शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

‘राजाराम’च्या कर्जाबाबत दिशाभूल करणाऱ्यांना खुलासेवार उत्तर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:24 IST

कारखान्याबाबत अपप्रचार थांबवावा कसबा बावडा : ‘राजाराम’च्या कर्जाबाबत सभासदांची दिशाभूल करणाऱ्या प्रश्नकर्त्या सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला लेखी उत्तर पाठवण्यात येणार ...

कारखान्याबाबत अपप्रचार थांबवावा

कसबा बावडा : ‘राजाराम’च्या कर्जाबाबत सभासदांची दिशाभूल करणाऱ्या प्रश्नकर्त्या सभासदांच्या प्रत्येक प्रश्नाला लेखी उत्तर पाठवण्यात येणार असून, सर्व उत्तरे कारखान्याच्या ‘श्री. छत्रपती राजाराम ॲपवर’ सभासदांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाणार आहेत. तरीही वारंवार तेच ते प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रश्नांची उत्तरे द्या हा कांगावा कशासाठी, असा सवाल राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिला आहे.

राजाराम कारखाना सहवीज प्रकल्प व कारखान्याचे विस्तारीकरण करणार आहे. कारखान्यावर कर्ज असताना हा विस्तारीकरणाचा घाट कशासाठी याचा वार्षिक सभेत खुलासा करावा व लेखी प्रश्नांची उत्तरे द्यावीत म्हणून बावड्यातील शेतकऱ्यांनी कारखान्याकडे लेखी प्रश्‍न पाठवले होते. तसेच याची प्रत साखर सहसंचालक यांनाही पाठवली होती. याबाबत कारखान्याचे संचालक दिलीप उलपे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे या प्रश्नांबाबत खुलासा केला आहे.

पत्रकात म्हटले आहे, सभासद हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा ऊस वेळेत गळीत होण्याकरता विस्तारीकरण अपरिहार्य असून, मागील वार्षिक सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सहवीज प्रकल्पाबाबत किफायतशीरपणा तपासून याबाबतची कार्यवाही करणार आहोत. उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर ऊस दर देण्याकरिता साखर कारखान्यातून उपपदार्थ निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारची भूमिका ही यासाठी अनुकूल अशीच आहे. ही वास्तव स्थिती असताना वारंवार तेच तेच प्रश्न उपस्थित करून सभासद शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्या कडून केला जात आहे. सभासद शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून आता तरी अशा प्रकारचा अपप्रचार थांबवावा, असा गर्भित इशाराही दिलीप उलपे यांनी दिला आहे.

कारखान्याच्या अहवाल सालातील कर्जाबाबत विरोधकांकडून अवास्तव व चुकीची आकडेवारी दिली जात आहे. वस्तुस्थिती विचारात घेतल्यास कारखान्याकडे जी एकूण कर्ज रक्कम २६८ कोटी ताळेबंदास दिसून येते त्यापैकी साखर मालतारण कर्ज १६५ कोटी इतकी आहे. पण त्यावेळी प्रत्यक्षात १७४ कोटी रकमेची साखर कारखान्याकडे शिल्लक होती. शिवाय या एकूण कर्ज रक्कमेमध्ये नमूद असलेल्या इतर देणी रकमा अदा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या रकमा एकूण कर्जात दर्शवून दिशाभूल केली जात आहे. हेसुद्धा सुज्ञ सभासद ओळखून आहेत. अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. ...................... ---------------------------------------------