शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिंडेवाडी-बारवे प्रकल्प पूर्ण झाल्यास हरितक्रांती

By admin | Updated: December 30, 2014 23:38 IST

प्रामाणिक प्रयत्नांची गरज : शेतीच्या, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण थांबेल

नामदेव पाटील - पांगिरे -शासनाच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे दिंडेवाडी-बारवे लघुपाटबंधारे प्रकल्प गेल्या १४ वर्षांपासून रेंगाळला आहे. प्रशासनाने उदासिनता न दाखविता प्रामाणिक प्रयत्न केले, तर या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तसेच लाभधारक क्षेत्रातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही.झुलपेवाडी आणि दिंडेवाडीचा हा प्रकल्प एकत्रित बेलेवाडी का (ता. कागल) येथे करण्यात येणार होता. मात्र, तो रद्द होऊन चिकोत्रा नदीवर झुलपेवाडी (ता. आजरा) व दिंडेवाडी-बारवे (ता. भुदरगड) असे दोन भाग करण्यात आले. पहिल्या टप्प्यात झुलपेवाडी धरणासाठी पुनर्वसनासाठी पुरेशी जमीन संपादित केली. मात्र, दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या दिंडेवाडी-बारवे प्रकल्पासाठी जमीन संपादित केली नाही. दोन्ही प्रकल्पासाठी एकत्रित पुनर्वसनासाठी लागणाऱ्या जमिनीचा आराखडा शासनाने तयार केला असता, तर पुनर्वसनाचा प्रश्नच निर्माण झाला नसता. या प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्रात १०० हेक्टर जमीन जात असून, ८४० द. ल. घ. मी. पाणी साठणार आहे. त्यामुळे दिंडेवाडी, बारवे, हेळेवाडी, पांगिरे, नागनवाडी (ता. भुदरगड), मांगनूर, हसूर बु।।, हसूर खुर्द या आठ गावांतील ७५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. बुडीत क्षेत्रातील ३७१ खातेदारांच्या जमिनी या प्रकल्पात जात असून, या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना २१२ हेक्टर जमीन देय लागत होती. मात्र, १०१ खातेदारांना स्वेच्छा पुनर्वसन घेतल्याने व उर्वरित २७० खातेदारांपैकी ३३ खातेदारांचे पुनर्वसन झाले आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांसाठी ११२ हेक्टर जमीन देय लागते. यासाठी लाभ क्षेत्रातील २४ हेक्टर जमीन संपादित केली आहे.कापशी, नंद्याळ, अर्जुनवाडा, करड्याळ, हमीदवाडा येथील जमीन चार एकर स्लॅबप्रमाणे संपादित करावयाची होती. मात्र, तेथे राजकीय पोळी भाजण्यासाठी चार एकरांऐवजी आठ एकरांचा स्लॅब लागू करण्यात आला. त्यामुळे तेथे पुरेशी जमीन मिळू शकत नाही. शासनाने २०१३ ला ३२ खातेदारांना जमीन वाटपाचे आदेश काढण्यात आले. मात्र, त्यांना त्या त्या जमिनीचे वाटप करण्यात आले नाही. ज्यांच्या नावाने आदेश काढले आहेत त्यांना निर्वाहभत्ता भू-भाडे यांच्या रकमा देण्यात आल्या नाहीत. कुटुंब लहान किंवा मोठे असले, तरी सर्वांना दरमहा ४०० रुपयांप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातो. मात्र, अद्याप याचे वाटप करण्यात आले नाही. काही २० गुंठ्यांपेक्षा कमी जमीन गेलेल्या धरणग्रस्तांना दाखले दिले नाहीत. दाखलेधारकांना नोकरीऐवजी पैसे देणे, जमिनीऐवजी तुटपुंज्या रकमा देण्याचे प्रस्ताव कृती समितीला विचारात न घेता पाठविले आहेत. त्यामुळे अशा निर्णयामुळे आधीच भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल काय? ‘तुमचे धरण आमचे मरण’, अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. त्यामुळे ‘आधी पुनर्वसन मगच धरण’, अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे.हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल, तर जुनी समिती बरखास्त करून धरणग्रस्तांनी नवीन शासकीय कमिटी नेमावी. पाटबंधारे विभाग पुनर्वसन आणि भू-संपादन या तिन्ही विभागांवर नियंत्रण व झालेल्या कामाची चौकशी व त्रुटी दूर होण्यासाठी समितीतील सदस्य अशी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यालयात स्वतंत्र विभाग निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शासनाने धरणग्रस्तांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक आहे. (उत्तरार्ध)दिंडेवाडी-बारवे प्रकल्पामुळे चिकोत्रा खोऱ्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. - आमदार प्रकाश आबिटकरजिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्र्रस्तांवरपुनर्वसनापासून वंचित राहण्याची वेळ शासनाने आणली आहे. हा प्रकल्प १४ वर्षे रेंगाळला आहे. जोपर्यंत शेवटच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जी काही लढाई लढावी लागणार ती कायदेशीर लढणार.- संतोष देशपांडे (प्रकल्पग्रस्त कमिटी सदस्य)