शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’ रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:45 IST

केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

ठळक मुद्दे नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दसाठी ‘पीपल्स’चे धरणे आंदोलन‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’च्या घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर : केंद्र सरकारने मंजूर केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करावा, या मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘रद्द करा...रद्द करा..., नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा...’अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहाच्या सुमारास जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर व प्रदेश सदस्य नंदकुमार गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केले. यावेळी कार्यकर्त्यांनी या कायद्याला विरोधासाठी जोरदार घोषणाबाजी केली.या ठिकाणी ‘भाकप’चे नेते दिलीप पवार, ‘माकप’चे चंद्रकांत यादव, लाल निशान पक्षाचे अतुल दिघे, कॉँग्रेसचे अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, राष्ट्रवादीचे अ‍ॅड. अशोकराव साळोखे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, आदी मान्यवरांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, वसंतराव मुळीक, चंद्रकांत यादव, अशोकराव साळोखे, अतुल दिघे, सोमनाथ घोडेराव, आदींनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात टीका केली. जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा व राज्यसभेत मंजूर करण्यात आलेला हा कायदा देशहिताचा नाही. यामुळे जनतेमध्ये दुही निर्माण होणार आहे. या जुलमी कायद्याने दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, मुस्लिम व इतर अल्पसंख्याक समाजाचे जीवन उद्ध्वस्त करणारा आहे. देशाने राज्यघटनेची तत्त्वप्रणाली स्वीकारली असताना धर्मावर आधारित व्यवस्था निर्माण करणे म्हणजे पुन्हा एकदा देश फाळणीकडे नेण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत आहे.आंदोलनात रमेश पाचगावकर, अब्बास शेख, जयसिंग कांबळे, आनंदा कांबळे, जितेंद्र कांबळे, निवास सडोलीकर, रतन कांबळे, विलास भास्कर, शिवाजी कांबळे, वाय. के. कांबळे, माधुरी कांबळे, मच्छिंद्र राजशिल, आदी सहभागी झाले होते.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीMorchaमोर्चाkolhapurकोल्हापूर