शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मुश्रीफांनी टीका केली की कारखान्यास हमखास पुरस्कार; समरजित घाटगेंनी काढला चिमटा

By विश्वास पाटील | Updated: September 20, 2022 18:58 IST

विशेष म्हणजे या सर्व पुरस्कारांचे आतापर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच हस्ते वितरण झाले आहे असेही त्यांनी म्हटले.

कोल्हापूर : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जेव्हा जेव्हा कागलच्या शाहू सहकारी साखर कारखान्यांवर टीका करतात तेव्हा आमच्या कारखान्यास हमखास पुरस्कार मिळतो, असा चिमटा शाहू सहकार समूहाचे प्रमुख व भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी कागल येथील मगर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात काढला. विशेष म्हणजे या सर्व पुरस्कारांचे आतापर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच हस्ते वितरण झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचा देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त घाटगे यांचा सभासदांच्या वतीने सत्कार झाला. त्यामध्ये बोलताना समरजित घाटगे म्हणाले, कारखान्याच्या आतापर्यंतच्या वाटचालीत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ६६ पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे जिवंत स्मारक म्हणून या कारखान्याची उभारणी केली व त्याच विचाराने कारखाना चालवला. त्यांच्या निधनानंतर आईसाहेब सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल तितक्याच दमदारपणे सुरू आहे. त्यात सभासद, कर्मचारी, आजी-माजी संचालकापासून सर्वांचेच श्रेय आहे.मुश्रीफांनी असेच टीका करत राहावेपरंतु यानिमित्ताने मला आणखी एका व्यक्तीचेही आभार मानायचे आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा हसन मुश्रीफ यांनी शाहू कारखान्यांवर टीका केली तेव्हा तेव्हा कारखान्यास हमखास पुरस्कार मिळाला आहे. मागच्या दोन महिन्यांत त्यांनी टीका केली तेव्हा वसंतदादा शुगर इन्सिट्यूटचा पुरस्कार मिळाला. ते टीका करत असल्याने मागच्या तीन वर्षांत कारखान्यास चार पुरस्कार मिळाले. त्याचे वितरणही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याच हस्ते होत आहे, हे विशेष. त्यामुळे मुश्रीफ यांनी असेच टीका करत राहावे, त्यातून कारखान्यास पुरस्कार मिळत राहतील व प्रगतीही होत राहील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे