शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

बेळगावची लढाई जिंकू शकेल एकगठ्ठा मराठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

निवडणूक आयोगाने जात, भाषा आणि इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवू नका, असे निर्बंध घातले तरी, स्वाभाविक सहकार्य आणि आपल्या माणसाला ...

निवडणूक आयोगाने जात, भाषा आणि इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवू नका, असे निर्बंध घातले तरी, स्वाभाविक सहकार्य आणि आपल्या माणसाला सत्ताधीश करण्याची माणसा-माणसामधील भूमिका शांत बसू देत नाही. शिवाय लोकशाहीनेच तसा अधिकारही दिलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत लोकसभा पोटनिवडणुकीत बेळगावची लढाई अशीच सुरू आहे. ही लढाई राष्ट्रीय पक्षांना अवघड जात असून एकगठ्ठा मराठी मते जर समिती उमेदवाराला पडली, तर मराठा समाज आणि मराठी भाषिक या निवडणुकीत विजयी होऊ शकतो.

बेळगाव लोकसभा मतदारसंघ बहुभाषिक आहे. १८.२७ लाख एकूण मतदार आहेत. या मतदारसंघात सर्वाधिक संख्या आहे लिंगायत मतदारांची. लिंगायत मतदार ६.२५ लाख आहेत. यापाठोपाठ ३.२५ लाख मराठा मतदारांचा क्रमांक लागतो. १.८० लाख कुरबर, ६५ हजार विणकर, ४० हजार जैन, ४० हजार ब्राम्हण, तसेच २ लाख मुस्लिम आणि २ लाख मागासवर्गीय मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघात सध्या एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये खरी रस्सीखेच सुरू असून त्यांना समितीच्या शुभम शेळके यांचे आव्हान आहे. बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण या तीन विभागातील एकगठ्ठा मराठी मते, काँग्रेस आणि भाजपमधील नाराज वर्गाची मते, तसेच मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाची २० टक्के मते जरी शुभम शेळके यांना पडली, तर विजय निश्चित असल्याचे राजकीय अभ्यासक सध्या बोलत आहेत.

सुरेश अंगडी लिंगायत आणि मराठा मतांवर निवडून येत होते. याच मतांवर भाजपची अर्थात मंगला अंगडी यांची भिस्त आहे. मात्र महागाई व इतर अनेक कारणांमुळे जनतेत भाजपबद्दल नाराजी असून, याचा फटका बसेल, की लोक सहानुभूतीने त्यांना मतदान करतील, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. घराणेशाही नाही असे म्हणणाऱ्या भाजपने मंगला अंगडी यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेला भाजपमधील अंतर्गत गट सावरला गेला नाही, तर भाजपला ही निवडणूक अवघड ठरणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी हे वाल्मिकी नायक समाजातील असून, आपण जातीय समीकरणांवर विश्वास ठेवत नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे सर्व समाजातील लोकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. दिग्गज नेत्यांना आमंत्रित करून सर्व समाजाच्या गाठीभेटी घेण्यावर काँग्रेसचा भर आहे. १५ वर्षांपासून भाजपने काँग्रेसला या मतदारसंघात डोके वर काढू दिलेले नाही, यामुळे काँग्रेसची परिस्थिती अवघडच आहे.