शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 कोल्हापूरमध्ये जल्लोष सुरु.... काँग्रेसचे वारे वाहू लागले...लोकमतचे वृत्त खरे ठरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 16:43 IST

Maharashtra Assembly Election 2019 अंगावर गुलाल, हातात काँग्रेसचा झेंडा सोबतीला रॅली व जल्लोष असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. यामध्ये विशेषत: महिला, युवती, व तरुणाईचा जोश दिसत आहे. यामुळे कोल्हापूर शहरात आता काँग्रेसचे वारे वाहू लागलेच चित्र सर्वत्र दिसू लागले. याविषयी कोल्हापूरमध्ये विजय कोणाचा असेल याची लोकमतचे अचूक वृत्त खरे ठरले आहे.

ठळक मुद्देदुपारी २ वाजेपर्यंत आघाडीवर असलेले चंदगड मतदार संघातील वंचितचे अप्पी पाटील हे मागे पडले आणि

कोल्हापूर : राज्यात सर्वात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर मधील दक्षिण, उत्तर, कागल, करवीर या मतदारसंघामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळविल्याने जल्लोषाला उधाण आले आहे. ऋतुराज पाटील यांच्या अजिंक्यतारा, चंद्रकांत जाधव यांचा मंगळावर पेठेत, पी.एन. पाटील यांच्या टाकाळासमोरील घराजवळ, कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष सुरु आहे. वारणेत विनय कोरे, गारगोटीत प्रकाश आबिटकर, हातकणंगले राजू आवळे, इचकरंजीत प्रकाश आवाडे व जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील (यड्रावकर), या विजयी उमेदवारांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले चंदगडचे वंचितच उमेदवार अप्पी पाटील यांना शेवटच्या फेरीत धोबीपछाड देत राष्ट्रवादीचे राजेश पाटील यांनी साकारलेल्या विजयानंतर चंदगडमध्ये कार्यकर्त्यांचा आनंदाला पारावर उरला नाही. अंगावर गुलाल, हातात काँग्रेसचा झेंडा सोबतीला रॅली व जल्लोष असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. यामध्ये विशेषत: महिला, युवती, व तरुणाईचा जोश दिसत आहे. यामुळे कोल्हापूर शहरात आता काँग्रेसचे वारे वाहू लागलेच चित्र सर्वत्र दिसू लागले. याविषयी कोल्हापूरमध्ये विजय कोणाचा असेल याची लोकमतचे अचूक वृत्त खरे ठरले आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपा आणि शिवसेना यांचा पराभव झाल्याने पूर्णत: सन्नाटा पसरला आहे. भाजपचे दोन्ही तर शिवसेनेचे पाच उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेनेचे असलेले वर्चस्व व भाजपाने घेतलेला वेग या निवडणुकीत कमी झाला आहे. मतदारांनी आपला कौल देत कोल्हापूरसह सर्व १० मतदारसंघातील चित्रच पालटून टाकले आहे. पुन्हा एकदा मतदारांची निर्णयक्षमता व कोल्हापूरचे राजकारण सर्वात भारीच असेच दाखवून देत, आमचं ठरलंय आणि तसच करून दाखवलय.. हे ब्रिद वाक्य खर करून दाखविले.

यात राज्यभरातून कोल्हापूरमधून चंदगडची दुपारी २ वाजेपर्यंत आघाडीवर असलेले वंचितचे अप्पी पाटील हे मागे पडले आणि शेवटच्या दोन फेरीमध्ये राजेश पाटील निवडून आले. त्यामुळे वंचितच विजयाचे स्वप्न येथे भंग पावल्याचे दिसले.येथील १० ही मतदार संघाचा निकाल जवळपास लागला असून दुपारी २.३० पर्यंत विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव हे विजयी झाले आहेत. 

‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खरा

  • कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यावर ‘लोकमत’ने बुधवार (दि. २३)च्या अंकात कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार, यासंबंधी वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. कोल्हापूर जिल्ह्यात युतीला ब्रेक लागणार आणि काँग्रेस आघाडी सुसाट असे म्हटले होते. त्यानुसारच निकाल लागल्याने ‘लोकमत’च्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली.
  • जिल्ह्यातील १0 पैकी सहा जागा काँग्रेस आघाडीला मिळाल्या. शिवसेनेला फक्त एकच राधानगरीची जागा मिळाली आहे. त्यातही ती पक्षापेक्षा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विजय आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर हे भाजप-ताराराणी आघाडीने मनापासून काम केले असेल, तरच विजयी होतील, असे म्हटले होते. या निकालावरून या आघाडीने क्षीरसागर यांना मनापासून साथ दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे. अन्य सर्व निकाल ‘लोकमत’ने आधीच जाहीर केल्यानुसारच लागले आहेत.

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक