शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

तासिका तत्त्वावरील गुरुजी शेतमजुरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : उच्च शिक्षणाला बळ देण्याची भूमिका असल्याचे सांगणाऱ्या राज्य सरकारकडून अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने काम सुरू असल्याचे दिसत ...

कोल्हापूर : उच्च शिक्षणाला बळ देण्याची भूमिका असल्याचे सांगणाऱ्या राज्य सरकारकडून अगदी त्याच्या विरुद्ध दिशेने काम सुरू असल्याचे दिसत आहे. सरकारच्या वेळकाढूपणामुळे गेल्या दहा वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक, सहायक प्राध्यापकपदाची भरती रखडली असून, त्याचा फटका तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या सहायक प्राध्यापकांना बसत आहे. तुटपुंजे मानधन आणि ते देखील दर महिन्याला नियमितपणे मिळत नसल्याने या ‘सीएचबी’धारकांवर शेतमजुरी, सेंट्रिंग, हॉटेल, दुकान, आदी ठिकाणी पर्यायी कामे करून कुटुंबाचा खर्च भागविण्याची वेळ आली आहे.

राज्यातील विविध वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे ३५ हजार पदे रिक्त आहेत. त्यातील ४५०० पदे भरण्यास राज्य शासनाने मान्यता, तर उच्चशिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. पण, वित्त विभागाने निधी नसल्याचे सांगितल्याने या पदांची भरती थांबली आहे. त्यातच महाविद्यालये अद्याप ऑफलाईन पद्धतीने सुरू झाली नसल्याने अनेक सीएचबीधारकांना कामाची संधी मिळालेली नाही. काहींना संधी मिळाली असली, तरी तुटपुंजे आणि अनियमितपणे मानधन मिळत असल्याने त्यांची आर्थिक परवड होत आहे. रिक्त पदे लवकर भरून राज्य शासनाने आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी या सीएचबीधारकांकडून होत आहे.

किती दिवस जगायचे असे?

गेल्या दोन वर्षांपासून सीएचबीचे मानधन मिळालेले नाही. त्यामुळे स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या शेतात काम करून घरखर्च भागवित आहे. शैक्षणिक पात्रता असूनही केवळ रिक्त पदे भरण्याच्या शासनाच्या वेळकाढूपणाचा आम्हाला फटका बसत आहे. शासनाने लवकर भरती सुरू करावी.

- भीमाशंकर गायकवाड

राज्य प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची सुमारे ३५ हजार पदे रिक्त आहेत. त्यांची भरती होण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आमचा लढा सुरू आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मागील नऊ महिन्यांचे सीएचबीधारकांचे मानधन अदा करणार असल्याचे सांगितले आहे.

- संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, नवप्राध्यापक संघटना

सहायक प्राध्यापकांची भरती रखडल्याने अनेक सीएचबीधारकांना शेतमजूर, सेंट्रिग, हॉटेल, दुकानांमध्ये कामगार म्हणून पर्यायी कामे करावी लागत आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा.

- किशोर खिलारे

सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच

१) नेट-सेट, पीएच.डी, एम.फील. करण्यासाठी जीवनातील सहा ते सात वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरही नोकरी मिळत नाही.

२) प्राध्यापक भरतीसाठी डोनेशन मागितले जाते. ते देणे अनेकांना शक्य होत नाही.

३) उच्च शैक्षणिक पात्रता असल्याने इतर स्वरूपातील काम मिळविताना काही अडचणी येतात.

दहा वर्षांपासून लटकला प्रश्न

गेल्या दहा वर्षांपासून प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांच्या सुमारे ३५ हजार रिक्त पदांच्या भरतीचा प्रश्न लटकला आहे. भरतीसाठी विविध संघटनांनी आंदोलन केल्यानंतर सरकारकडून भरतीची घोषणा होते. पण, पुढे काहीच होत नाही. आज ना उद्या कायमस्वरूपी भरती होईल, या आशेवर तुटपुंज्या मानधनावर हजारो सीएचबीधारक राबत आहेत.

080921\08kol_1_08092021_5.jpg

डमी (०८०९२०२१-कोल-डमी ११४६)