शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:22 IST

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या ...

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या माध्यमातून नाटकाचे बीज रुजले. शहरात विविध ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर, कामगारांतील कलाकारांच्या या मंडळाने महाराष्ट्रात आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. पारावरचे नाटक ते राज्यस्तरीय स्पर्धा, चित्रपटांपर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे.काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळाची स्थापना सन १९८५ मध्ये झाली. यातून शहरातील चहागाडी, सेंट्रिंग, विविध दुकानांमध्ये मजूर, कामगार म्हणून काम करणाºया गावातील काही कलाकारांना सोंगी भजन, कीर्तन, शाहिरीच्या माध्यमातून कलेच्या सादरीकरणाला संधी दिली.निर्माते व नाट्यलेखक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या मंडळाने सन १९९२ मध्ये ‘अंधार’ नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण केले. यानंतर धरणग्रस्तांचा सहभाग असलेले ‘धरणाखालच्या अंधारातून’, वगनाट्य ‘विच्छा’, ‘आषाढातील एक दिवस’ अशा नाटकांच्या स्पर्धा, तसेच व्यावसायिक ५० प्रयोग पूर्ण केले. ‘सासू ४२०’, ‘विठो रखुमाय’, आदी नाटकांच्या माध्यमातून हे मंडळ नावलौकिकास आले. मंडळाच्या वाटचालीत ‘कथा नामा जोग्याची’ ही एकांकिका टर्निंग पॉइंट ठरली. भालजी पेंढारकर स्मृती चषक स्पर्धेत सादर केलेल्या या एकांकिकेला वैयक्तिक पारितोषिकासह सांघिक उपविजेतेपद मिळाले. यानंतर या एकांकिकेने कोल्हापूर, इचलकरंजी, कणकवली, कोवाड, पुणे, आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केली. या यशातून मंडळाने देवदासी, जोगता, तृतीयपंथी यांचे जीवन समजून घेत ‘कथा नामा जोग्याची’ नाटकाने राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर या नाटकावरच अवघ्या १३ दिवसांत चित्रपट साकारला. त्याला ‘झी गौरव’चे दोन पुरस्कार, विविध स्पर्धांमध्ये नामांकने मिळाली. मनोरंजनासह कौटुंबिक, सामाजिक सुधारणेची आठवण करून देणारे ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘गोंधळ मांडियेला’ हे वग नाटक सादर केले. त्याला उत्कृष्ट प्रयोगासह लेखनाचे ‘झी’ कॉमेडी अवॉर्ड मिळाले. एकतर्फी प्रेमावरील ‘लव्ह इथले भयकारी’द्वारे राज्य स्पर्धा गाजविली.सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणी प्रस्तापितांच्या विरोधात खूप मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणातील महाराजांचे विचार हे आजही आपल्या समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तन करण्याचा मानस असल्याचे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.