शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या दुरूस्तीसाठी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 12, 2014 23:26 IST

पंधरा दिवसांत रस्ता डांबरीकरण न झाल्यास

मलकापूर : मलकापूर शहरातून गेलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाची दुरवस्था झाली असून रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. येत्या पंधरा दिवसांत रस्ता डांबरीकरण न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा मलकापूर शहर विकास आघाडीच्यावतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग मलकापूर शहरातून गेला आहे. गेली दोन वर्षे रस्त्यात खड्डे पडले असून, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीच्या लोटच्या लोट हवेत पसरून स्थानिक व्यापाऱ्यांना याचा त्रास होत आहे. वाहनांचे अपघातदेखील होत आहेत. रस्त्यावरील धुळीमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. तरी संबंधित प्रशासनाने पंधरा दिवसांत रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शहर विकास आघाडीचे विरोधी नगरसेवक सुधाकर पाटील यांनी दिला आहे.निवेदनावर सेनेचे शहरप्रमुख सागर सणगर, नगरसेवक संजय मोरे, शौकत कळेकर, विनायक कुंभार, महेंद्र मोरे, विश्वास कांबळे आदींसह व्यापारी, नागरिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)