शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:22 IST

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या ...

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या माध्यमातून नाटकाचे बीज रुजले. शहरात विविध ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर, कामगारांतील कलाकारांच्या या मंडळाने महाराष्ट्रात आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. पारावरचे नाटक ते राज्यस्तरीय स्पर्धा, चित्रपटांपर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे.काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळाची स्थापना सन १९८५ मध्ये झाली. यातून शहरातील चहागाडी, सेंट्रिंग, विविध दुकानांमध्ये मजूर, कामगार म्हणून काम करणाºया गावातील काही कलाकारांना सोंगी भजन, कीर्तन, शाहिरीच्या माध्यमातून कलेच्या सादरीकरणाला संधी दिली.निर्माते व नाट्यलेखक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या मंडळाने सन १९९२ मध्ये ‘अंधार’ नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण केले. यानंतर धरणग्रस्तांचा सहभाग असलेले ‘धरणाखालच्या अंधारातून’, वगनाट्य ‘विच्छा’, ‘आषाढातील एक दिवस’ अशा नाटकांच्या स्पर्धा, तसेच व्यावसायिक ५० प्रयोग पूर्ण केले. ‘सासू ४२०’, ‘विठो रखुमाय’, आदी नाटकांच्या माध्यमातून हे मंडळ नावलौकिकास आले. मंडळाच्या वाटचालीत ‘कथा नामा जोग्याची’ ही एकांकिका टर्निंग पॉइंट ठरली. भालजी पेंढारकर स्मृती चषक स्पर्धेत सादर केलेल्या या एकांकिकेला वैयक्तिक पारितोषिकासह सांघिक उपविजेतेपद मिळाले. यानंतर या एकांकिकेने कोल्हापूर, इचलकरंजी, कणकवली, कोवाड, पुणे, आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केली. या यशातून मंडळाने देवदासी, जोगता, तृतीयपंथी यांचे जीवन समजून घेत ‘कथा नामा जोग्याची’ नाटकाने राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर या नाटकावरच अवघ्या १३ दिवसांत चित्रपट साकारला. त्याला ‘झी गौरव’चे दोन पुरस्कार, विविध स्पर्धांमध्ये नामांकने मिळाली. मनोरंजनासह कौटुंबिक, सामाजिक सुधारणेची आठवण करून देणारे ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘गोंधळ मांडियेला’ हे वग नाटक सादर केले. त्याला उत्कृष्ट प्रयोगासह लेखनाचे ‘झी’ कॉमेडी अवॉर्ड मिळाले. एकतर्फी प्रेमावरील ‘लव्ह इथले भयकारी’द्वारे राज्य स्पर्धा गाजविली.सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणी प्रस्तापितांच्या विरोधात खूप मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणातील महाराजांचे विचार हे आजही आपल्या समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तन करण्याचा मानस असल्याचे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.