शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

हेरवाडच्या कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:31 IST

कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च ...

कुरूंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील संजय भगवान गोंधळी (वय ४२) या शेतकºयाने कर्जास कंटाळून रामलिंग डोंगर (ता. हातकणंगले) येथे मंगळवारी (दि.२) रात्री विष पिऊन आत्महत्या केली.संजय गोंधळी यांची हेरवाड येथे दीड एकर शेती आहे. पत्नी, दोन मुले व आईसोबत कौलारू घरात राहतात. शेतात ऊस पीकच असल्याने व उत्पादन खर्च वाढल्याने शेती तोट्यातच होती. यातून त्यांनी २० गुंठे शेती दीड लाख रुपयांवर गहाणवट ठेवली आहे. एक एकर शेतीवर गावातील सेवा सोसायटीचे ९६ हजार, बॅँकेचे ५० हजार, बचतगटाचे ३० हजार याशिवाय हातउसने असे सुमारे चार लाखापर्यंत कर्ज होते.हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत काही दिवस संजय अस्वस्थ होते. सोमवारी (दि. १ आॅक्टोबर) ते मोटारसायकल घेऊन घरातून बाहेर पडले होते. मंगळवारी (दि.२) रात्री रामलिंग डोंगरावर विष पिऊन त्यांनी आत्महत्या केली.पंधरा दिवसांपूर्वीच चिपरी (ता. शिरोळ) येथील तरुण शेतकरी राजेंद्र जिन्नाप्पा कोरे (३६) यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केली होती. शिरोळ तालुका सधन असूनही शेतीच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनत आहेत. शासनाच्या चुकीच्या कृषी धोरणाविरुद्ध शेतकºयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.उसाला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनखर्च वाढला आहे. त्यामुळे ऊस शेतीही तोट्यात आहे. फळे, फुले, भाजीपाला, फळभाज्यांनाही दर नसल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत अडकत आहे. यातूनच शिरोळ तालुक्यातील शेतकरी आत्महत्या करीत असून, आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे शासनाने कर्ज माफ करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.- बंडू पाटील, तालुकाध्यक्ष,स्वाभिमानी युवा आघाडी.