शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

खरिपातील भुईमूग लागवड किफायतशीर

By admin | Updated: June 14, 2016 00:12 IST

नगदी पीक : महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, तमिळनाडूसह कर्नाटक राज्यांत लागवड

जमिनीचा पोत आणि मानवाचे आरोग्य सुधारणारे भुईमूग हे पीक शेतीकार्याला निश्चित आर्थिक लाभ मिळवून देणारे हुकमी पीक आहे. देशातील महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत खरीप हंगामात लागवड केली जाते. भारतात जवळपास नव्वद लाख हेक्टर क्षेत्रांवर, तर त्यापैकी महाराष्ट्रात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत आहे. या पिकाची लागवड चांगला निचरा होणारी, सेंद्रिय खतमिश्रित जमिनीवर करावी. जमिनीला नांगरणीच्या चार पाळ्या द्याव्यात. एकरी किमान चार ते पाच ट्रॉली शेणखत द्यावे. त्यात कार्बारील १0 टक्के पंधरा किलो द्यावे. जून ते जुलै महिन्यांत या पिकाची टोकण पद्धतीने सुधारित वाणाची लागवड करावी. पेरणीपूर्व हेक्टरी वीस किलो युरिया, चाळीस किलो स्फुरद किंवा अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. पावसाळ्यात हेक्टरी अडीचशे किलो जिप्सम द्यावे. तरीही जमिनीच्या प्रतीनुसार रासायनिक खतांची मात्रा दिल्यास उत्पादनात अधिक वाढ होईल. भुईमुगाच्या सुधारित आणि संशोधित पंचेचाळीस जाती आहेत. यातील योग्य जातीची निवड करावी. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामुळे सुमारे वीस टक्के उत्पादन वाढले जाते. बीजप्रक्रिया करताना रायझोबियम जीवाणूंचा वापर करावा. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक चोळावे. पसरी जातीची लागवड केल्यास उपटी जातीपेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते. तीन ते चार सरी आड एक सरी नांगरीचे खोलगट तास दिल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते. स्वतंत्रपणे भुईमूग लागवड केल्यास उत्तम, मात्र तसे शक्य नसल्यास मिरची, ऊस, सोयाबीन पिकात भुईमुगाचे आंतरपीक म्हणून लागवड करावी. जमिनीच्या प्रतीनुसार दोन ओळीत ३० किंवा ४५ सेमी अंतर आणि दोन आळ्यांमध्ये १० किंवा १५ सेमी अंतर ठेवावे. पक्वतेसाठी पाने पिवळी पडू लागल्यावर काही शेंगा काढून फोडून पाहाव्यात. टरफल आतील बाजूने काळे पडू लागले की पीक पूर्ण पक्व झाले असे समजावे. काही झाडे उपटून ७५ टक्के शेंगा पक्व झाल्यावर पिकाची काढणी करावी. एकरी सात ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते.माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भुदरगडचे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी केले आहे. जिप्सममुळे उत्पादनात भरजिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगल्या प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रूपांतरित होते; पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात अत्यल्प प्रमाणात करतात. भुईमुगाचे उत्पादन वाढविण्यात हे विशेष मदत करते.शिवाजी सावंत, गारगोटी