शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:23 IST

राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास  उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.

ठळक मुद्देसुभाषबाबूंचे ‘मार्च पास’, रवींद्रनाथ टागोरांचे गायन‘अक्षरगप्पा’मध्ये उलगडला राष्ट्रप्रतीकांचा इतिहास

कोल्हापूर : राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राष्ट्रध्वज, प्रतिज्ञा आणि राजमुद्रा या भारतीय राष्ट्रप्रतीकांचा इतिहास  उलगडण्यात आला. ‘अक्षरगप्पां’च्या १०३ व्या भागामध्ये पुणे येथील मिलिंद सबनीस यांनी अतिशय विस्ताराने या प्रतीकांच्या निर्मितीमागील अनेक कहाण्या यावेळी विशद केल्या.‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये सबनीस म्हणाले, ‘जन गण मन’ हे गीत पंचम जॉर्जच्या स्तुतिपर लिहिल्याचा आक्षेप घेतला जातो; परंतु अशा प्रकारचे स्तुतिपर गीत लिहिण्यासाठी टागोर यांनी नकार दिला होता; मात्र यानिमित्ताने जी परिषद झाली, त्यासाठी त्यांनी हे गीत लिहिले होते. जॉर्ज यांच्या स्वागतासाठीचे गीत अन्य कवींकडून लिहून घेण्यात आले होते. याबाबत टागोर यांनीच खुलासा केला होता.सारनाथच्या गांधारशैलीतील शिल्पस्तंभावरून तीन मुद्रांचा सिंह अशी आपली राजमुद्रा तयार करण्यात आली. या मुद्रेवर ‘सत्यमेव जयते’ हे शब्द असावेत, यासाठी आंध्रप्रदेशातील सी. व्ही. वारद यांनी भारत सरकारशी ३० वर्षे लढा दिला. यानंतर हे शब्द वापरण्याचे मान्य करण्यात आले. आंध्रप्रदेशातीलच निसर्गोपचार तज्ज्ञ, लेखक पॅडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी १९६२ मध्ये आपल्या शाळेतील मुलांसाठी तेलुगू भाषेत पहिल्यांदा प्रतिज्ञा लिहिली. नंतर ती सर्व देशभर मान्यता पावली.भारतीय संस्कृतीमध्ये ध्वजाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून सबनीस म्हणाले, १८५७ सालच्या बंडावेळी जो ध्वज तयार करण्यात आला होता, त्यामध्ये भाकरी आणि कमळ या चिन्हांचा वापर करण्यात आला होता. देशासाठी पहिला ध्वज तयार करण्याची कामगिरी मूळच्या विदेशातील असलेल्या भगिनी निवेदिता यांनी करून दाखविली. सभोवती असलेल्या १०८ ज्योती आणि त्यामध्ये इंद्राचे अस्त्र दाखवून त्यावर ‘वंदे मातरम्’ लिहिण्यात आले होते.ऋषी बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपले राष्ट्रगीत ठरले नव्हते; त्यामुळे १४ आॅगस्टच्या मध्यरात्री ‘जन गण मन’ आणि ‘वंदे मातरम्’ ही दोन्ही गीते गाइली गेली. रवींद्रनाथ टागोर यांच्यापासून ए. आर. रेहमान, अजय-अतुल यांच्यापर्यंत अनेकांनी ‘वंदे मातरम्’ला नवनवीन चाली लावत त्याचे सादरीकरण केले आहे. असे भाग्य केवळ ‘वंदे मातरम्’ या गीताला मिळाले. या गीतासाठी बंगालमधील मान्यवरांनी जितके योगदान दिले, त्यापेक्षा अधिक योगदान मराठी माणसांनी दिले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे ‘मार्च साँग’ म्हणून हे गीत म्हटले जाई, अशी माहिती सबनीस यांनी दिली. यावेळी सुभाषचंद्र बोस यांची चित्रफीत आणि टागोर यांनी गाइलेले ‘वंदे मातरम्’ ऐकायला मिळाल्याने श्रोते भारावून गेले. रवींद्र जोशी यांनी स्वागत केले, तर समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूरची आठवणसबनीस म्हणाले, कोल्हापूरचे अल्लादिया खाँ यांचे चिरंजीव बुर्जी खाँसाहेब यांनी ‘वंदे मातरम्’ गीत नव्याने बसविण्यासाठी घेतले होते; मात्र याच दरम्यान त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांचे हे काम अपूर्ण राहिले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर