शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

हसन मुश्रीफ : उसाचा प्रश्न ‘हमीदवाडा’ सुरू करताना नव्हता का ?

By admin | Updated: December 13, 2014 00:28 IST

कारखाना मोडण्यासाठीच मंडलिकांची उठाठेव

कोल्हापूर : उसाच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला सदाशिवराव मंडलिक यांनी विरोध केला; पण यामागे ऊस व प्रदूषणाचे कोणतेच कारण नसून, उभारलेला कारखाना मोडण्यासाठीच त्यांनी न्यायालयीन उठाठेव केल्याचा आरोप संताजी घोरपडे कारखान्याचे संस्थापक, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. आमदार मुश्रीफ म्हणाले, कागल तालुक्यात सर्वप्रथम ‘बिद्री’ व त्यानंतर ‘छत्रपती शाहू’ सुरू झाला, त्यावेळी फक्त ८० हजार टन ऊस उपलब्ध होता. १७ वर्षांपूर्वी हमीदवाडा कारखान्याची सुरुवात केली, त्यावेळी मंडलिक यांची उपलब्ध उसाची चिंता कोठे गेली होती? सध्या कागल व सीमाभागात उसाचे क्षेत्र मुबलक आहे. तालुक्यातून दरवर्षी सात लाख टन ऊस बाहेरील कारखाने उचलतात. त्यात ‘हमीदवाडा’ने बहुराज्य करण्याचा ठराव केला असताना उसाच्या टंचाईचा प्रश्न येतोच कोठे? हमीदवाडा कारखान्याचे अधिकारी व काही बगलबच्यांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी कारखान्याचे लाखो रुपये या प्रकरणात खर्च केले. यापेक्षा गेल्या वर्षी २६५० रुपये जाहीर केलेला दर जरी दिला असता, तर खासदार राजू शेट्टी यांना आनंद झाला असता. कारखाना खासगी असताना हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने भागभांडवल दिले. शेअर्स रकमेबाबत सोनिया गांधी, तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम, आॅस्कर फर्नांडिस यांच्याकडे तक्रारी केल्या. आता कारखाना पूर्ण उभा राहिला, ऊस तोडणी-वाहतूक तयार झाली, बॉयलर पेटविला आणि कारखाना बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायदेवतेने माझ्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे महिनाभर कारखाना बंद ठेवून मंडलिक यांनी काय साधले ? याचे उत्तर कागलच्या जनतेला द्यावे लागेल. यावेळी घोरपडे कारखान्याचे संचालक भैया माने, अनिल साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रत्यक्ष भेटून विनंती तरीही...सदाशिवराव मंडलिक आजारी असताना त्यांना भेटलो. त्यावेळी कारखान्याबाबत राजकारण आणू नका, अशी विनंती केली होती. तरीही त्यांनी करायचे तेच केले. उभारलेला कारखाना मोडण्याचे पाप त्यांनी केल्याची टीका आमदार मुश्रीफ यांनी केली.