शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा

By admin | Updated: August 30, 2015 23:09 IST

जयंत पवार : ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले

कोल्हापूर : महाराष्ट्रात बहुजनवादी जाणीवेचा इतिहास आणि ललित लेखनातून तो मांडण्याचा प्रयत्न केला. जागतिकीकरणाच्या सध्याच्या स्थितीत बहुजनवादी जाणीवेचा इतिहासशोध महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयंत पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनातील ‘कथासंधी’ कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्य अकादमी आणि विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग व विदेशी भाषा विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा. डॉ. रणधीर शिंदे होते.ज्येष्ठ साहित्यिक पवार म्हणाले, पहिला नाटक लिहिण्यास सुरुवात केली. यावेळी लेखन करताना केवळ व्यक्तिवाद, केवळ समग्रवादी तत्त्व आवश्यक असून तरच, बहुजनांबद्दल लिहिता येते हे लक्षात आले. हे तत्त्व बाळगून लेखन सुरू केले. मुंबईसारख्या महानगरांतील जडणघडण आणि जागतिकीकरणाच्या काळातील उपेक्षित माणसांच्या विश्वाने मला सतत लेखननिर्मितीसाठी विषय पुरविले. जागतिकीकरणामुळे पूर्वसमाजात तुटलेपण आले आहे. त्यात बहुजन समाजाची उपेक्षा होत आहे. ती समजून घेण्याची गरज आहे.कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांनी साहित्य अकादमीची भूमिका स्पष्ट केली. प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक पवार यांच्या लेखनाचे विवेचन केले.यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शरद नावरे आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. रुपाली कांबळे यांनी आभार मानले. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक पवारलिखित ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या कथेचे अभिवाचन अतुल पेठे यांनी सादर केले. तसेच ज्येष्ठ साहित्यिक पवार यांनी ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकांच्या निर्मितीबाबत उपस्थितांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)