शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

येळ्ळुरात कर्नाटक पोलिसांचा हैदोस

By admin | Updated: July 28, 2014 00:33 IST

‘तो’ फलक पुन्हा हटवला : मराठी भाषिक, महिला, विद्यार्थ्यांना घरांत घुसून बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड

बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून हैदोस घातला. पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी भाषिकांना पोलिसांनी लक्ष्य केले.विराट गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, शिवाजीनगर आणि शिवाजी रोड या भागांत पोलिसांनी खाकी वर्र्दीतील गुंड असल्याप्रमाणे वर्तन केले. गावातील मराठी भाषिकांच्या घरांचे बंद दरवाजे तोडून पुरुष, महिला, तरुणांना त्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: झोडपून काढले. घरांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी-चारचाकी वाहनांचीही मोडतोड केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होते; पण त्यांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. आपल्या घरात दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन बसलेल्या /पान ४ वरकेंद्र शासनाकडे दाद मागणार : मुख्यमंत्रीमराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत़ कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही़, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते़ ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो़ आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.तीन हजार पोलीस.... पहाटेची कारवाईरविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस गाड्यांचे ताफे, तीन हजारांहून अधिक पोलीस अशा फौजफाट्यासह जिल्हाधिकारी एन. जयराम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. चंद्र गुप्त यांच्या नेतृत्वात गावाच्या सर्व सीमा बंद केल्या. पोलीस बंदोबस्तात हा फलक पुन्हा उद्ध्वस्त केला. गावात रांगोळी घालणाऱ्या महिलांना घराबाहेर पडू दिले नाही. ज्यांनी ही घटना पाहिली, जाब विचारला, त्या महिलांना अक्षरश: बेदम मारहाण केली.मराठी भाषिकांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध व्यक्त करत निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने उद्या, सोमवारी ‘निपाणी बंद’ची हाक दिली आहे; तर सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत १४४ कलम व जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिला आहे . / वृत्त ४