शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

पावसाचा लोकांना ताप परंतू जिल्ह्यात पिकांना लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 15:23 IST

रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

ठळक मुद्देपिकांना हा पाऊस लाभदायक आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणारभातासह भुईमूगालाही हा पाऊस पोषकच यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती

कोल्हापूर : रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

अलिकडील कांही वर्षात जून-जुलैमध्ये हक्काच्या महिन्यांत पाऊस ओढ देतो व तो पुढील कांही महिन्यांत सरकतो असा अनुभव येत आहे. यंदाही त्याचेच प्रत्यंतर येत आहे. सलग आठवडाभर दिवसभर चक्क लखलखीत ऊन पडत आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसावा असा उष्म्याचा त्रास होत आहे आणि दुपारनंतर मात्र पाऊस झोडपून काढत आहे.

बुधवारी रात्री तर पावसाने कहरच केला.रात्री अकरानंतर सुमारे दोन तास पाऊस बादलीने पाणी ओतावे तसा कोसळत होता. त्यामुळेच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. जिल्ह्याच्या कांही भागात आडसाली लागणीचे जोमदार आलेले ऊस पिक भुईसपाट झाले आहे.

सध्या पिकांचा दाणे भरण्याचा काळ आहे.या काळात पावसाची गरज असते. जे भात आता पोटरीला आले आहे, ते पूर्ण पक्व व्हायला किमान महिन्यांचा अवधी असतो. त्यामुळे भातासह भुईमूगालाही हा पाऊस सध्या हानीकारक नाही. ऊसाची वाढ चांगली व्हायलाही तो पोषकच आहे. घटस्थापणा २१ सप्टेंबरला आहे व २६ पासून हस्त नक्षत्र सुरु होते.

नवरात्रीच्या वातीत पाऊस अडकला तर तो हमखास पडतो असा परंपरागत आडाखा आहे. त्यामुळे यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती व्यक्त होत आहे. पिक काढणीच्या हंगामात तो सुरु राहिला तर मात्र शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. व हातात आलेले पिकाचेही नुकसान होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्याची पिक स्थिती पाहता सध्याचा पाऊस पिकांना पोषक आहे. कांही ठिकाणी ऊस वाºयाने पडला असला तरी हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.प्र.रा.चिपळूणकरप्रयोगशील शेतकरी