शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

साखर विक्रीचा हमीभाव ३४ रुपये निश्चित करा; जयंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:17 IST

इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ ...

इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ रुपयांऐवजी ३४ रुपये निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या २०१८-१९ च्या ४९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आ. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, अतिरिक्त साखर हे या उद्योगासमोरील मोठे संकट आहे. गेल्यावर्षीची १०० लाख क्विंटल साखर शिल्लक असून, यावर्षी साधारण ३०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. आपल्या देशाची २४२ लाख क्विंटल साखरेची गरज आहे. म्हणजे हा हंगाम संपताना १५८ लाख क्विंटल अतिरिक्त साखर देशात असणार आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांना बोलावून साखर उद्योगासमोरील अडचणी सांगितल्या आहेत. सरकारने साखर विक्रीची किंमत ३५०० रुपये केली, तर बरेच प्रश्न सुटणार आहेत. राज्य सरकारने साखर निर्यातीस केंद्र सरकारप्रमाणे वाहतुकीस अनुदान जाहीर करावे. मध्यंतरी मी व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या लवादाने तोडणी मजुरांना सध्याच्या दरावर ५ टक्के वाढ केलेली आहे. आपल्या ‘लक्ष्य १०० टनाचे’ या प्रकल्पास मोठे यश मिळाले आहे.ते म्हणाले, परिपक्व ऊस उत्पादनासाठी शेती विभागामार्फत मार्गदर्शन होणार आहे. लहान शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल. यापुढील काळात ऊस नोंदणी, तोडणी अशी सर्व कामे मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शीपणे केली जाणार आहेत.