शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

टोप खणप्रकरणी आज हरित लवादाकडे सुनावणी

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

सर्वांचे लक्ष लागून : कचराप्रश्न निकाली निघण्याची शक्यता

कोल्हापूर : महापालिका आणि टोप ग्रामस्थ यांच्यातील टोप खण येथे कचरा टाकण्याबाबत उद्भवलेल्या परस्पर विरोधी तक्रारींवर उद्या, सोमवारी पुण्यातील हरित लवादाकडे सुनावणी होत आहे. हरित लवादाकडे निर्णयानंतर थेट सर्वोच्च न्यायालयातच आव्हान द्यावे लागणार आहे. त्यामुळे एकतर शहरातील कचरा प्रश्न कायमचा निकाली निघेल किंवा असाच भिजत पडण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा टोप खण किंवा इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.हरित लवादाकडील निर्णय सकारात्मक लागल्यास महापालिका निविदा काढून तत्काळ झूम प्रकल्पातील कचरा शास्त्रीय पद्धतीने टोप खणीत टाकून त्याचे निराकरण करणार आहे, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने हलसवडे-तामगाव परिसरातील एक खण कचरा टाकण्यासाठी देण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. झूम प्रकल्पातील कचरा उठावाची प्राथमिक तयारी महापालिकेने सुरू केली असून, झूममधील कचरा टोप, टाकाळा खण किंवा हलसवडे येथे टाकला जाणार आहे. यासाठी मागील आठवड्यातच निविदा काढून भाडेतत्त्वावर वाहने घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शहरात दररोज किमान दीडशे टन कचरा निर्माण होतो. हा कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नाही. टोप येथील खणीचा मार्ग मोकळा झाल्यास शहराचा पुढील किमान ५० वर्षांचा कचऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. टोप खणीचा प्रश्न मिटेपर्यंत महापालिकेने टाकाळा खण येथे शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे शुद्धिकरण करून उर्वरित कचऱ्याचे घटक टाकण्यासाठी जागा करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापूर्वी झूम प्रकल्पात चाळणीसह इतर यांत्रिक उपकरणे लावण्यासाठी जागा करावी लागणार आहे. झूममधील कचरा हटवून जागा रिकामी करण्यासाठी तात्पूर्ती पर्यायी जागा महापालिकेकडे नाही. पुण्यातील एका कंपनीला कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा ठेका देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. महापालिका सभागृहाने या प्रकल्पास मंजुरी देऊन तब्बल नऊ महिने उलटले. जागा नसल्याने हा प्रकल्प रखडला आहे. कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिका येत्या काही महिन्यांत ठोस निर्णय घेणार आहे. हरित लवादाच्या निकालानंतरच शहरातील कचऱ्याचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)