शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

चिकोत्राच्या पाणीसाठ्यासाठी हिरण्यकेशीचा पर्याय - चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 05:03 IST

आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना केली.

उत्तूर : आजरा तालुक्यातील आंबेओहळ, चिकोत्रा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यास हिरण्यकेशी नदीचा पर्याय शासनाच्या विचाराधीन असून, याबाबत निधीची तरतूद करू, आराखडा तयार करा अशा सूचना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना केली. वडकशिवाले (ता. आजरा) येथे विजयी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी घाटगे होते.पालकमंत्री पाटील यांच्या स्वागताची तयारी ग्रामस्थांनी जोरदार केली. पालकमंत्री यांच्या हस्ते खडीकरण-डांबरीकरणाचा प्रारंभ झाला. २० वर्षांनंतर सत्तांतर झाल्यामुळे गाव भाजपामय झाले होते.पाटील म्हणाले, वडकशिवाले गावाने इतके परिवर्तन केले आहे की, आमदार हसन मुश्रीफ यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात परिवर्तन झाले ही कौतुकाची बाब आहे.वडकशिवालेकरांनी गावतलावाचा गाळ श्रमदानातून काढून घ्यावा, अधिक पाणीसाठा झाल्यास त्याचा वापर शेतीसाठी करावा, शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा निधी देतो. आंबेओहळ, चिकोत्रात पाणीसाठ्याची गरज ओळखून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आर्दाळ-हालेवाडी-वडकशिवाले या ग्रामीण रस्त्यास मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजुरी मिळाली असून, या कामास सुरुवात होणार आहे.‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, २० वर्षांत गावचा विकास न झाल्याने परिवर्तन झाले आहे. फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’ राबवा असे आवाहन केले. आंबेओहळ, चिकोत्रातील पाणीसाठा करण्यासाठी प्रयत्नशील आहे.आजरा कारखाना अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुका भाजपामय झाला आहे. ३६ पैकी २२ ग्रामपंचायतींवर भाजपाचे कमळ फुलले आहे. सूतगिरणीसाठी सात कोटी बिनव्याजी, तर दोन कोटी २१ लाख शासनाने माफ केले आहे. त्यामुळे सूतगिरणीस चांगले दिवस आले आहेत.आपल्या विजयाबाबत बोलताना सरपंच संतोष बेलवाडे म्हणाले, दीड वर्षात आम्ही विकासकामे घेऊन जनतेसमोर गेलो. गावाने आम्हाला निवडून दिले आहे. आम्ही सारे एकदिलाने काम करूया यासाठी साथ द्या.केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय साहाय्यक प्रकाश बेलवाडे यांनी परिसरातील विविध गावच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसचे तसेच धरणग्रस्तांच्या जमिनींचे वाटप करण्यात आले.दादांनी घेतली ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल‘हिरण्यकेशीतून आंबेओहळ चिकोत्रासाठी पाणी योजना करा’ अशा आशयाचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी कागलच्या मेळाव्यात पाणीसाठ्यासंदर्भात चर्चा केली होती. ‘लोकमत’चे वृत्त चंद्रकांतदादांनी आवर्जून वाचन केले. याबाबत त्यांनी घाटगे यांच्याशी चर्चा केली.हारतुरेऐवजी गुलाबपुष्प : वडकशिवालेत विजयी मेळावा दिमाखात साजरा केला. पण, कोणत्याही नेत्यांना, पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार शाल, श्रीफळ व हार न नेता केवळ गुलाबपुष्प देऊन करण्यात येत होते याची कार्यक्रमस्थळी चर्चा झाली. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार