शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:57 IST

बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्रीशहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला जागोजागी विक्रीचे स्टॉल

कोल्हापूर : बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे या काजूबियांविषयी जाणकारांकडून माहिती घेतल्यानंतर हा निकृष्ट दर्जाचा माल असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचा दर्जा तपासून घेणे गरजेचे आहे.लॉकडाऊनच्या काळात कोणतीही वस्तू घरापर्यंत पोहोचवण्याचे काम विक्रेते चोख पार पाडू लागले आहेत. विक्री होणाऱ्या वस्तूंचा दर्जा कोठेही तपासला जात नाही. यातून अनेक वेळा खाद्यपदार्थांची होणारी विक्री आरोग्यास हानिकारक ठरू शकते. असाच प्रकार सध्या शहरातील अनेक ठिकाणी घडत आहे.

काही विक्रेते निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची विक्री कमी किमतीत करीत आहेत. सामान्य जनतेसाठी काजूचा वापर वाढत्या किमतीतून दुरापास्त झाला आहे. एक किंवा दोन काजूबिया खायला मिळणे म्हणजे भाग्याचे काम आहे.

सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या काजूबियांचा दर ७०० ते ८०० रुपये किलो असा आहे. याचाच परिणाम म्हणून अजाणतेपणाने नागरिक रस्त्याच्या कडेला टेम्पो अथवा स्टॉल लावून प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपये किलो अशा दराने काजूबियांची विक्री करीत आहेत.

कमी किमतीत मिळते म्हटल्यानंतर अनेकजण त्याचा दर्जा न तपासताच ती वस्तू खरेदी करण्याकडे आकर्षित होतात. अशाच प्रकारे सध्या निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विकल्या जात आहेत. काही प्रमाणात तुरट असणाऱ्या या काजूबियांमुळे घसा खवखवणे असे शरीरास अपाय होऊ शकतात.

विशेष म्हणजे हा काजू आजरा, चंदगड, तळकोकणातील काजू कारखान्यांतून खराब दर्जाचा म्हणून बाजूला ठेवलेला असतो. कमी किमतीत हा माल आणून काहीजण त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून अशा प्रकारे शहरासह ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत.

कोरोनामुळे आधीच सर्वांचा जीव मेटाकुटीला आला आहे. याचे गांभीर्य जाणून आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाने अशा निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चांगल्या काजूबियांचा भाव प्रतिकिलो ७००-८००, तर काजू पाकळीचा दर ६०० रुपये किलो व तुकडा काजूचा भाव ५५० रुपये प्रतिकिलो आहे. सध्या रस्त्याच्या कडेला पॅकिंग करून विकल्या जाणाऱ्या काजूबिया म्हणजे कारखान्यांतून नाकारलेला व आतून कीड लागलेला माल आहे. त्यामुळे हा माल तेलकट व खाल्ल्यानंतर घसा खवखवणे असे प्रकार होत आहेत.- चिंतन शाह, ड्रायफ्रुटस‌्चे घाऊक व्यापारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShoppingखरेदी