शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा

By admin | Updated: August 30, 2015 23:09 IST

जयंत पवार : ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले

कोल्हापूर : महाराष्ट्रात बहुजनवादी जाणीवेचा इतिहास आणि ललित लेखनातून तो मांडण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरणाच्या सध्याच्या स्थितीत बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनातील ‘कथासंधी’ कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्य अकादमी आणि विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.ज्येष्ठ साहित्यिक पवार म्हणाले, पहिला नाटक लिहिण्यास सुरुवात केली. यावेळी लेखन करताना केवळ व्यक्तिवाद, केवळ समग्रवादी तत्त्व आवश्यक असून तरच, बहुजनांबद्दल लिहिता येते हे लक्षात आले. हे तत्त्व बाळगून लेखन सुरू केले. मुंबईसारख्या महानगरांतील जडणघडण आणि जागतिकीकरणाच्या काळातील उपेक्षित माणसांच्या विश्वाने मला सतत लेखननिर्मितीसाठी विषय पुरविले. जागतिकीकरणामुळे पूर्वसमाजात तुटलेपण आले आहे. त्यात बहुजन समाजाची उपेक्षा होत आहे. ती समजून घेण्याची गरज आहे.कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी साहित्य अकादमीची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक पवार यांच्या लेखनाचे विवेचन केले.यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शरद नावरे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. रुपाली कांबळे यांनी आभार मानले. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक पवारलिखित ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी सादर केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पवार यांनी ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकांच्या निर्मितीबाबत उपस्थितांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)