शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

क्रीडा संकुलप्रश्नी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By admin | Updated: May 21, 2017 00:43 IST

मैदाने आठवड्यात उपलब्ध करून द्या : गुडघाभर गवतातून विभागीय आयुक्तांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर उगवलेले गुडघाभर गवत, खुरटी झाडे यातून प्रत्यक्ष मार्ग काढत संपूर्ण संकुलाची शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून या क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वाकडे गेले नसून, त्याची दयनीय अवस्था पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची जागीच कानउघाडणी केली. किरकोळ स्वरूपात राहिलेली कामे पूर्ण करून ही क्रीडांगणे येत्या आठ दिवसांत खेळासाठी उपलब्ध करून द्यावीत, अशा सक्त सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी विभागीय क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या ठिकाणी असणारे फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक, कबड्डी, खो-खो मैदान, तसेच शूटिंग रेंज, रनिंग ट्रॅक, आदींच्या कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदारांकडे चौकशी केली. संपूर्ण विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रथम कामावर देखरेख करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नाराजी व्यक्त केली. जलतरण तलाव वगळता अन्य क्रीडांगणे तयार असली तरीही फुटबॉल, अ‍ॅथलेटिक, कबड्डी, खो-खोची क्रीडांगणे, शूटिंग रेंज यांची काही किरकोळ स्वरूपात राहिलेली कामे त्वरित पूर्ण करून ही क्रीडांगणे खेळाडूंच्या सुविधेसाठी त्वरित उपलब्ध करून द्या, असे विभागीय आयुक्त दळवी यांनी फटकारले. क्रीडा संकुलात वाढलेले गवत काढा, सर्व मैदानांची व्यवस्थित देखभाल करा, अशाही सूचना बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संकुलाची परिस्थिती पाहता क्रीडा उपसंचालक आणि जिल्हा क्रीडाअधिकारी यांच्यात समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शुटिंग रेंजचे काम पूर्ण झाले असले तरीही तेथे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे सुनावले. दुरुस्ती, देखभालीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळही नियुक्त करण्याचे त्यांनी यावेळी आदेश दिले. हे काय... स्विमिंग टँक?संकुलातील जलतरण तलाव पाहून त्यांनी ‘हे काय... स्विमिंग टँक?’ असा प्रश्न उपस्थित केला. तेथे उगवलेले गवत, खुरटी झाडे पाहून त्यांनी ठेकेदारासह अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. येथे असणाऱ्या अपूर्ण कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.गेट कुठायं... : संकुलाची पाहणी करताना दळवी यांनी प्रथम क्रीडा संकुलाचे गेट कुठायं? असा अधिकारी, ठेकेदारांना प्रश्न करून प्रवेशद्वारानजीक कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याबाबत खंत व्यक्त केली.