शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

येळ्ळुरात कर्नाटक पोलिसांचा हैदोस

By admin | Updated: July 28, 2014 00:33 IST

‘तो’ फलक पुन्हा हटवला : मराठी भाषिक, महिला, विद्यार्थ्यांना घरांत घुसून बेदम मारहाण, वाहनांची तोडफोड

बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी सहाच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून हैदोस घातला. पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी भाषिकांना पोलिसांनी लक्ष्य केले.विराट गल्ली, कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, शिवाजीनगर आणि शिवाजी रोड या भागांत पोलिसांनी खाकी वर्र्दीतील गुंड असल्याप्रमाणे वर्तन केले. गावातील मराठी भाषिकांच्या घरांचे बंद दरवाजे तोडून पुरुष, महिला, तरुणांना त्यांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी अक्षरश: झोडपून काढले. घरांच्या काचा फोडल्या. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी-चारचाकी वाहनांचीही मोडतोड केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य अर्जुन गोरल हे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होते; पण त्यांनाही पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले. आपल्या घरात दोन महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन बसलेल्या /पान ४ वरकेंद्र शासनाकडे दाद मागणार : मुख्यमंत्रीमराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत़ कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही़, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते़ ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो़ आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.तीन हजार पोलीस.... पहाटेची कारवाईरविवारी पहाटेच्या सुमारास पोलीस गाड्यांचे ताफे, तीन हजारांहून अधिक पोलीस अशा फौजफाट्यासह जिल्हाधिकारी एन. जयराम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. चंद्र गुप्त यांच्या नेतृत्वात गावाच्या सर्व सीमा बंद केल्या. पोलीस बंदोबस्तात हा फलक पुन्हा उद्ध्वस्त केला. गावात रांगोळी घालणाऱ्या महिलांना घराबाहेर पडू दिले नाही. ज्यांनी ही घटना पाहिली, जाब विचारला, त्या महिलांना अक्षरश: बेदम मारहाण केली.मराठी भाषिकांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध व्यक्त करत निपाणी विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या वतीने उद्या, सोमवारी ‘निपाणी बंद’ची हाक दिली आहे; तर सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत १४४ कलम व जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिला आहे . / वृत्त ४