शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

पावसाचा लोकांना ताप परंतू जिल्ह्यात पिकांना लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 15:23 IST

रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

ठळक मुद्देपिकांना हा पाऊस लाभदायक आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणारभातासह भुईमूगालाही हा पाऊस पोषकच यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती

कोल्हापूर : रोज सायंकाळ करून येणाºया पावसाचा लोकांना त्रास होत असला तरी सर्वच पिकांना हा पाऊस मात्र लाभदायक असल्याचे जाणकार शेतकºयांचे म्हणणे आहे. भातपिक सध्या बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे दाणे भरेपर्यंत पिकाला पाण्याची गरज लागते. मध्यंतरी जुलैमध्ये पावसाने ओढ दिली होती, त्यावेळी आकसलेले ऊसपिकही या पावसाने जोमाने वाढणार आहे.

अलिकडील कांही वर्षात जून-जुलैमध्ये हक्काच्या महिन्यांत पाऊस ओढ देतो व तो पुढील कांही महिन्यांत सरकतो असा अनुभव येत आहे. यंदाही त्याचेच प्रत्यंतर येत आहे. सलग आठवडाभर दिवसभर चक्क लखलखीत ऊन पडत आहे. आॅक्टोबर हिटचा तडाखा बसावा असा उष्म्याचा त्रास होत आहे आणि दुपारनंतर मात्र पाऊस झोडपून काढत आहे.

बुधवारी रात्री तर पावसाने कहरच केला.रात्री अकरानंतर सुमारे दोन तास पाऊस बादलीने पाणी ओतावे तसा कोसळत होता. त्यामुळेच रस्त्यांना नदीचे स्वरुप आले. जिल्ह्याच्या कांही भागात आडसाली लागणीचे जोमदार आलेले ऊस पिक भुईसपाट झाले आहे.

सध्या पिकांचा दाणे भरण्याचा काळ आहे.या काळात पावसाची गरज असते. जे भात आता पोटरीला आले आहे, ते पूर्ण पक्व व्हायला किमान महिन्यांचा अवधी असतो. त्यामुळे भातासह भुईमूगालाही हा पाऊस सध्या हानीकारक नाही. ऊसाची वाढ चांगली व्हायलाही तो पोषकच आहे. घटस्थापणा २१ सप्टेंबरला आहे व २६ पासून हस्त नक्षत्र सुरु होते.

नवरात्रीच्या वातीत पाऊस अडकला तर तो हमखास पडतो असा परंपरागत आडाखा आहे. त्यामुळे यंदा दसरा-दिवाळीतही असाच पाऊस सुरु राहण्याची भिती व्यक्त होत आहे. पिक काढणीच्या हंगामात तो सुरु राहिला तर मात्र शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. व हातात आलेले पिकाचेही नुकसान होणार आहे.कोल्हापूर जिल्ह्याची पिक स्थिती पाहता सध्याचा पाऊस पिकांना पोषक आहे. कांही ठिकाणी ऊस वाºयाने पडला असला तरी हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.प्र.रा.चिपळूणकरप्रयोगशील शेतकरी