शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

भेग वाढतेय; पूल कोसळल्यावरच जाग येणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:32 IST

उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भेगेकडे रस्ते विकासच्या अधिकाºयांचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच लक्ष देणार काय? ...

उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भेगेकडे रस्ते विकासच्या अधिकाºयांचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच लक्ष देणार काय? असा सवाल वाहनधारक व ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.उजळाईवाडी (ता. करवीर) येथील या उड्डाणपुलावरुन कोल्हापूरहून एमआयडीसी, कागल, कर्नाटकसह पूर्व भागाला जाणारी सर्व वाहतूक होते. त्यामुळे दररोज हजारो वाहने या उड्डाणपुलावरुन ये-जा करतात. या पुलाच्या बरोबर मध्यभागी मुख्य पिलरवर उभ्या असलेल्या रस्त्याच्या जॉइंटला मोठी भेग पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रहदारीमुळे या भेगेचे अंतर वाढत चालले आहे. गत पावसाळ्यात याकडे लक्ष वेधले असता रबरबेल्टने ही भेग जोडण्याची किमया केली होती. आता रबरबेल्टही तुटून पडले असून या भेगेतील अंतरही वाढले आहे. त्यामुळे एखाद्या दुचाकी वाहनांचे चाकही या भेगेत अडकून अपघात होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष झाल्यास उड्डाणपूलही कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरुन व ुपुलाखालून जाणारे रोज जीव मुठीत धरूनच प्रवास करीत आहेत. त्यामुळे हा गंभीर प्रकार लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.