शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

नव्या क्लस्टर विद्यापीठ संकल्पनेत अनुदान, वेतनावर परिणाम होणार नाही : शैलेश देवळाणकर

By संदीप आडनाईक | Updated: February 3, 2024 22:14 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचोवण्यासाठी स्कूल कनेक्ट अभियान

कोल्हापूर : जी स्वायत्त महाविद्यालये विद्यापीठाच्या क्लस्टरमध्ये रुपांतरित होतील, त्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना मिळणारे अनुदान,वेतन, प्राध्यापक कमी होणार नाहीत, सर्व वेतन अनुदान, शिष्यवृत्त्या चालू राहतील, उलट प्रतिवर्षी एक याप्रमाणे पाच वर्षासाठी पाच कोटी रुपये देण्याची तरतूद असेल,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने होईल. विद्यार्थ्यांपर्यंत हे धोरण पोहोचवण्यासाठी येत्या तीन महिन्यात स्कूल कनेक्ट हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.

अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरावर प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून अभियानपूर्व कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही देवळाणकर यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ जणांची राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. राज्याचे उच्च शिक्षणाचे मॉडेल इतर राज्यात राबविण्यासाठी लवकरच तेथील मंत्र्याशी संवाद साधण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्याला सात वर्षापर्यंत केव्हाही शिक्षण घेण्याचा आणि सोडण्याची मुभा असेल. शिवाय इंटर्नशिप देण्याबाबतही निश्चित धोरण आखले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.नव्या धोरणाच्या अमंलबजावणीत पाच वर्षांत शंभराहून अधिक छोटी विद्यापीठे उभारण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामागे राज्यात असलेल्या ६७ विद्यापीठांवरील बोजा कमी करण्याचा हेतू आहे. ही स्वायत्त महाविद्यालये स्वत:च परीक्षा घेतील आणि स्वत:च प्रमाणपत्र देतील. अशी महाविद्यालये विद्यापीठात रुपांतरित करण्यासाठी क्लस्टर विद्यापीठे उभारण्यास १८ संस्था तयार आहेत, असे देवळाणकर म्हणाले. सध्या एक विद्यापीठ ८०० महाविद्यालये चालवतात, ही प्रक्रिया शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात गंभीर समस्या आहे. महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्याच्या अडचणींवर मार्ग काढण्याचा हा केवळ शैक्षणिक पर्याय आहे. क्लस्टर तयार करा, पाच वर्षासाठी संस्थेचे अधिष्ठाता, कुलगुरु, प्रकुलगुरुंचा पगार देण्यास सरकार तयार आहे. यासाठी संस्था स्वायत्त असाव्यात, विद्यार्थी संख्या ४००० असावी व परीक्षा नियंत्रित करण्याचा अनुभव असावा अशा अटी असणार आहेत, असे ते म्हणाले.

२००० रिक्त पदे भरणार

राज्यात शिक्षण विभागात सध्या ५५०० पदे रिक्त आहेत. यातील २०८८ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी २००० पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती देवळाणकर यांनी दिली.