शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नव्या क्लस्टर विद्यापीठ संकल्पनेत अनुदान, वेतनावर परिणाम होणार नाही : शैलेश देवळाणकर

By संदीप आडनाईक | Updated: February 3, 2024 22:14 IST

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचोवण्यासाठी स्कूल कनेक्ट अभियान

कोल्हापूर : जी स्वायत्त महाविद्यालये विद्यापीठाच्या क्लस्टरमध्ये रुपांतरित होतील, त्या सर्व अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना मिळणारे अनुदान,वेतन, प्राध्यापक कमी होणार नाहीत, सर्व वेतन अनुदान, शिष्यवृत्त्या चालू राहतील, उलट प्रतिवर्षी एक याप्रमाणे पाच वर्षासाठी पाच कोटी रुपये देण्याची तरतूद असेल,अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने होईल. विद्यार्थ्यांपर्यंत हे धोरण पोहोचवण्यासाठी येत्या तीन महिन्यात स्कूल कनेक्ट हे अभियान राज्यभर राबविण्यात येणार आहे.

अंमलबजावणीसाठी विद्यापीठ स्तरावर प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली असून अभियानपूर्व कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही देवळाणकर यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १६ जणांची राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. राज्याचे उच्च शिक्षणाचे मॉडेल इतर राज्यात राबविण्यासाठी लवकरच तेथील मंत्र्याशी संवाद साधण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्याला सात वर्षापर्यंत केव्हाही शिक्षण घेण्याचा आणि सोडण्याची मुभा असेल. शिवाय इंटर्नशिप देण्याबाबतही निश्चित धोरण आखले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.नव्या धोरणाच्या अमंलबजावणीत पाच वर्षांत शंभराहून अधिक छोटी विद्यापीठे उभारण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामागे राज्यात असलेल्या ६७ विद्यापीठांवरील बोजा कमी करण्याचा हेतू आहे. ही स्वायत्त महाविद्यालये स्वत:च परीक्षा घेतील आणि स्वत:च प्रमाणपत्र देतील. अशी महाविद्यालये विद्यापीठात रुपांतरित करण्यासाठी क्लस्टर विद्यापीठे उभारण्यास १८ संस्था तयार आहेत, असे देवळाणकर म्हणाले. सध्या एक विद्यापीठ ८०० महाविद्यालये चालवतात, ही प्रक्रिया शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात गंभीर समस्या आहे. महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेण्याच्या अडचणींवर मार्ग काढण्याचा हा केवळ शैक्षणिक पर्याय आहे. क्लस्टर तयार करा, पाच वर्षासाठी संस्थेचे अधिष्ठाता, कुलगुरु, प्रकुलगुरुंचा पगार देण्यास सरकार तयार आहे. यासाठी संस्था स्वायत्त असाव्यात, विद्यार्थी संख्या ४००० असावी व परीक्षा नियंत्रित करण्याचा अनुभव असावा अशा अटी असणार आहेत, असे ते म्हणाले.

२००० रिक्त पदे भरणार

राज्यात शिक्षण विभागात सध्या ५५०० पदे रिक्त आहेत. यातील २०८८ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी २००० पदे भरण्यासाठी वित्त विभागाकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती देवळाणकर यांनी दिली.