शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावड्यात सर्वाधिक ५६२९ मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:58 IST

तानाजी पोवार। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह ...

तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह चंदगड, आजरा आणि राधानगरी तालुक्यांत गेल्या तीन महिन्यांत पावसाने उच्चांक गाठला. गगनबावडा तालुक्यातील गगनबावड्यामध्ये सर्वाधिक सुमारे ५ हजार ६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विश्ोष म्हणजे दि. ३० जुलै ते १० आॅगस्ट या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीतून सुमारे ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले. त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी या धरणांतून वाहून गेल्याची अधिकृत नोंद आहे.दि. ५ ते ११ आॅगस्टदरम्यान झालेल्या पावसाने २००५ च्या महापुराचे रेकॉर्डही तोडले. या पुरातून कोल्हापूरकर सध्या सावरत आहेत. जिल्ह्णात गगनबावड्यासह चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात गगनबावड्यामध्ये सर्वाधिक ५६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद असली तरीही चंदगड तालुक्यातील हिरे या गावात ४७३५ मि.मी. अशी, तर आजरा तालुक्यातील गवसे येथे ४४२५ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ राधानगरीमध्ये ३८८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्णात दूधगंगा (काळम्मावाडी), राधानगरी ही दोन प्रमुख धरणे होत. दूधगंगा धरणाची क्षमता २५.४० टीएमसी असली तरी या धरणातून सुमारे ४२ टीएमसी पाणी पुढे वाहून गेले. या धरणाचे पाणी तुरंबे, वाळवे, कागल, सुळकूडमार्गे कृष्णा नदीला मिळते. तेथून पुढे ते कर्नाटकात जाते; तर कोल्हापूरच्या महापुराचा संबंध तसा पंचगंगा नदीशी येतो. राधानगरी धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी असली तरीही या धरणातून सुमारे ८.९० टीएमसी पाणी नदीमार्गे वाहून गेले आहे. दि. ३० जुलै ते १० आॅगस्टपर्यंत पंचगंगा नदीतून एकूण ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले असले तरी त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतील आहे.राजाराम बंधाऱ्यावरून ७५ हजार क्युसेक पाणी वाहिलेपूरपरिस्थिती कालावधीत कसबा बावडा येथील राजाराम बंधाºयावरून सुमारे ७५ हजार क्युसेक पाणी पुढे गेल्याची नोंद आहे. यापूर्वीच्या नोंदीनुसार दरवेळी सरासरी ३२ हजार क्युसेक पाणी वाहून जाते; पण यंदा या वाहून जाणाºया पाण्याने विक्रम नोंदविला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत राजाराम बंधाºयावर १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.