शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे काम दिशादर्शक : अरुण काकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 16:53 IST

ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीचे आकडे पाहिल्यानंतर या संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.

ठळक मुद्देस्वामी विवेकानंद पतसंस्थेचे काम दिशादर्शक  :अरुण काकडे कोल्हापूर कसबा गेट शाखेचे उद्घाटन

कोल्हापूर : ग्रामीण भागामध्ये आपला व्यवसाय सांभाळून सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या प्रगतीचे आकडे पाहिल्यानंतर या संस्थेचे काम दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी काढले.आजरा येथील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवव्या आणि कोल्हापुरातील दुसऱ्या कसबा गेट शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. लईस शहा होते. एकूणच पतसंस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेताना काकडे म्हणाले, गरजेतून पतसंस्थांची निर्मिती झाली आणि त्या विश्वासाच्या पाठबळावर टिकल्या. मध्यंतरी या संस्थांच्या भवितव्याबाबत जोरदार चर्चा झाली. मात्र २०१५ नंतर महाराष्ट्र शासनाने केलेल्या सर्वच पतसंस्थांच्या कडक तपासणीनंतर आता टिकणाऱ्या संस्थाच तेवढ्या शिल्लक राहिल्या आहेत. २००७ पासून स्वामी विवेकानंद पतसंस्थेची वाटचाल मी पाहत आहे. नेमक्या पद्धतीने सभासदांच्या हिताचा विचार करून संस्थेचे कामकाज सुरू आहे. कोकण विभागामध्ये तर स्वामी विवेकानंद पतसंस्था ही दिशादर्शक ठरली आहे.अध्यक्ष अ‍ॅड. लुईस शहा म्हणाले, माझा आणि या संस्थेचा ऋणानुबंध अनेक वर्षांचा आहे. बदलत्या परिस्थितीतही पतसंस्था टिकणे गरजेचे आहे. मध्यंतरी या चळवळीबाबत गैरसमज निर्माण झाले. मात्र त्यावेळी फारच एकांगी मांडणी करण्यात आली. पतसंस्थेचे विश्वस्त म्हणून काम करण्याची गरज आहे.संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, २०० सभासद आणि ५० हजार रुपयांच्या ठेवींवर सुरू झालेल्या या संस्थेचा वार्षिक व्यवसाय आज १५० कोटींच्या घरात आहे. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह भादवण, पेरणोली, मुंबई, सावंतवाडी, कोल्हापूर येथे स्वमालकीच्या शाखा इमारती आहेत. कोल्हापुरातील आझाद चौक शाखा ही सर्वसामान्य महिलांसाठी आधारवड ठरली असून, याच भूमिकेतून कसबा गेट शाखाही काम करील.यावेळी जागामालक सुभाष पाटील, इंजिनिअर नितीन सोहनी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले; तर संस्थेचे माजी अध्यक्ष मलिककुमार बुरुड यांनी आभार मानले.कार्यक्रमाला संस्थेचे व्हाइस चेअरमन दयानंद भुसारी, संस्थेचे माजी अध्यक्ष बापू टोपले, हरी नार्वेकर, तुकाराम कोटकर, सुभाष नलवडे, ज्येष्ठ संचालक नारायण सावंत, रवींद्र दामले, रामचंद्र्र पाटील, महेश नार्वेकर, सुधीर कुंभार, संजय घंटे, सुरेश कुंभार, राजेंद्र चंदनवाले, प्रेमा सुतार, माधवी कारेकर, आझाद चौक शाखा चेअरमन सुनील निकम, जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार, शाखा व्यवस्थापक नारायण बेहरे यांच्यासह सल्लागार उपस्थित होते. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर