शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

ऐन मान्सूनमध्ये ठिकठिकाणी वळीव पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऐन मान्सूनमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. भात, भुईमूग पिकांनी माना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ऐन मान्सूनमध्ये पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. भात, भुईमूग पिकांनी माना टाकल्या आहेत. बुधवारी काेल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेली पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. भात, भुईमूग, सोयाबीन पिके अडचणीत आली आहेत. राेज कडकडीत ऊन पडत असल्याने चिंता वाढली आहे. बुधवारी सकाळी तर रस्त्यावरून जाताना अंग भाजत होते. इतके कडक ऊन होते. या उन्हाने पिके करपू लागल्याने ती वाचवायची कशी? या चिंतेत शेतकरी आहेत.

बुधवारी दुपारनंतर जिल्ह्यातील वातावरणात काहीसा बदल झाला. काही ठिकाणी पाऊस कोसळला, तर कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरण राहिले. आज, गुरुवारीही जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वळीव का असेना, पण पावसाचे वातावरण तयार झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवार (दि. ११) पासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

फोटो ओळी :

१) सांगरूळ परिसरात पाण्याअभावी माळरानावरील भात पिके अशी करपली आहेत. (फोटो-०७०७२०२१-कोल-शेती)

२) भुईमुगाचे पीक पिवळे पडू लागले आहे. (फोटो-०७०७२०२१-कोल-शेती०१)