शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण झाल्यास हरितक्रांती

By admin | Updated: December 30, 2014 23:38 IST

प्रामाणिक प्रयत्नांची गरज : शेतीच्या, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण थांबेल

नामदेव पाटील - पांगिरे -शासनाच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दिंडेवाडी-बारवे लघुपाटबंधारे प्रकल्प गेल्या १४ वर्षांपासून रेंगाळला आहे. प्रशासनाने उदासिनता न दाखविता प्रामाणिक प्रयत्न केले, तर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तसेच लाभधारक क्षेत्रातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही.झुलपेवाडी आणि दिंडेवाडीचा हा प्रकल्प एकत्रित बेलेवाडी का (ता. कागल) येथे करण्यात येणार होता. मात्र, तो रद्द होऊन चिकोत्रा नदीवर झुलपेवाडी (ता. आजरा) व दिंडेवाडी-बारवे (ता. भुदरगड) असे दोन भाग करण्यात आले. पहिल्या टप्प्यात झुलपेवाडी धरणासाठी पुनर्वसनासाठी पुरेशी जमीन संपादित केली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या दिंडेवाडी-बारवे प्रकल्पासाठी जमीन संपादित केली नाही. दोन्ही प्रकल्पासाठी एकत्रित पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जमिनीचा आराखडा शासनाने तयार केला असता, तर पुनर्वसनाचा प्रश्नच निर्माण झाला नसता. या प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रात १०० हेक्टर जमीन जात असून, ८४० द. ल. घ. मी. पाणी साठणार आहे. त्यामुळे दिंडेवाडी, बारवे, हेळेवाडी, पांगिरे, नागनवाडी (ता. भुदरगड), मांगनूर, हसूर बु।।, हसूर खुर्द या आठ गावांतील ७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. बुडीत क्षेत्रातील ३७१ खातेदारांच्या जमिनी या प्रकल्पात जात असून, या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २१२ हेक्टर जमीन देय लागत होती. मात्र, १०१ खातेदारांना स्वेच्छा पुनर्वसन घेतल्याने व उर्वरित २७० खातेदारांपैकी ३३ खातेदारांचे पुनर्वसन झाले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी ११२ हेक्टर जमीन देय लागते. यासाठी लाभ क्षेत्रातील २४ हेक्टर जमीन संपादित केली आहे.कापशी, नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, हमीदवाडा येथील जमीन चार एकर स्लॅबप्रमाणे संपादित करावयाची होती. मात्र, तेथे राजकीय पोळी भाजण्यासाठी चार एकरांऐवजी आठ एकरांचा स्लॅब लागू करण्यात आला. त्यामुळे तेथे पुरेशी जमीन मिळू शकत नाही. शासनाने २०१३ ला ३२ खातेदारांना जमीन वाटपाचे आदेश काढण्यात आले. मात्र, त्यांना त्या त्या जमिनीचे वाटप करण्यात आले नाही. ज्यांच्या नावाने आदेश काढले आहेत त्यांना निर्वाहभत्ता भू-भाडे यांच्या रकमा देण्यात आल्या नाहीत. कुटुंब लहान किंवा मोठे असले, तरी सर्वांना दरमहा ४०० रुपयांप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातो. मात्र, अद्याप याचे वाटप करण्यात आले नाही. काही २० गुंठ्यांपेक्षा कमी जमीन गेलेल्या धरणग्रस्तांना दाखले दिले नाहीत. दाखलेधारकांना नोकरीऐवजी पैसे देणे, जमिनीऐवजी तुटपुंज्या रकमा देण्याचे प्रस्ताव कृती समितीला विचारात न घेता पाठविले आहेत. त्यामुळे अशा निर्णयामुळे आधीच भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय? ‘तुमचे धरण आमचे मरण’, अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. त्यामुळे ‘आधी पुनर्वसन मगच धरण’, अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल, तर जुनी समिती बरखास्त करून धरणग्रस्तांनी नवीन शासकीय कमिटी नेमावी. पाटबंधारे विभाग पुनर्वसन आणि भू-संपादन या तिन्ही विभागांवर नियंत्रण व झालेल्या कामाची चौकशी व त्रुटी दूर होण्यासाठी समितीतील सदस्य अशी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यालयात स्वतंत्र विभाग निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शासनाने धरणग्रस्तांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक आहे. (उत्तरार्ध)दिंडेवाडी-बारवे प्रकल्पामुळे चिकोत्रा खोऱ्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. - आमदार प्रकाश आबिटकरजिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्र्रस्तांवरपुनर्वसनापासून वंचित राहण्याची वेळ शासनाने आणली आहे. हा प्रकल्प १४ वर्षे रेंगाळला आहे. जोपर्यंत शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जी काही लढाई लढावी लागणार ती कायदेशीर लढणार.- संतोष देशपांडे (प्रकल्पग्रस्त कमिटी सदस्य)