शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

गगनबावड्यात सर्वाधिक ५६२९ मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:58 IST

तानाजी पोवार। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह ...

तानाजी पोवार।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्णात गगनबावडा तालुका हा मुसळधार पावसाचे ठिकाण मानले जात असले तरी त्यासह चंदगड, आजरा आणि राधानगरी तालुक्यांत गेल्या तीन महिन्यांत पावसाने उच्चांक गाठला. गगनबावडा तालुक्यातील गगनबावड्यामध्ये सर्वाधिक सुमारे ५ हजार ६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. विश्ोष म्हणजे दि. ३० जुलै ते १० आॅगस्ट या कालावधीत मुसळधार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीतून सुमारे ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले. त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी या धरणांतून वाहून गेल्याची अधिकृत नोंद आहे.दि. ५ ते ११ आॅगस्टदरम्यान झालेल्या पावसाने २००५ च्या महापुराचे रेकॉर्डही तोडले. या पुरातून कोल्हापूरकर सध्या सावरत आहेत. जिल्ह्णात गगनबावड्यासह चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात गगनबावड्यामध्ये सर्वाधिक ५६२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ आजरा तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद असली तरीही चंदगड तालुक्यातील हिरे या गावात ४७३५ मि.मी. अशी, तर आजरा तालुक्यातील गवसे येथे ४४२५ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ राधानगरीमध्ये ३८८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्णात दूधगंगा (काळम्मावाडी), राधानगरी ही दोन प्रमुख धरणे होत. दूधगंगा धरणाची क्षमता २५.४० टीएमसी असली तरी या धरणातून सुमारे ४२ टीएमसी पाणी पुढे वाहून गेले. या धरणाचे पाणी तुरंबे, वाळवे, कागल, सुळकूडमार्गे कृष्णा नदीला मिळते. तेथून पुढे ते कर्नाटकात जाते; तर कोल्हापूरच्या महापुराचा संबंध तसा पंचगंगा नदीशी येतो. राधानगरी धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी असली तरीही या धरणातून सुमारे ८.९० टीएमसी पाणी नदीमार्गे वाहून गेले आहे. दि. ३० जुलै ते १० आॅगस्टपर्यंत पंचगंगा नदीतून एकूण ६६.१४ टीएमसी पाणी वाहून गेले असले तरी त्यापैकी फक्त १२ टीएमसी पाणी हे राधानगरी, तुळशी, कुंभी आणि कासारी धरणांतील आहे.राजाराम बंधाऱ्यावरून ७५ हजार क्युसेक पाणी वाहिलेपूरपरिस्थिती कालावधीत कसबा बावडा येथील राजाराम बंधाºयावरून सुमारे ७५ हजार क्युसेक पाणी पुढे गेल्याची नोंद आहे. यापूर्वीच्या नोंदीनुसार दरवेळी सरासरी ३२ हजार क्युसेक पाणी वाहून जाते; पण यंदा या वाहून जाणाºया पाण्याने विक्रम नोंदविला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत राजाराम बंधाºयावर १२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.