शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

उसाचे फड पेटविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

उसाच्या वजनात घट : ऊस सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी ऊस पेटविण्याचे प्रकार

रमेश साबळे - कसबा तारळे  -जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त ऊस पदरात पाडून घेण्यासाठी ऊसतोड कामगारांची धावपळ सुरू आहे. परिणामी ऊस सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी चक्क उसाचे फड पेटविण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच ऊसतोडीला विलंब झाल्याने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांना पेटविलेल्या उसाकडे केविलवाण्या नजरेने पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही.कारखान्यांचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ऊसतोड कामगारांची जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी धांदल उडते. यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. परिणामी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांबरोबर ऊसतोड कामगार या अंतिम टप्प्यात सर्वाधिक ऊस मिळविण्यासाठी जास्तीत जास्त उसाचे क्षेत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. ऊस तत्काळ कारखान्याला पाठविण्यासाठी रीतसर सोलला (खडसणे) जात नाही. उलट हा ऊस पाल्यासह पेटविला जातो. यामुळे भरउन्हात पेटणाऱ्या उसातून मोठ्या प्रमाणात रस बाहेर पडत असल्याने उसाच्या वजनात घट होते.तेरा-चौदा महिने पोटाच्या मुलासारखा ऊस सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोरच ऊस पेटविला जात असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. ऊस पेटवू नये, यासाठी शेतकऱ्यांतून ऊसतोड कामगारांना खूश करण्यासाठी ‘प्रोग्राम’च्या गोंडस नावाखाली रोख रक्कम दिली जात आहे. परंतु, ज्यांचे उसाचे क्षेत्र कमी आणि अडचणीच्या ठिकाणी आहे, असे शेतकरी तर ऊस तोडणी कामगारांसाठी जास्त फायदेशीर ठरत आहेत.