शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

‘आॅडनंबर’ची डोकेदुखी कायम

By admin | Updated: March 31, 2015 00:15 IST

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा : परीक्षा विभागाचे नियोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम.च्या सत्र एक व सहाच्या परीक्षांना सोमवारपासून प्रारंभ झाला. आॅनलाईन अर्ज नीट भरला गेला नसल्याने ‘आॅडनंबर’ (ऐनवेळी दिलेला नंबर)ची डोकेदुखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी कायम राहिली.बी.ए., बी.कॉम., आदी विद्याशाखांच्या द्वितीय सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने गेल्या दीड महिन्यापूर्वी जाहीर केले होते; पण पहिल्या सत्रातील विविध विद्याशाखांच्या सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज व्यवस्थितपणे भरले नसल्याने त्यांच्या निकालाची प्रक्रिया लांबली. यातील अधिकतर विद्यार्थ्यांना ते उत्तीर्ण, अनुत्तीर्ण आहेत का हे समजण्यापूर्वीच द्वितीय सत्रासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील मार्च, एप्रिल-२०१५ मधील बी.ए., बी.कॉम. अभ्यासक्रमाच्या सत्र एक व सहाच्या उन्हाळी परीक्षा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. त्याअंतर्गत नियमित व दूरशिक्षण विभागाचे सुमारे ५० हजार विद्यार्थी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील परीक्षेला बसले आहेत. द्वितीय सत्रातील परीक्षांच्या पहिल्या दिवशीच आॅडनंबरची डोकेदुखी परीक्षा यंत्रणेला सुरू झाली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर महाविद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी साधारणत: पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांना ‘आॅडनंबर’ देऊन परीक्षेला बसवावे लागल्याचे प्राचार्य आणि परीक्षेसंबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. साताऱ्यातील काही विद्यार्थ्यांना पेपर देऊन त्यांना ‘आॅडनंबर’ मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागल्याचे समजते.दरम्यान, विद्यापीठाकडून सर्व परीक्षा केंद्रांकरिता अभिनव पद्धतीने व गोपनीयता पाळून परीक्षा केंद्रनिहाय प्रश्नपत्रिकेचे गठ्ठे उपलब्ध करून दिले आहेत. आॅक्टोबर २०१४ च्या परीक्षेमधील काही रिपीटर विद्यार्थ्यांच्या निकालामधील त्रुटीबाबत परीक्षा विभागाकडून योग्य ते नियोजन झाले असून, संबंधित विद्यार्थ्यांना स्वतंत्र आसन क्रमांक दिले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना केलेल्या चुकांमुळे असे आसन क्रमांक द्यावे लागले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून परीक्षा विभागाकडून या स्वरूपातील स्वतंत्र आसन क्रमांकाची व्यवस्था केली आहे. मात्र, या क्रमांकाचे विद्यार्थी वाढल्यास त्याचा फटका निकाल वेळेवर लागण्याच्या प्रक्रियेला बसण्याची शक्यता परीक्षेच्या कामकाजातील कर्मचाऱ्यांनी, प्राचार्यांनी व्यक्त केली. आसन क्रमांकाची उपलब्धतारिपीटर विद्यार्थ्यांना त्यांच्या राहिलेल्या विषयांच्या पुनर्परीक्षेकरिता बी.ए.साठी २०० आणि बी.कॉम.च्या परीक्षेसाठी ३५० स्वतंत्र आसन क्रमांक विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आधीच्या परीक्षांमधून राहिलेल्या विषयांच्या पुनर्परीक्षेकरिता संबंधित महाविद्यालयामध्ये तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा नियंत्रक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.