शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सांगली ऊस उत्पादक ५0 हजार शेतकºयांना अनुदान, शासनाचे सुधारित आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:11 IST

सांगली : कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत आणखी एक सुधारीत आदेश शासनाने पाठविला असून यामध्ये वंचित राहिलेल्या ऊस उत्पादक ५0 हजार शेतकरी अनुदान कक्षेत आले आहेत. याचा लाभ सांगलीसह पश्चीम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकºयांना मिळणार आहे.शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेत सातत्याने बदल केले. यापूर्वीच्या आदेशानुसार ३१ ...

ठळक मुद्देकुटुंबाला अनुदान किंवा कर्जमाफी यापैकी एकच लाभ मिळणारहे शेतकरी आता नियमित कर्ज परतफेड केल्याबद्दल मिळणाºया अनुदानास पात्र

सांगली : कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेअंतर्गत आणखी एक सुधारीत आदेश शासनाने पाठविला असून यामध्ये वंचित राहिलेल्या ऊस उत्पादक ५0 हजार शेतकरी अनुदान कक्षेत आले आहेत. याचा लाभ सांगलीसह पश्चीम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकºयांना मिळणार आहे.

शासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान योजनेत सातत्याने बदल केले. यापूर्वीच्या आदेशानुसार ३१ जून २0१७ पर्यत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार होते. मात्र ऊस उत्पादक शेतकºयांना ही अट अडचणीची होती. ऊसासाठी घेतलेल्या पीक कर्जाची वसुली ही कारखान्याकडून जमा होणाºया बिलातून थेट लिंकिंगने होते. या वसुलीचे प्रमाण ९० टक्के पेक्षा जास्त आहे. त्यामुळे एक ते दीड वर्षाने हे कर्ज परतफेडीसाठी पात्र ठरते. त्यामुळे १६-१७ मध्ये ऊसासाठी कर्ज घेतलेल्या शेतकºयांची परतफेडीची मुदत २0१८ पर्यंत आहे. पण शासनाने अनुदानासाठी ३१ जून २0१७ पर्यंत नियमित कर्ज परतफेडीची अट घातली होती. त्यामुळे २0१८ मध्ये मुदत संपणारे शेतकरी या अनुदानापासून वंचित रहात होते. परिणामी जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते.

ही बाब माजी मंत्री विनय कोरे, जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यासह जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.मागणीची दखल घेत सुधारीत आदेशात शासनाने ही चूक दुरुस्त केली असून ज्या शेतकºयांच्या पीक कर्जाची मुदत २०१८ मध्ये संपणार आहे अशा शेतकºयांची कर्जाच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील नदीकाठच्या शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील काही भागासह जिल्ह्यातील सुमारे ५० हजार ऊस उत्पादक शेतकºयांना होणार आहे. हे शेतकरी आता नियमित कर्ज परतफेड केल्याबद्दल मिळणाºया अनुदानास पात्र ठरणार आहेत.

याशिवाय शासनाने कर्जमाफी व अनुदाच्या योजनेत आणखी दोन बदल केले आहेत. त्यानुसार एका शेतकरी कुटुबास आता कर्जमाफी किंवा प्रोत्साहन अनुदान यापैकी एकाचाच लाभ मिळणार आहे. पूर्वी हे दोन्ही लाभ कुटुंबातील व्यक्तींना मिळत होते. एका कुटूंबात एकापेक्षा जास्त थकीत कर्जदार व नियमित कर्ज फेडणारेही असतील, तर त्या कुटुंबाला केवळ कर्जमाफी किंवा अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. मात्र या कुटूबातील प्रत्येक व्यक्तीने जर नियमित कर्ज फेडले असेल तर ती २५ हजारापर्यंत अनुदानास पात्र ठरणार आहे. याचा फायदाही काही शेतकºयांना होणार आहे.मार्चपर्यंत मुदतवाढदीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाºया शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखांपेक्षा जास्तीची रक्कम एकरकमी समझोता योजनेतंर्गत (ओटीएस) भरण्यासाठी डिसेंबर २0१७ पर्यंत मुदत होती. ती आता मार्च २0१८ पर्यंत करण्यात आली आहे. याचा शेतकºयांना लाभ होणार आहे.किरकोळ त्रुटींमुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना शासन निर्णयाची अपेक्षा आहे. कर्जमाफीच्या शेवटच्या टप्प्यात काही शेतकरी अपात्र ठरले होते. याशिवाय आता प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीतील गोंधळही दूर झाल्याने अनुदान वर्ग होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.