावसभेतील नावेही या यादीत समाविष्ट होणार आहेत.या सर्वांचे गाववार अर्ज आल्यानंतर आधीच्या व नंतरच्या इच्छुकांचे १३ निकषांच्या आधारे सर्वेक्षण होणार आहे. मात्र, हे सर्वेक्षण करण्यासाठी प्रस्थापित शासकीय कर्मचाºयांनी नकार दिला होता. त्यामुळे याबाबत पेच निर्माण झाला होता. आता यासाठी डेटा एंट्री आॅपरेटर नेमण्यात येणार असून, त्याने ३00 कुटुंबांचे सर्वेक्षण करावयाचे आहे. त्यासाठी प्रतिकुटुंब २0 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यानंतरग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षिका,केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांमधील वर्ग ३ व समकक्ष जिल्हा परिषदेतील इतर योग्य शासकीय कर्मचारी यांना प्रगणक म्हणून नेमण्यात येणार असून, त्यांनी ३00 कुटुंबांचे सर्वेक्षण करावयाचे असून त्यांना प्रतिकुटुंब पाच रुपये मानधन देण्यात येणार आहे. यानंतरच्या टप्प्यात विविध विभागांचे विस्तार अधिकारी पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार असून, त्यांना एकूणच दोन हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.सनियंत्रणासाठी अशी असेल समितीहे संपूर्ण सर्वेक्षण सनियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी या समितीचे सदस्य असतील आणि ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सदस्य सचिव राहतील.३0 सप्टेंबरपर्यंत मुदतहे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी ३0 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १२00 डेटा एंट्री आॅपरेटर आणि प्रगणक नेमण्यात येणार असून, २00 पर्यवेक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.