शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

इस्लामपुरात १९८५ ला घडले ऐतिहासिक सत्तांतर

By admin | Updated: November 6, 2016 00:32 IST

नवा कानमंत्र : भीमराव जाधव यांच्या रूपाने पवारांनी एकमेव जागा राखली-गाजलेल्या लढती

युनूस शेख --इस्लामपूर --एम. डी. पवार शहराचे अनभिषिक्त सम्राट. त्यांचा थाट-माट अन् रुबाब वेगळाच. ‘मला पाडणारा जन्माला यायचाय. मी मरेपर्यंत नगराध्यक्ष राहणार आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीतच मरणार..’ हा त्यांचा आणखी मोठा दर्प. याला वैतागलेली पाटील मंडळी सत्तांतराच्या ईर्षेने पेटलेली. मग साम, दाम, दंड, भेदाच्या नीतीबरोबरच, पैशाशिवाय काही चालत नाही अन् पैसा मागूनही मिळत नाही, अशा कानमंत्रातून १९८५ चे ऐतिहासिक सत्तांतर घडले.अण्णासाहेब डांगे हेही कोपीष्ट, पण जिगरबाज व्यक्तिमत्त्व, पाटील पार्टीतीलच. १९५७ मध्ये त्यांनी पक्षविरहित नागरिक संघटनेची स्थापना केली होती. मात्र तरीही १९६२ पर्यंत पवार पार्टी विरुध्द पाटील पार्टी असाच सामना रंगायचा. १९६२ मध्ये पाटील पार्टी नागरिक संघटनेत विलीन झाली. त्यानंतर ही सर्वपक्षीय आघाडी विरुध्द पवार पार्टी अशा लढती रंगू लागल्या. या लढतींवर पवारांचेच वर्चस्व असायचे.अण्णासाहेब चाणाक्ष. त्यांनी हिं. पा. गुरुजी व बाबूराव अण्णा अशा दोघांना कोरेआप्पांकडे धाडले. दोघांनी आप्पांची भेट घेतली. मात्र आप्पांनी तेवढा जोरकस प्रतिसाद दिला नाही. यादरम्यान प्रा. शामराव पाटील, विजयभाऊ पाटील, अशोकदादा पाटील असे तिघे डांगेंच्या परवानगीने नुकतेच राजकारणात आलेल्या जयंत पाटील यांना भेटायला गेले. मात्र सार्वजनिक जीवनात नवखे असलेल्या जयंतरावांनी पवारांशी पंगा घेण्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिघेही परतले.यादरम्यान डांगे स्वत: कोरेआप्पांना भेटायला क्रशरवर गेले. अण्णांनी संपूर्ण जबाबदारी घेतली. आप्पांनी होकार दिला. धनाढ्य म्होरक्या शोधण्याची मोहीम यशस्वी झाली होती.इकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना, तिकडे एम. डी. पवार साहेबांपुढे सगळे फासे उलटे पडत चालले होते. त्यांना चारही बाजूने घेरण्यात विरोधक यशस्वी झाले होते. डांगेंच्या नेतृत्वाखालील नागरिक संघटनेने उमेदवार शोधमोहीम राबवली. अशोकदादा पाटील, विजयभाऊ पाटील, आर. वाय. पाटील, डॉ. धनंजय परदेशी, अ‍ॅड. सुधीर पिसे, अ‍ॅड. अशोक वाळिंबे, सुंदरलाल शहा, आनंदराव मलगुंडे, भगवान पाटील, दिलावर पटवेकर असे एकापेक्षा एक उमेदवार मिळविले. विरोधात उभे राहणारांना पवारांच्याच स्टाईलने परस्पर दमबाजी करीत थांबविले जात होते. त्यातच पवारांच्या गोटातील बिनीचे शिलेदार नागरिक संघटनेत दाखल होत होते. निवडणूक लागली. नागरिक संघटनेकडून, ‘सत्तापरिवर्तन’ एवढीच नशा डोक्यात ठेवून जोरदार लढतीची तयारी झाली होती. पवारसाहेब स्वत: दोन प्रभागातून लढत होते. उरुणमधील प्रभागात त्यांच्याच ताटात जेवलेल्या शामराव खांबेंनी, तर शहरातील प्रभागात डॉ. धनंजय परदेशी यांनी पवार साहेबांचा पराभव केला. नागरिक संघटनेचा घोडा ३१ पैकी २९ जागांवर चौखूर उधळला, तर नांगरे-पाटील भावकीचा विरोध पत्करुन बंडखोरी केलेले बबन अनंत ऊर्फ बी. ए. पाटील यांनी ‘हत्ती’ची चाल या वादळातही कायम ठेवली. या ऐतिहासिक सत्तांतरात भीमराव शामराव जाधव यांच्यारूपाने पवारांनी एकमेव जागा राखली. या सत्तांतरानंतर काही काळातच एम. डी. पवार साहेबांचे निधन झाले. मात्र आजही ते शहरात दंतकथा बनून राहिले आहेत.विविध निकषांचा सारीपाट मांडला...अण्णासाहेब डांगे यांच्या डोक्यात मात्र इस्लामपूर पालिका सत्तापरिवर्तनाची गणिते घोळायची.एम. डी. पवार यांच्या पैशाला पैसा आणि दमाला दम देणारा, निवडून येण्याची क्षमता आणि सोबतीला माणूसबळ असणारा उमेदवार असावा, अशा निकषांचा सारीपाट मांडला गेला. या सारीपाटाला म्होरक्या हवा होता. तशी शोधमोहीमही सुरु होती. कोरेआप्पांच्या रुपाने संघटनेला धनवान म्होरक्या मिळाला. त्यानंतर इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीला रंग भरु लागला.