शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

हनुमान तरुण मंडळाचे ‘अग्निदिव्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:22 IST

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या ...

सोंगी भजन, कीर्तन, शाहिरी अशा माध्यमांतून गावातील जुन्या-जाणत्या लोकांच्या कला पाहत असताना काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्या माध्यमातून नाटकाचे बीज रुजले. शहरात विविध ठिकाणी उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर, कामगारांतील कलाकारांच्या या मंडळाने महाराष्ट्रात आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. पारावरचे नाटक ते राज्यस्तरीय स्पर्धा, चित्रपटांपर्यंत उत्तुंग भरारी घेतली आहे.काळम्मावाडी येथील हनुमान तरुण मंडळाची स्थापना सन १९८५ मध्ये झाली. यातून शहरातील चहागाडी, सेंट्रिंग, विविध दुकानांमध्ये मजूर, कामगार म्हणून काम करणाºया गावातील काही कलाकारांना सोंगी भजन, कीर्तन, शाहिरीच्या माध्यमातून कलेच्या सादरीकरणाला संधी दिली.निर्माते व नाट्यलेखक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या मंडळाने सन १९९२ मध्ये ‘अंधार’ नाटकाच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्यनाट्य स्पर्धेत सादरीकरण केले. यानंतर धरणग्रस्तांचा सहभाग असलेले ‘धरणाखालच्या अंधारातून’, वगनाट्य ‘विच्छा’, ‘आषाढातील एक दिवस’ अशा नाटकांच्या स्पर्धा, तसेच व्यावसायिक ५० प्रयोग पूर्ण केले. ‘सासू ४२०’, ‘विठो रखुमाय’, आदी नाटकांच्या माध्यमातून हे मंडळ नावलौकिकास आले. मंडळाच्या वाटचालीत ‘कथा नामा जोग्याची’ ही एकांकिका टर्निंग पॉइंट ठरली. भालजी पेंढारकर स्मृती चषक स्पर्धेत सादर केलेल्या या एकांकिकेला वैयक्तिक पारितोषिकासह सांघिक उपविजेतेपद मिळाले. यानंतर या एकांकिकेने कोल्हापूर, इचलकरंजी, कणकवली, कोवाड, पुणे, आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट केली. या यशातून मंडळाने देवदासी, जोगता, तृतीयपंथी यांचे जीवन समजून घेत ‘कथा नामा जोग्याची’ नाटकाने राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यानंतर या नाटकावरच अवघ्या १३ दिवसांत चित्रपट साकारला. त्याला ‘झी गौरव’चे दोन पुरस्कार, विविध स्पर्धांमध्ये नामांकने मिळाली. मनोरंजनासह कौटुंबिक, सामाजिक सुधारणेची आठवण करून देणारे ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘गोंधळ मांडियेला’ हे वग नाटक सादर केले. त्याला उत्कृष्ट प्रयोगासह लेखनाचे ‘झी’ कॉमेडी अवॉर्ड मिळाले. एकतर्फी प्रेमावरील ‘लव्ह इथले भयकारी’द्वारे राज्य स्पर्धा गाजविली.सामाजिक सुधारणेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणी प्रस्तापितांच्या विरोधात खूप मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणातील महाराजांचे विचार हे आजही आपल्या समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. नाटकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व परिवर्तन करण्याचा मानस असल्याचे हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील माने यांनी सांगितले.