शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष महोत्सवाचा गोडवा २१ लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गोव्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गोव्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात भरविण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे गोडवा २१ लाखांवर पोहोचला. शाहू स्मारकमध्ये पाच दिवस झालेल्या या महोत्सवात ३० टन द्राक्षांची, तर एक टन बेदाण्याची विक्री झाली.

द्राक्ष महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. शुक्रवार, २६ पासून सुरू झालेल्या या महोत्सवात मिरज, पलूस, तासगाव, जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्रीची साखळी तयार करण्यासाठी म्हणून पणन मंडळाच्या पुढाकाराने झालेल्या या महोत्सवाला पहिल्या दिवसापासू्नच कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. निर्यातीच्या दर्जाची, मधुर गोडीच्या द्राक्षांची खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र होते. सरासरी ६० रुपये किलो या दराने ही द्राक्षे मिळत असल्याने ग्राहकांच्याही उड्या पडल्या. पहिल्या दोनच दिवसांत १२ टन द्राक्षांची विक्री झाली. पाच दिवसांच्या या महोत्सवात झालेल्या द्राक्ष विक्रीतून १८ लाख, तर बेदाणे विक्रीतून २ लाख ७३ हजार रुपये द्राक्ष उत्पादकांच्या पदरात पडले.

चौकट ०१

ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मंगळवारी द्राक्ष महोत्सवाला भेट देऊन द्राक्षांचा आस्वाद घेतला. त्यांच्या या भेटीने महोत्सवाच्या ठिकाणचे वातावरणही भारावले होते. त्यांनीही विक्रेते शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा उत्साह वाढवला.

चौकट ०२

आता आंबा महोत्सव

द्राक्ष महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पणन विभाग कोल्हापूरसह सांगली, सातारा, कराड, पणजी, बेळगाव येथे आंबा महोत्सव भरवणार आहे. मे महिन्यात याचे नियोजन आहे, अशी माहिती पणनचे उप व्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली.

फोटो: ३००३२०२१-कोल-ग्राप्स

फोटो ओळ : कोल्हापुरात भरलेल्या द्राक्ष महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. यावेळी ज्येष्ठ सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनीही महोत्सवाला आवर्जून भेट दिली.