शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:19 IST

कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !अटल विमा कल्याण योजनेतून मदत : ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे नोकरी गेल्याने बेरोजगार झालेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्म्या रकमेची मदत अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर विभागातील कितीजणांना मदत होईल, याबाबतचा आढावा लोकमतने  घेतला.

कोरोनापूर्वी फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण ३,२८,८४१ कामगारांची भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी भरण्यात आली होती.

ऑगस्टमध्ये ही संख्या ३,०१,४१९ पर्यंत आली आहे. त्यामुळे या विभागातून २७,४२२ जण बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. त्यांतील जे कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असतील, त्यांना अटल विमा कल्याण योजनेतून मदत मिळणार आहे.अशी मिळावा पात्र-अपात्रतेची माहितीबेरोजगार झालेल्या कामगारांना या अटल विमा कल्याण योजनेतील मदत मिळविण्यासाठी ते पात्र आहेत की, अपात्र हे ईएसआयसी आयपी पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेता येईल. या पोर्टलवर कामगारांनी त्यांचा १० अंकी विमा क्रमांक नोंदविल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेल. दर महिन्यात त्यांच्याकडून आणि कंपनीकडून किती रक्कम वर्गणीपोटी ईएसआयसीकडे जमा झाली हेही जाणून घेता येईल.

या योजनेतून मदत मिळविण्यासाठी संबंधित कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक आहे. योजनेची माहिती ईएसआयसी आयपी पोर्टलवर उपलब्ध आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार योजनेबाबतची पुढील कार्यवाही जिल्हा पातळीवर करण्यात येईल.- सूरज रेवणकर, शाखा प्रबंधक, ईएसआयसी, कोल्हापूर

असंघटित क्षेत्रात काम करणारे, ईएसआयसी लागू नसणारे, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेकजण कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने लवकर घ्यावा, या मागणीसाठी लवकरच कामगार संघटना संयुक्त कृती समितीद्वारे निदर्शने केली जाणार आहेत.- अतुल दिघे, निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • ईएसआयसीकडे नोंदणी असणारे कोल्हापुरातील कामगार : १०७३८१
  • भविष्यनिर्वाह निधीत सध्या समावेश असलेले कोल्हापूर विभागातील कामगार : ३०१४१९
  •  या निधीतून कमी झालेले कामगार : २७४२२

 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर