शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

समरजितसिंह घाटगेंकडून गटाची पुनर्बांधणी जोरात

By admin | Updated: January 28, 2017 01:18 IST

अनेक मान्यवरांचा भाजप प्रवेश : नवा पर्याय देण्याचा प्रयत्न

कागल : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे कागल तालुक्यात १९८०च्या दशकात बलाढ्य असलेल्या राजे गटाचीही पुनर्बांधणी करीत असल्याचे पक्ष प्रवेश कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. खरे तर सध्या तालुक्याच्या राजकारणात ते अजून नवखेच आहेत. तरीही अनेक मान्यवर भाजपमध्ये पर्यायाने राजे गटात प्रवेश करीत असल्याने या गटाचे अस्तित्व आता ठळकपणे समोर येऊ लागले आहे.मंडलिक-घाटगे या दोन राजकीय गटांत कागल तालुका विभागल्यानंतर येथील राजकारण कमालीचे टोकदार आणि संघर्षपूर्ण झाले होते. १९८० ते २००० पर्यंत २० वर्षे हा कट्टर राजकारणाचा कालखंड होता. त्यानंतर सुरुवातीला घाटगे गट, तर नंतर मंडलिक गटात उभी फूट पडून अनुक्रमे संजय घाटगे गट, मुश्रीफ गट आणि मुरगूडकर-पाटील गट असे राजकीय गट तयार झाले. मात्र, राजकीय सत्ता टिकविण्यात विक्रमसिंहराजे गट वगळता सर्वच गट यशस्वी झाले. गटांमध्ये फाटाफूट झाली तरी मंडलिकांची खासदारकी, मुश्रीफांची आमदारकी, संजय घाटगेंची पंचायत समितीची, तर पाटील गटाची गोकुळ, मुरगूडची सत्ता कायम राहिली होती. या पार्श्वभूमीवर सध्या राजे गटाच्या आक्रमकतेला विशेष महत्त्व आहे. त्यातूनच या गटाचे ध्रुवीकरणही झपाट्याने होत आहे.जुन्या घाटगे गटात फूट पडण्याआधी संजय घाटगे, रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, तसेच उदयबाबा घोरपडेही होते. नगरपालिका निवडणुकीपर्यंत संस्थात्मकृदृष्ट्या किंवा आकडेवारीत राजे गटाचे स्थान चौथ्या क्रमांकाचे होते. आता मात्र, या गटाची पर्यायाने समरजितसिंह घाटगेंच्या नेतृत्त्वाची तालुकाभर चर्चा सुरू आहे. रणजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उदय घोरपडे, धरणग्रस्त संघटनेचे बाबूराव पाटील, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव इंगळे यांचे चिरंजीव भैया इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश झाला आहे. आता हा गट नेमक्या कितव्या स्थानावर पोहोचला आहे, हे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे. तूर्ततरी पक्षप्रवेशाचे काम जोरात सुरू आहे.बडे नेते लक्ष्य : विकासाचा लेखा-जोखासमरजितसिंह घाटगेंनी गेल्या आठवड्यात तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करीत विकासाचा लेखा-जोखा मांडला आहे. तालुक्याच्या विकासावर भाष्य करताना आपण नवा पर्याय देऊ शकतो हे सांगत आहेत. त्यामुळे आमदार मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय घाटगेंनाही आता यावर भाष्य करावे लागणार आहे. कारण विकासाच्या उणिवा ते दाखवित आहेतकागलमध्ये राजकीय भूकंप : घाटगे१९७८ चा राजकीय काळ परत आणायचा आहे. यावेळी कागल तालुक्यात असणारा राजे विक्रमसिंह घाटगे गट पुनर्जीवित करायचा आहे, असे सांगत समरजितसिंह घाटगे म्हणाले, गेल्या २५ वर्षांत राजे गटाचा केवळ वापरच करून घेतला जात आहे; परंतु आता या गटातील दुरावलेला एक-एक कार्यकर्ता एकसंध होत आहे. तसेच येत्या ४८ तासांत कागलमध्ये आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राजे गटात विलीन होणारा तो नेता कोण? या चर्चेला उधाण आले असून, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत..