शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

इचलकरंजीत दोन गटांत जोरदार हाणामारी

By admin | Updated: March 7, 2015 01:03 IST

परस्परविरोधी तक्रारी दाखल : दोन्ही गटातील बाराजणांना अटक

इचलकरंजी : होलिकोत्सवानिमित्त उत्तर भारतीय कामगारांची रंगपंचमी, तर महाराष्ट्रीयन तरुणांची धुलवडीची पार्टी यादरम्यान पाणी देण्याच्या कारणावरून दोन्ही तरुणांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. एका यंत्रमाग कारखान्यासमोर शुक्रवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणाची मिटवामिटवी सुरू असल्याने दिवसभर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर सुमारे दीडशे तरुणांचा जमाव घुटमळत होता. मात्र, तडजोड न झाल्याने रात्री उशिरा परस्परविरोधी तक्रारी पोलिसांत नोंद झाल्या. योगेश गारवे (२३, रा. योगायोगनगर) याने दिलेल्या तक्रारीत शिवाजीकुमार बिन व इतर आठ ते दहा कामगारांनी आपल्यासह मित्रांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. छोटूकुमार अंतू बिन (वय १९) याने दिलेल्या तक्रारीत योगेश गारवे याच्यासह पाचजणांनी लाथाबुक्क्यांनी व ट्युबलाईटच्या लोखंडी पट्टीने मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल करून दोन्ही गटातील बाराजणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सुभाष बिन, रामेश्वरप्रसाद बिन, धरभरण बिन, पिंटूकुमार बिन, रामप्रसाद बिन, छोटूकुमार बिन, पिंटकुमार बिंद (सर्व रा. उत्तर प्रदेश) आणि देवधन सासणे व योगेश गाडवे (दोघे रा. कलानगर परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.