शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

महामार्ग देखभालची ‘हेल्पलाईन’ सलाईनवर !

By admin | Updated: May 7, 2015 00:17 IST

नादुरुस्त वाहनांना ‘स्टेपनी’चा भरवसा : ‘देखभाल’च्या गस्तीची जीप फक्त मृतदेह उचलायला; सुरक्षात्मक उपाययोजना करणार कोण ?

संजय पाटील-कऱ्हाड -महामार्गावर प्रत्येक तीन किलोमीटरच्या अंतरात ‘महामार्ग देखभाल’च्या ‘हेल्पलाईन’ क्रमांकाचे फलक लावले गेलेत. त्याचबरोबर या विभागाची वाहनेही वारंवार हायवेवर गस्त घालीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही ‘हेल्पलाईन’च ‘सलाईन’वर असल्याची परिस्थिती आहे. अपघात झाला की ‘महामार्ग देखभाल’च्या कर्मचाऱ्यांना पळता भुई थोडी होते; पण अपघात होऊ नये, यासाठी हा विभाग उपाययोजनाच करीत नसल्याचे दिसते.वाहनधारकांना महामार्गावरून प्रवास करताना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांना त्वरित मदत उपलब्ध व्हावी, यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक पथक तैनात असते. या ‘हेल्पलाईन’चा मोबाईल क्रमांकही प्रत्येक तीन किलोमीटर अंतरात फलकांवर लिहिण्यात आला आहे. वाहनधारकांनी आवश्यकते वेळी या क्रमांकावर फोन करून मदत मागणे अपेक्षित असते. तसेच महामार्ग देखभालची जीपही महामार्गावर गस्त घालीत असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात वाहनधारक संकटात असतानाही अनेकवेळा त्याला दिवसभर मदत उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. महामार्गावर अचानक वाहन नादुरुस्त झाल्यास संबंधित वाहनाच्या चालकाला मदतीचा गरज असते. तसेच महामार्गावर धोकादायक स्थितीत थांबलेल्या त्या वाहनाच्या व पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना करणेही आवश्यक असते. मात्र, महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांना धोकादायक स्थितीत थांबलेल्या अशा वाहनांचे काहीच सोयरसुतक नसल्याची परिस्थिती आहे. वाहन दिवसभर महामार्गावरच थांबलेले असताना ‘हेल्पलाईन’ची गस्त घालणारी जीप किंवा महामार्ग देखभालचा एकही कर्मचारी त्याकडे फिरकतही नाही, हे दुर्दैव. नादुरुस्त स्थितीत महामार्गावर थांबलेल्या वाहनावर इतर वाहने आदळून भीषण अपघात झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामध्ये काहीजणांना जीव गमवावा लागलाय तर काहीजण जायबंदी झालेत. या अपघातांची भीषणता एवढी असते की, अपघातग्रस्त वाहने तेथून हटवितानाही अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे असे अपघात होऊ नयेत, यासाठी नादुरुस्त वाहनाच्या आसपास सुरक्षात्मक उपाययोजना उभारण्याची जबाबदारी महामार्ग देखभाल विभाग व महामार्ग पोलिसांवर असते. मात्र, हे दोन्ही विभाग नादुरुस्त वाहनांची फिकीरच करीत नसल्याचे दिसते. पोलिसांची मदत ‘झुडपात’महामार्गावर वनवासमाची गावच्या हद्दीत महामार्ग पोलिसांची हेल्पलाईन क्रमांक लिहिलेला फलक उभारण्यात आला आहे. मात्र, हा फलक झुडपाआड गेल्याने दिसूनही येत नाही. परिणामी, एखाद्या वाहनचालकास गरज असल्यास त्याला संबंधित क्रमांक मिळणेही मुश्किल आहे. ‘बॅरिकेट’, ‘सेफ्टी कोन’ उपलब्धवाहनांच्या सुरक्षात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने महामार्ग देखभालकडे बॅरिकेटस् तसेच सेफ्टी कोनही उपलब्ध आहेत. गस्तीच्या जीपमध्ये या उपाययोजना उपलब्ध असतात. मात्र, वापर होतो का, हा संशोधनाचा विषय आहे.तीन जीप, दोन रुग्णवाहिकामहामार्गावर गस्त घालण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाकडे तीन जीप आहेत. तसेच दोन रुग्णवाहिकाही उपलब्ध आहेत. अपघात झाल्यास या रुग्णवाहिकांचा उपयोग केला जातो. तसेच संबंधित तीन जीपद्वारे दिवसभर महामार्गावर गस्त घालण्यात येत असल्याचे महामार्ग देखभाल विभाग सांगतो.१२६ किलोमीटरचा महामार्गकऱ्हाडला कार्यरत असलेल्या महामार्ग देखभाल विभागाच्या अखत्यारित सुमारे १२६ किलोमीटरचा महामार्ग आहे. या अंतरात मदत पुरविण्याची जबाबदारी येथील कर्मचाऱ्यांवर असते. तीन भागात विभाजनसेवा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून महामार्ग देखभाल विभागाने हे १२६ किलोमीटर अंतर तीन विभागांमध्ये विभागले असून, त्यामुळे मदत वेळेत पोहोचविता येते, असे या विभागाचे म्हणणे आहे. प्रत्येक भाग ४२ किलोमीटरचाकऱ्हाड ते शेंद्रे हा ४२ किलोमीटरचा एक भाग, कऱ्हाड ते किणी हा ४२ किलोमीटरचा दुसरा तर किणी ते कागल हा ४२ किलोमीटरचा तिसरा भाग आहे. या तीन भागात विभागणी करून महामार्ग देखभाल विभागाकडून मदत पुरविली जाते. सकाळपासून कोणी फिरकलच नाही !वारुंजी फाटा येथे कोल्हापूर-सातारा लेनच्या उड्डाणपुलावर बुधवारी दुपारपर्यंत एक ट्रक नादुरुस्त स्थितीत उभा होता. दुभाजकाशेजारीच अत्यंत धोकादायक स्थितीत थांबलेल्या त्या ट्रकच्या चालकाने स्वत:च ट्रकची स्टेपनी काही अंतरावर ठेवली होती. महामार्गावर पडलेली स्टेपनी पाहून इतर वाहनचालक आपली वाहने नियंत्रित करतील, अशी त्या चालकाला अपेक्षा होती. मात्र, स्टेफनी ठेवून ट्रक दुरुस्त करीत असताना त्याच्यासह ट्रकमधील इतर तिघांचा जीव टांगणीला लागलेला. महामार्ग पोलीस किंवा देखभाल विभागाचे कोणीही सकाळपासून इकडे फिरकलेच नसल्याचे संबंधित ट्रकच्या चालकाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.