शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी, पुराचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यातील ३४ हजार शेतकऱ्यांचे ९,३७८ हेक्टरवर नुकसान

By राजाराम लोंढे | Updated: August 26, 2025 18:49 IST

कृषी विभागाचा अंदाज; तीन महिन्यांत दुसऱ्यांदा नुकसान

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार पाऊस कोसळला. साधारणता तेरा दिवसांत तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील ३४ हजार १६७ शेतकऱ्यांचे ९३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने काढला आहे. प्रत्यक्ष पंचनाम्याच्या कामास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. तीन महिन्यात शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा फटका बसला आहे.यंदा मे महिन्यापासूनच जिल्ह्याला वळीव पावसाने झोडपून काढले. ऐन उन्हाळ्यात उन्हाळी पिके कुजली होती. यामध्ये जिल्ह्यातील १० हजार २८४ शेतकऱ्यांचे १८६९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जून, जुलै महिन्यात पावसाने झोडपून काढले. या महिन्यात १० ऑगस्टपर्यंत पावसाची उघडीप राहिली. त्यानंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली असून सलग तेरा दिवस जोरदार पाऊस कोसळला.जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला, विशेष म्हणजे नदी, ओढ्या काठच्या पिकांमध्ये सलग आठ दिवस पाणी राहिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने या नुकसानीचा नजर अंदाज केला असून ९३७८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, सोमवारपासून स्थानिक पातळीवर पंचनाम्याचे काम सुरु झाले आहे. कृषी सहायक, गाव कामगार तलाठी, ग्रामसेवकांना पंचनामा करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सरासरी पाऊसमहिना - पाऊस मिलीमीटर

  • जून-  ४१५.४
  • जुलै- ३३१.७
  • १ ते १० ऑगस्ट- २९.५
  • ११ ते २५ ऑगस्ट- २४८.३

मे महिन्यातील मान्सूनपूर्व पावसाने झालेले नुकसानबाधित शेतकरी -  क्षेत्र - हेक्टर नुकसान१०,२८४  - १८६९  - ३.४५ कोटी

ऑगस्टमधील अतिवृष्टी, पुराने नुकसानीचा नजर अंदाज

  • बाधित गावे - ४३५
  • शेतकरी संख्या - ३४,१६७

पिकनिहाय बाधित क्षेत्र हेक्टर -

  • भात- १७७८.४५
  • ऊस- ५९०७.२५
  • सोयाबीन - ६६३
  • नाचणी - ४३.४०
  • भुईमूग - ६५५.४०
  • भाजीपाला - १२७.८०
  • फळपीक - ५२.३०
  • फुलपिके - ३.००

पुराचे पाणी कमी होऊ लागल्याने सोमवारपासून पंचनाम्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठ दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. - जालिंदर पांगरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कोल्हापूर)