शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उसाचे फड पेटविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

उसाच्या वजनात घट : ऊस सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी ऊस पेटविण्याचे प्रकार

रमेश साबळे - कसबा तारळे  -जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त ऊस पदरात पाडून घेण्यासाठी ऊसतोड कामगारांची धावपळ सुरू आहे. परिणामी ऊस सोलण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी चक्क उसाचे फड पेटविण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आधीच ऊसतोडीला विलंब झाल्याने कासावीस झालेल्या शेतकऱ्यांना पेटविलेल्या उसाकडे केविलवाण्या नजरेने पाहण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही.कारखान्यांचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ऊसतोड कामगारांची जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी धांदल उडते. यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. परिणामी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांबरोबर ऊसतोड कामगार या अंतिम टप्प्यात सर्वाधिक ऊस मिळविण्यासाठी जास्तीत जास्त उसाचे क्षेत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. ऊस तत्काळ कारखान्याला पाठविण्यासाठी रीतसर सोलला (खडसणे) जात नाही. उलट हा ऊस पाल्यासह पेटविला जातो. यामुळे भरउन्हात पेटणाऱ्या उसातून मोठ्या प्रमाणात रस बाहेर पडत असल्याने उसाच्या वजनात घट होते.तेरा-चौदा महिने पोटाच्या मुलासारखा ऊस सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोरच ऊस पेटविला जात असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. ऊस पेटवू नये, यासाठी शेतकऱ्यांतून ऊसतोड कामगारांना खूश करण्यासाठी ‘प्रोग्राम’च्या गोंडस नावाखाली रोख रक्कम दिली जात आहे. परंतु, ज्यांचे उसाचे क्षेत्र कमी आणि अडचणीच्या ठिकाणी आहे, असे शेतकरी तर ऊस तोडणी कामगारांसाठी जास्त फायदेशीर ठरत आहेत.