शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 16:57 IST

बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाच्या काजूबियांची शहरात जोरात विक्रीशहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला जागोजागी विक्रीचे स्टॉल

कोल्हापूर : बाजारात सद्य:स्थितीत चांगल्या काजूचा भाव प्रतिकिलो ७०० ते ८०० रुपये असा आहे. मात्र, शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी हा काजू ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो असा पॅकिंग करून विकला जात आहे. त्यामुळे या काजूबियांविषयी जाणकारांकडून माहिती घेतल्यानंतर हा निकृष्ट दर्जाचा माल असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचा दर्जा तपासून घेणे गरजेचे आहे.लॉकडाऊनच्या काळात कोणतीही वस्तू घरापर्यंत पोहोचवण्याचे काम विक्रेते चोख पार पाडू लागले आहेत. विक्री होणाऱ्या वस्तूंचा दर्जा कोठेही तपासला जात नाही. यातून अनेक वेळा खाद्यपदार्थांची होणारी विक्री आरोग्यास हानिकारक ठरू शकते. असाच प्रकार सध्या शहरातील अनेक ठिकाणी घडत आहे.

काही विक्रेते निकृष्ट दर्जाच्या काजूबियांची विक्री कमी किमतीत करीत आहेत. सामान्य जनतेसाठी काजूचा वापर वाढत्या किमतीतून दुरापास्त झाला आहे. एक किंवा दोन काजूबिया खायला मिळणे म्हणजे भाग्याचे काम आहे.

सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या काजूबियांचा दर ७०० ते ८०० रुपये किलो असा आहे. याचाच परिणाम म्हणून अजाणतेपणाने नागरिक रस्त्याच्या कडेला टेम्पो अथवा स्टॉल लावून प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपये किलो अशा दराने काजूबियांची विक्री करीत आहेत.

कमी किमतीत मिळते म्हटल्यानंतर अनेकजण त्याचा दर्जा न तपासताच ती वस्तू खरेदी करण्याकडे आकर्षित होतात. अशाच प्रकारे सध्या निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विकल्या जात आहेत. काही प्रमाणात तुरट असणाऱ्या या काजूबियांमुळे घसा खवखवणे असे शरीरास अपाय होऊ शकतात.

विशेष म्हणजे हा काजू आजरा, चंदगड, तळकोकणातील काजू कारखान्यांतून खराब दर्जाचा म्हणून बाजूला ठेवलेला असतो. कमी किमतीत हा माल आणून काहीजण त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून अशा प्रकारे शहरासह ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत.

कोरोनामुळे आधीच सर्वांचा जीव मेटाकुटीला आला आहे. याचे गांभीर्य जाणून आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाने अशा निकृष्ट दर्जाच्या काजूबिया विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

चांगल्या काजूबियांचा भाव प्रतिकिलो ७००-८००, तर काजू पाकळीचा दर ६०० रुपये किलो व तुकडा काजूचा भाव ५५० रुपये प्रतिकिलो आहे. सध्या रस्त्याच्या कडेला पॅकिंग करून विकल्या जाणाऱ्या काजूबिया म्हणजे कारखान्यांतून नाकारलेला व आतून कीड लागलेला माल आहे. त्यामुळे हा माल तेलकट व खाल्ल्यानंतर घसा खवखवणे असे प्रकार होत आहेत.- चिंतन शाह, ड्रायफ्रुटस‌्चे घाऊक व्यापारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShoppingखरेदी