शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गगनबावड्यात सर्वाधिक ५६२९ मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:58 IST

तानाजी पोवार। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह ...

तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह चंदगड, आजरा आणि राधानगरी तालुक्यांत गेल्या तीन महिन्यांत पावसाने उच्चांक गाठला. गगनबावडा तालुक्यातील गगनबावड्यामध्ये सर्वाधिक सुमारे ५ हजार ६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विश्ोष म्हणजे दि. ३० जुलै ते १० आॅगस्ट या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीतून सुमारे ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले. त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी या धरणांतून वाहून गेल्याची अधिकृत नोंद आहे.दि. ५ ते ११ आॅगस्टदरम्यान झालेल्या पावसाने २००५ च्या महापुराचे रेकॉर्डही तोडले. या पुरातून कोल्हापूरकर सध्या सावरत आहेत. जिल्ह्णात गगनबावड्यासह चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात गगनबावड्यामध्ये सर्वाधिक ५६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद असली तरीही चंदगड तालुक्यातील हिरे या गावात ४७३५ मि.मी. अशी, तर आजरा तालुक्यातील गवसे येथे ४४२५ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ राधानगरीमध्ये ३८८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्णात दूधगंगा (काळम्मावाडी), राधानगरी ही दोन प्रमुख धरणे होत. दूधगंगा धरणाची क्षमता २५.४० टीएमसी असली तरी या धरणातून सुमारे ४२ टीएमसी पाणी पुढे वाहून गेले. या धरणाचे पाणी तुरंबे, वाळवे, कागल, सुळकूडमार्गे कृष्णा नदीला मिळते. तेथून पुढे ते कर्नाटकात जाते; तर कोल्हापूरच्या महापुराचा संबंध तसा पंचगंगा नदीशी येतो. राधानगरी धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी असली तरीही या धरणातून सुमारे ८.९० टीएमसी पाणी नदीमार्गे वाहून गेले आहे. दि. ३० जुलै ते १० आॅगस्टपर्यंत पंचगंगा नदीतून एकूण ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले असले तरी त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतील आहे.राजाराम बंधाऱ्यावरून ७५ हजार क्युसेक पाणी वाहिलेपूरपरिस्थिती कालावधीत कसबा बावडा येथील राजाराम बंधाºयावरून सुमारे ७५ हजार क्युसेक पाणी पुढे गेल्याची नोंद आहे. यापूर्वीच्या नोंदीनुसार दरवेळी सरासरी ३२ हजार क्युसेक पाणी वाहून जाते; पण यंदा या वाहून जाणाºया पाण्याने विक्रम नोंदविला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत राजाराम बंधाºयावर १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.