शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

भेग वाढतेय; पूल कोसळल्यावरच जाग येणार काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:32 IST

उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भेगेकडे रस्ते विकासच्या अधिकाºयांचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच लक्ष देणार काय? ...

उचगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाºया उजळाईवाडी (ता.करवीर) येथील उड्डाणपुलाच्या जॉइंटला (जोड) पडलेल्या भेगेतील अंतर दिवसेंदिवस वाढत असून पुलाला धोका निर्माण झाला आहे. पुलावरुन प्रवास करताना वाहनधारकांना धडकी भरत आहे. वारंवार या वाढत्या भेगेकडे रस्ते विकासच्या अधिकाºयांचे लक्ष वेधूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यावरच लक्ष देणार काय? असा सवाल वाहनधारक व ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.उजळाईवाडी (ता. करवीर) येथील या उड्डाणपुलावरुन कोल्हापूरहून एमआयडीसी, कागल, कर्नाटकसह पूर्व भागाला जाणारी सर्व वाहतूक होते. त्यामुळे दररोज हजारो वाहने या उड्डाणपुलावरुन ये-जा करतात. या पुलाच्या बरोबर मध्यभागी मुख्य पिलरवर उभ्या असलेल्या रस्त्याच्या जॉइंटला मोठी भेग पडली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रहदारीमुळे या भेगेचे अंतर वाढत चालले आहे. गत पावसाळ्यात याकडे लक्ष वेधले असता रबरबेल्टने ही भेग जोडण्याची किमया केली होती. आता रबरबेल्टही तुटून पडले असून या भेगेतील अंतरही वाढले आहे. त्यामुळे एखाद्या दुचाकी वाहनांचे चाकही या भेगेत अडकून अपघात होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष झाल्यास उड्डाणपूलही कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरुन व ुपुलाखालून जाणारे रोज जीव मुठीत धरूनच प्रवास करीत आहेत. त्यामुळे हा गंभीर प्रकार लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.