शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

हेरवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:31 IST

कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च ...

कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने शेती तोट्यातच होती. यातून त्यांनी २० गुंठे शेती दीड लाख रुपयांवर गहाणवट ठेवली आहे. एक एकर शेतीवर गावातील सेवा सोसायटीचे ९६ हजार, बॅँकेचे ५० हजार, बचतगटाचे ३० हजार याशिवाय हातउसने असे सुमारे चार लाखापर्यंत कर्ज होते.हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत काही दिवस संजय अस्वस्थ होते. सोमवारी (दि. १ आॅक्टोबर) ते मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडले होते. मंगळवारी (दि.२) रात्री रामलिंग डोंगरावर विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली.पंधरा दिवसांपूर्वीच चिपरी (ता. शिरोळ) येथील तरुण शेतकरी राजेंद्र जिन्नाप्पा कोरे (३६) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. शिरोळ तालुका सधन असूनही शेतीच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनत आहेत. शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणाविरुद्ध शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.उसाला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामुळे ऊस शेतीही तोट्यात आहे. फळे, फुले, भाजीपाला, फळभाज्यांनाही दर नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत अडकत आहे. यातूनच शिरोळ तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे शासनाने कर्ज माफ करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.- बंडू पाटील, तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी युवा आघाडी.