शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची सुनावणी सुरू

By admin | Updated: September 8, 2015 00:30 IST

प्रशासन आक्रमक : एका महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे नियोजन; पात्रांनाच मिळणार लाभ

कोल्हापूर : गरीब, दुर्बल, कमकुवत लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी शासनाच्या सामाजिक न्याय, विशेष साहाय्य विभागाकडून दर महिन्याच्या आर्थिक मदतीसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीत बोगस ठरविण्यात आलेल्या जिल्ह्यातील १७,५४४ लाभार्थ्यांची शासनाच्या आदेशानुसार तालुका पातळीवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, एका महिन्यात सुनावणी पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना पुन्हा अनुदान सुरू केले जाणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान, श्रावणबाळ, राज्य निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ, आम आदमी विमा या योजना आहेत. जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (महसूल), तर गावपातळीवर तलाठ्यांतर्फे या योजनांची अंमलबजावणी होते. पात्र लाभार्थी निवडीसाठी तालुका स्तरावर समिती असते. परंतु, समितीमधील अशासकीय सदस्य आणि स्थानिक प्रभावशाली लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे या योजनांत अपात्र लाभार्थी घुसडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांची चौकशी केली. यामध्ये विविध योजनांच्या ९८,६१८ लाभार्थ्यांपैकी १७,५४४ लाभार्थी बोगस असल्याचे स्पष्ट झाले. सर्वाधिक बोगस लाभार्थी कागल तालुक्यात मिळाली. यावरून सत्ताधारी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याबाबत कागलमध्ये भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यामुळे प्रशासनावर दबावतंत्राचा वापर वाढला. गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी बोगस लाभार्थी किती आहेत, त्याचे काय होणार, विरोधकांचे राजकारण, याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यामुळे सध्या बोगस लाभार्थींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोगस लाभार्र्थ्यांंची सुनावणी तालुका पातळीवर सुरू आहे. कितीही दबाव आला तरी अपात्र लोकांना लाभ द्यायचा नाही, असा निर्धार प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पुढील एका महिन्यात अपात्र लाभार्थींची सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थींना पूर्ववत लाभ सुरू करण्यात येणार आहे. बोगस लाभार्थी तालुकानिहाय असे कोल्हापूर उत्तर - २०८, कोल्हापूर दक्षिण - ३५११, करवीर - ३१०९, कागल - ३६२५, पन्हाळा - ३८९, शाहूवाडी - १०३, हातकणंगले - १२१९, इचलकरंजी शहर -४१०, शिरोळ - ४१०, शिरोळ - ६३०, राधानगरी - ६३०, राधानगरी - २२०, भुदरगड -२८७२, गगनबावडा - ५०, गडहिंग्लज - ६८४, आजरा - ३२५, चंदगड - १८९.शासनाच्या १ आॅगस्ट २०१५ च्या आदेशानुसार अपात्र लाभार्थ्यांंची सुनावणी घेण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले आहेत. सुनावणी एक महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले असून, सुनावणीत पात्र ठरल्यास संबंधित लाभार्थ्यांचे लाभ पूर्ववत सुरू होतील. - किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल).