शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

काेल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काेल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. दिवसभर उघडझाप राहिली असली तरी ढगाळ हवामान कायम राहिले. अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांची ऊस तोडणीची कामे ठप्प झाली आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेले दोन दिवस महाराष्ट्रात हवामानात बदल झाला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू झाला. साधारणता तासभर पाऊस झाल्यानंतर काहीशी उसंत घेतली. दहानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले; पण त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणासह आकाश गच्च झाले.

अवकाळी पावसाने भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. रब्बी पिकाला थंडीची गरज असते, मात्र थंडी गायब होऊन पाऊस सुरू झाल्याने वाढीवर परिणाम होणार आहे. पावसामुळे गुऱ्हाळघरांच्या चिमण्या थंडावल्या आहेत. ऊसतोड थांबली आहेच, त्यात जळण भिजत असल्याने गुऱ्हाळघरे बंद आहेत. विटा भिजल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आंबे मोहराला फटका

आंब्याला मोहर आला आहे, पण ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊस होत असल्याने मोहराला फटका बसणार आहे. मोहर गळती लागणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

उसाची वाहने आडकली

साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे, गेले दोन दिवस पाऊस सुरू असल्याने ऊस वाहतूक करणारी वाहने शेतात आडकली जात आहेत. त्यामुळे ऊस तोडणी थांबली असून रस्त्यालगतचे उसाचे प्लॉट तोडले जात आहेत.