शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शिवनाकवाडीच्या मुलांना मदतीचा हात

By admin | Updated: September 15, 2016 01:17 IST

नागरिकांचा पुढाकार : अनेकांनी दाखविली ‘मातृत्व’ देण्याची तयारी--लोकमतचा प्रभाव

कुरुंदवाड : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील निराधार मुलांच्या मदतीसाठी अनेकांचे हात सरसावले. रोख रकमेसह शैक्षणिक साहित्य, धान्य, आरोग्यसेवा देण्याबरोबर मायेचा कायमस्वरूपी आधारवजा हात अनेकांनी पुढे केला. मदत घेताना निराधार मुलांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यामुळे मदत देणारेही काही काळ थबकत होते व डोळ्यांतील अश्रू पुसत मुलांना आधार देत होते. मदत देणारे दातृत्ववान व निराधार मुलांनीही ‘लोकमत’चे आभार मानले.शिवनाकवाडी येथे सोमवारी (दि. १२) पत्नी रूपाली माळी हिचा पती राजेंद्र माळी याने खून केला होता. त्यामुळे कोमल (वय १७), मधुरा (१५), या दोन मुली व शुभम ( १५) हा मुलगा निराधार झाले आहेत. मृत रूपाली याचे आई-वडील हयात नसल्याने, ती यंत्रमागावर कांड्या भरून संसाराचा गाडा चालवित होती. पती राजेंद्र व्यसनी असल्याने गेल्या काही वर्षांपासून घराबाहेबरच असे. त्यामुळे अद्याप अजान असलेल्या या मुलांची जबाबदारी रूपालीवरच होती. माय-लेकरे एकमेकांना आधार देत जगत असल्याने बापाने अचानक येऊन आईचा खून केल्याने मुले निराधार बनली आहेत. त्यामुळे या मुलांना आधार देण्यासाठी ‘लोकमत’ने बुधवार (दि. १४) च्या अंकात ‘शिवनाकवाडीतील मुलांना हवाय मायेचा हात!’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.या बातमीने समाजातील संवेदनशील मनाला मायेचा पाझर फुटून अनेकांचे हात मदतीसाठी व मायेचा आधार देण्यासाठी या कुटुंबाकडे धावले. त्यामुळे एरवी निर्जन परिसर असलेला हा भाग दातृत्ववानांच्या गर्दीने फुलून गेला आहे. स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे, डॉ. कुमार पाटील, चंदू बिरोजे, दिलीप कोळी (शिरढोण), चंद्रकांत मस्के, दीपक बंडगर, देवगोंडा आलासे (हेरवाड) यांनी मोठी आर्थिक मदत केली. शिवाय शिक्षणाचा खर्च उचलण्याचीही जबाबदारी घेतली.शिरढोण साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. कुमार पाटील यांनी तिन्ही मुलांची आरोग्य तपासणी व औषधे मोफत दिली. तसेच तिन्ही मुलांच्या बारावी बोर्ड परीक्षेची फी भरण्याचे आश्वासन दिले. शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे सरकार यांनी शैक्षणिक साहित्य देऊन तिन्ही मुलांचे शैक्षणिक खर्च देण्याचे तसेच त्याच्या मूळ गावचे अंबप (ता. हातकणंगले) येथील वडिलार्जित असेल ती मालमत्ता मुलगा शुभम याच्या नावे करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमाचे प्रमुख बाबासो पुजारी यांनी नातलगांची तयारी असेल, तर तिन्ही मुलांची जानकी आश्रमात राहण्याची, शिक्षणाची सोय करण्यासाठी नातलगांकडे परवानगी मागितली आहे. कोल्हापूर येथील सामाजिक महिला कार्यकर्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर निराधार मुलांना पाच हजारांची मदत दिली आहे. अनेकांचे मदतीचे हात पुढे येत रोख रक्कम, शैक्षणिक साहित्य, धान्य याचबरोबर मायेचा आधार देत आहेत. मदत घेताना मात्र या मुलांचे अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे पाहणारे व मायेचा आधार देताना परिस्थितीचा नूरच पालटत आहे. त्यामुळे निराधार मुलांची माहिती समाजासमोर मांडल्याने दातृत्ववानातून तर ‘लोकमत’मुळेच पुन्हा मातृत्वाचा आधार मिळाल्याने घेणारे अन् देणारे दोघेही ‘लोकमत’चे आभार मानत आहेत. (वार्ताहर)‘कोमल’च्या मदतीसाठी शिक्षकही धावले‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था पोलिसांची असते. अशा दररोजच्या घटनांना त्यांना सामोरे जावे लागत असते. मात्र, शिवनाकवाडीच्या या निराधार मुलांकडे पाहून इचलकरंजी विभागीय पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांचेही मन हेलावून गेले. त्यांनी या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत कोमल शिकत असलेल्या गंगामाई गर्ल्स हायस्कूल व महाविद्यालयातील शिक्षकांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. ग्रामस्थांचा पुढाकारमाळी कुटुंबीय मूळचे शिवनाकवाडीचे नसतानाही गावच्या लोकांनी त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रथम मदतीचा हात दिला. घटना घडल्यापासून दवाखाना, अंत्यसंस्कार खर्च ग्रामस्थांनी केला आहे. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेश काळे, सरपंच राजेंद्र खोत, पोलिसपाटील विवेक पाटील, विजय खोत, संजय खोत, लक्ष्मण मिलके, राजू कोरवी, आदींनी पुढाकार घेतला आहे.