शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मागार्ची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:10 IST

उचगाव, --पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मार्गावर प्राथमिक उपाययोजना

ठळक मुद्देउपाययोजनांना प्रारंभ, अपघात रोखण्यासाठी स्थानिकांनी सुचवल्या युक्त्या कागल ते पेठवडगाव पर्यतच्या अपघात प्रवण क्षेत्राची संयुक्तरित्या पाहणी केली.रस्त्यावर निसरटपणा निर्माण होऊन वाहनधारकांच्या अपघातात वाढ होऊन वाहतुक कोंडी निर्माण

लोकमत न्युज नेटवर्कउचगाव, --पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडून धोकादायक रहदारी मार्गावर प्राथमिक उपाययोजना केल्या जात आहेत.त्याचाच भाग म्हणून आज नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडिया, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, संबधीत महामार्ग संलग्न असलेल्या स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी कागल ते पेठवडगाव पर्यतच्या अपघात प्रवण क्षेत्राची संयुक्तरित्या पाहणी केली.महामार्गावर वाहतुक सुरळीत व्हावी.महामार्गलगतच्या गावाना जोडणा-या सेवा रस्त्यावर गतीरोधक (स्पीड बेकर्स), लोंखडी बॅरिकेटर्स, रिफलेक्टर, संरक्षक कठडे या सारख्या उपाययोजनांना सुरूवात करण्यात आल्यांची माहिती नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडियाचे पुणे विभागीय वरिष्ठ तात्रिंक महाप्रबंधक पी.डी.दिवाण यांनी दिली.गेले तीन महिने महामार्गावर अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट ) क्षेत्रात अनेक वेळी वाहनधारकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता,महामार्गावर अनेक ठिकाणी ड्रेनेजमधून निघणारे सांडपाणी तसेच बोगदे, सेवा मार्गावरून येणारे पावसांचे पाणी यामुळे रस्त्यावर निसरटपणा निर्माण होऊन वाहनधारकांच्या अपघातात वाढ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत होती.

याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ,नॅशनल हायवे अथारिटी आॅफ इंडिया व पोलिस प्रशासन यांनी याबाबत अपघात प्रवण क्षेत्रातील स्पॉट वर जाऊन तेथील ,फोटो, व्हीडीओ शुटिंग, आरेखन, रेखाकंन, याव्दारे माहिती संग्रहीत करण्यात केली आहे.त्यानुसार आज तात्रिंक वरिष्ठ महाप्रबंधक पी.डी.दिवाण यांनी आज रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील,निवासी उपअभियंता हिंगमिरे,कागल पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक औंदुबर पाटील,गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक युवराज खाडे , गांधीनगर पोलिस स्टेशनचे सपोनि सुशांत चव्हाण,उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि जगनाथ जाणकर,अविनाश पोवार यांच्यासह स्थानिक रहिवाशी यांची उपस्थिती होती. 

उचगाव महामार्गावर व हद्दीत महिन्याला तीन ते चार अपघात होत होते तर मूर्त्यु ही होत होते.पण गेल्या तीन महिन्यात या रस्त्यावर महामार्गावर स्पीड बेकर्स,रॅर्मब्लर बांधल्याने या अपघाताची संख्या कमी झाली आहे. तर हेल्मेट सक्ती केल्यानंतर एकही दुचाकी चालक अपघातात मूर्त्यु झालेला नाही. त्यामुळे आपण गुगल मॅपिंग व्दारे रस्ते विकास महामंडळ यांना सूचना केल्या त्यांनी अमलबजावणी केली त्यामुळे या ठिकाणी अपघात रोखण्यास मदत झाली आहे.सपोनि सुशांत चव्हाण गांधीनगर पोलीस ठाणे