शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम राहिले. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेले दोन दिवस महाराष्ट्रात हवामानात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला. साधारणता तासभर पाऊस झाल्यानंतर काहीशी उसंत घेतली. दहानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले; पण त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणासह आकाश गच्च झाले.

अवकाळी पावसाने भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी पिकाला थंडीची गरज असते, मात्र थंडी गायब होऊन पाऊस सुरू झाल्याने वाढीवर परिणाम होणार आहे. पावसामुळे गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत. ऊसतोड थांबली आहेच, त्यात जळण भिजत असल्याने गुऱ्हाळघरे बंद आहेत. विटा भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आंबे मोहराला फटका

आंब्याला मोहर आला आहे, पण ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊस होत असल्याने मोहराला फटका बसणार आहे. मोहर गळती लागणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उसाची वाहने आडकली

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे, गेले दोन दिवस पाऊस सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने शेतात आडकली जात आहेत. त्यामुळे ऊस तोडणी थांबली असून रस्त्यालगतचे उसाचे प्लॉट तोडले जात आहेत.