शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम राहिले. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेले दोन दिवस महाराष्ट्रात हवामानात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला. साधारणता तासभर पाऊस झाल्यानंतर काहीशी उसंत घेतली. दहानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले; पण त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणासह आकाश गच्च झाले.

अवकाळी पावसाने भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी पिकाला थंडीची गरज असते, मात्र थंडी गायब होऊन पाऊस सुरू झाल्याने वाढीवर परिणाम होणार आहे. पावसामुळे गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत. ऊसतोड थांबली आहेच, त्यात जळण भिजत असल्याने गुऱ्हाळघरे बंद आहेत. विटा भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आंबे मोहराला फटका

आंब्याला मोहर आला आहे, पण ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊस होत असल्याने मोहराला फटका बसणार आहे. मोहर गळती लागणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उसाची वाहने आडकली

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे, गेले दोन दिवस पाऊस सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने शेतात आडकली जात आहेत. त्यामुळे ऊस तोडणी थांबली असून रस्त्यालगतचे उसाचे प्लॉट तोडले जात आहेत.