शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

तासगाव कारखाना विक्रीप्रकरणी १९ मार्च रोजी सुनावणी

By admin | Updated: March 9, 2015 23:48 IST

मुंबई उच्च न्यायालयात याचिका : अवसायक व गणपती संघाच्या वेगवेगळ्या दाव्यांवर एकत्रच सुनावणी होणार...

भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्र ीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अवसायकांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, विक्री व्यवहारप्रकरणी गणपती जिल्हा संघाने स्वतंत्र याचिका दाखल केल्याने या दोन्हीही याचिकांवरील सुनावणी १९ मार्चला होणार असल्याचा निर्णय न्यायाधीश नरेश पाटील व गडकरी यांच्या खंडपीठाने आज दिला.याबाबत कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेने कारखान्याची मालमत्ता गणपती जिल्हा संघास १४ कोटी ५१ लाखास विकली होती. पुणे येथील डी.आर.ए.टी. (ऋण वसुली अधिकरण) न्यायालयाने ही विक्री प्रक्रिया नियमबाह्य ठरवून विक्री व्यवहाराला स्थगिती दिली होती. परंतु गणपती संघाने ही स्थगिती उठविली होती. या निर्णयाविरोधात अवसायकांनी मुंबई डी.आर.ए.टी. न्यायालयात अपील दाखल केले होते. दरम्यानच्या काळात राज्य बॅँकेच्या प्रशासक मंडळाने विक्री व्यवहार कायदेशीर नसल्याने तो रद्द केला होता. तसे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात दाखल केले होते. परंतु अपिलाच्या सुनावनीवेळी गणपती जिल्हा संघाने जोरदार विरोध करीत अवसायकांचे अपील फेटाळून लावले होते. तासगाव कारखान्याची मालमत्ता गणपती जिल्हा संघाच्या नावे करावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, डी.आर.ए.टी. न्यायालयाने कारखान्यावर राज्य बॅँकेच्या एकूण कर्जाच्या म्हणजे ६० कोटीच्या २५ टक्के रक्कम १५ कोटी रूपये आठ आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. एवढी मोठी रक्कम भरू शकत नसल्याने अवसायकांनी डी.आर.ए.टी.च्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये गेल्या आठ वर्षात राज्य बॅँकेकडे कारखाना भाडेपट्ट्याने दिलेपोटी १६ कोटी रूपये जमा झाले आहेत. कारखान्याची सर्व मालमत्ता बॅँकेच्या ताब्यात आहे. कारखान्याचा विक्री व्यवहार बेकायदेशीर आहे. यामध्ये कायद्याच्या तरतुदीचे पालन झाले नाही आदी मुद्यांचा समावेश आहे. या याचिकेवर आज, सुनावणी होणार होती. मात्र गणपती संघाने यासंदर्भात गेल्या महिन्यामध्ये स्वतंत्र याचिका दाखल केली होती. यामध्ये कारखान्याच्या नावे १०४ कोटीचे कर्ज असून अवसायकांकडून या रकमेच्या ५० टक्के रक्कम भरून घ्यावी, अशी मागणी केली होती. या दोन्ही याचिका एकत्रित सुनावणीसाठी घ्याव्यात असे म्हणणे दोन्हीही पक्षकारांकडून न्यायालयासमोर मांडले. यावेळी न्यायाधीश नरेश पाटील व गडकरी यांच्या खंडपीठाने दोन्ही याचिकांवर १९ मार्चला एकत्रित सुनावणी होणार असल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)कारखाना बळकाविण्यासाठी नवा डावअवसायकांची बाजू भक्कम असून त्यांच्या बाजूने निकाल होणार, हे वास्तव असताना देखील गणपती जिल्हा संघाने १०४ कोटी रूपये कर्ज असल्याचा कांगावा करून, अवसायकांना जादा रक्कम भरता येऊ नये व कारखान्याचा विक्र ी व्यवहार रद्द होऊ नये, तसेच कारखाना स्वत: गिळंकृत करण्यासाठी नवीन डाव खेळत असल्याचा आरोप माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी केला.