शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:19 IST

कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !अटल विमा कल्याण योजनेतून मदत : ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे नोकरी गेल्याने बेरोजगार झालेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्म्या रकमेची मदत अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर विभागातील कितीजणांना मदत होईल, याबाबतचा आढावा लोकमतने  घेतला.

कोरोनापूर्वी फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण ३,२८,८४१ कामगारांची भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी भरण्यात आली होती.

ऑगस्टमध्ये ही संख्या ३,०१,४१९ पर्यंत आली आहे. त्यामुळे या विभागातून २७,४२२ जण बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. त्यांतील जे कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असतील, त्यांना अटल विमा कल्याण योजनेतून मदत मिळणार आहे.अशी मिळावा पात्र-अपात्रतेची माहितीबेरोजगार झालेल्या कामगारांना या अटल विमा कल्याण योजनेतील मदत मिळविण्यासाठी ते पात्र आहेत की, अपात्र हे ईएसआयसी आयपी पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेता येईल. या पोर्टलवर कामगारांनी त्यांचा १० अंकी विमा क्रमांक नोंदविल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेल. दर महिन्यात त्यांच्याकडून आणि कंपनीकडून किती रक्कम वर्गणीपोटी ईएसआयसीकडे जमा झाली हेही जाणून घेता येईल.

या योजनेतून मदत मिळविण्यासाठी संबंधित कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक आहे. योजनेची माहिती ईएसआयसी आयपी पोर्टलवर उपलब्ध आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार योजनेबाबतची पुढील कार्यवाही जिल्हा पातळीवर करण्यात येईल.- सूरज रेवणकर, शाखा प्रबंधक, ईएसआयसी, कोल्हापूर

असंघटित क्षेत्रात काम करणारे, ईएसआयसी लागू नसणारे, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेकजण कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने लवकर घ्यावा, या मागणीसाठी लवकरच कामगार संघटना संयुक्त कृती समितीद्वारे निदर्शने केली जाणार आहेत.- अतुल दिघे, निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • ईएसआयसीकडे नोंदणी असणारे कोल्हापुरातील कामगार : १०७३८१
  • भविष्यनिर्वाह निधीत सध्या समावेश असलेले कोल्हापूर विभागातील कामगार : ३०१४१९
  •  या निधीतून कमी झालेले कामगार : २७४२२

 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर